शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगाव निकाल: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
3
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
4
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
5
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
6
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
7
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
8
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
9
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
12
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
13
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
14
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
15
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
16
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
17
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
18
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
19
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
20
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा

पाटबंधारे, महावितरण शेतकऱ्यांच्या ‘हिटलिस्ट’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2016 00:51 IST

१९७२ नंतर प्रथमच पाणी संकट : शिरोळ तालुक्यात पाणी उपसाबंदीमुळे शेतकरी अडचणीत

गणपती कोळी -- कुरुंदवाड --पिण्याच्या व शेतीच्या पाण्याबाबत शिरोळ तालुका राज्यामध्ये समाधानी मानला जातो़ ‘पाऊस कमी मात्र पुराची हमी’ असणाऱ्या या तालुक्यावर प्रथमच दुष्काळाचे सावट उमटू लागले आहेत़ पाणीटंचाईमुळे पाटबंधारे विभाग पाणी कपातीचे धोरण अवलंबत असल्याने पाटबंधारे विभाग, विद्युत मंडळ शेतकऱ्यांच्या ‘हिटलिस्ट’वर असून, पाणी कपातीवरून तालुका संवेदनशील बनला आहे़तालुक्यातून पंचगंगा, वारणा, कृष्णा, दूधगंगा या बारमाही वाहणाऱ्या नद्यांमुळे, तसेच बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतामधील विहिरी, कूपनलिकेमुळे येथील शेतकऱ्याला पाण्याची टंचाई कधीच भासली नाही़ उलट पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे शेती नापीक बनू लागली़ मुबलक पाणी, समाधानकारक पाऊस, शेतीचे योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे शिरोळ तालुका उपलब्ध फळभाज्यांचे विक्रमी उत्पादन घेण्यात अग्रेसर ठरला आहे़ तालुक्यातील सुमारे ८० टक्के क्षेत्र ऊस पिकाच्या लागवडीखाली असल्याने व पाणीही मुबलक असल्याने चांगले उत्पादन व उसाला चांगला दर मिळाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला़शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा नेता म्हणून खा़ राजू शेट्टी यांना शेतकऱ्यांचे पाठबळ मिळाल्याने चांगले राजकीय बस्तानही बसले़ शेतकऱ्यांचे मतदान मिळविण्यासाठी राजकारणात सर्वच राजकीय पक्ष, संघटना आपापल्या परीने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा राजकीय स्टंट करीत आहेत़ पाऊस कमी पुराची हमी देणाऱ्या या तालुक्यात यंदा अत्यल्प पावसामुळे शेतीचे नियोजनच कोलमडले आहे़ धरणातील पाणीसाठा मर्यादित राहिल्याने नद्या कोरड्या पडू लागल्या आहेत़ दुष्काळाचे सावट १९७२ नंतर प्रथमच जाणवत आहेत़ नदीतील पाण्याबरोबर शेतकऱ्यांच्या विहिरी, कूपनलिकेच्या पाण्यानेही तळ गाठला आहे़ पाटबंधारे विभाग पाण्याच्या नियोजनासाठी कपातीचे धोरण अवलंबीत असल्याने व विद्युत मंडळ विद्युतपुरवठा खंडित करत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे़ शेतीवरच पूर्णपणे अर्थकारण अवलंबून असलेल्या या शेतकऱ्याचे पीक पाण्याअभावी वाळत असल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या या संकटाकडे कोणताही राजकीय पक्ष, संघटना, लोकप्रतिनिधी धावून येत नसल्याने शेतकऱ्यांतूनच संताप व्यक्त होत आहे़ त्यामुळे राजकीय नेत्यांच्या भरोशावर न राहता पाटबंधारेचे अधिकारी, विद्युत पुरवठा खंडित करणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून आपल्या संतप्त भावना शेतकरी व्यक्त करत आहेत़ लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष वारणा, पंचगंगा, कृष्णा, दूधगंगा अशा चार नद्या असलेल्या शिरोळ तालुक्यात शेतकऱ्यांच्या जिवावरच राजकारण सुरु आहे़ या तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न सुटत आहे़ मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वत: शेतकरीच लढताना दिसत असताना कोणताही राजकीय पक्ष, संघटना, लोकप्रतिनिधी न्याय हक्काच्या मदतीसाठी येत नसल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़