शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे, महावितरण शेतकऱ्यांच्या ‘हिटलिस्ट’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2016 00:51 IST

१९७२ नंतर प्रथमच पाणी संकट : शिरोळ तालुक्यात पाणी उपसाबंदीमुळे शेतकरी अडचणीत

गणपती कोळी -- कुरुंदवाड --पिण्याच्या व शेतीच्या पाण्याबाबत शिरोळ तालुका राज्यामध्ये समाधानी मानला जातो़ ‘पाऊस कमी मात्र पुराची हमी’ असणाऱ्या या तालुक्यावर प्रथमच दुष्काळाचे सावट उमटू लागले आहेत़ पाणीटंचाईमुळे पाटबंधारे विभाग पाणी कपातीचे धोरण अवलंबत असल्याने पाटबंधारे विभाग, विद्युत मंडळ शेतकऱ्यांच्या ‘हिटलिस्ट’वर असून, पाणी कपातीवरून तालुका संवेदनशील बनला आहे़तालुक्यातून पंचगंगा, वारणा, कृष्णा, दूधगंगा या बारमाही वाहणाऱ्या नद्यांमुळे, तसेच बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतामधील विहिरी, कूपनलिकेमुळे येथील शेतकऱ्याला पाण्याची टंचाई कधीच भासली नाही़ उलट पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे शेती नापीक बनू लागली़ मुबलक पाणी, समाधानकारक पाऊस, शेतीचे योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे शिरोळ तालुका उपलब्ध फळभाज्यांचे विक्रमी उत्पादन घेण्यात अग्रेसर ठरला आहे़ तालुक्यातील सुमारे ८० टक्के क्षेत्र ऊस पिकाच्या लागवडीखाली असल्याने व पाणीही मुबलक असल्याने चांगले उत्पादन व उसाला चांगला दर मिळाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला़शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा नेता म्हणून खा़ राजू शेट्टी यांना शेतकऱ्यांचे पाठबळ मिळाल्याने चांगले राजकीय बस्तानही बसले़ शेतकऱ्यांचे मतदान मिळविण्यासाठी राजकारणात सर्वच राजकीय पक्ष, संघटना आपापल्या परीने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा राजकीय स्टंट करीत आहेत़ पाऊस कमी पुराची हमी देणाऱ्या या तालुक्यात यंदा अत्यल्प पावसामुळे शेतीचे नियोजनच कोलमडले आहे़ धरणातील पाणीसाठा मर्यादित राहिल्याने नद्या कोरड्या पडू लागल्या आहेत़ दुष्काळाचे सावट १९७२ नंतर प्रथमच जाणवत आहेत़ नदीतील पाण्याबरोबर शेतकऱ्यांच्या विहिरी, कूपनलिकेच्या पाण्यानेही तळ गाठला आहे़ पाटबंधारे विभाग पाण्याच्या नियोजनासाठी कपातीचे धोरण अवलंबीत असल्याने व विद्युत मंडळ विद्युतपुरवठा खंडित करत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे़ शेतीवरच पूर्णपणे अर्थकारण अवलंबून असलेल्या या शेतकऱ्याचे पीक पाण्याअभावी वाळत असल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या या संकटाकडे कोणताही राजकीय पक्ष, संघटना, लोकप्रतिनिधी धावून येत नसल्याने शेतकऱ्यांतूनच संताप व्यक्त होत आहे़ त्यामुळे राजकीय नेत्यांच्या भरोशावर न राहता पाटबंधारेचे अधिकारी, विद्युत पुरवठा खंडित करणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून आपल्या संतप्त भावना शेतकरी व्यक्त करत आहेत़ लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष वारणा, पंचगंगा, कृष्णा, दूधगंगा अशा चार नद्या असलेल्या शिरोळ तालुक्यात शेतकऱ्यांच्या जिवावरच राजकारण सुरु आहे़ या तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न सुटत आहे़ मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वत: शेतकरीच लढताना दिसत असताना कोणताही राजकीय पक्ष, संघटना, लोकप्रतिनिधी न्याय हक्काच्या मदतीसाठी येत नसल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़