शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पासपोर्टची पडताळणी होणार घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:17 IST

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पासपोर्टसाठी लागणारी पोलीस पडताळणी (व्हेरिफिकेशन) वेळेत होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. आता हीच पडताळणी पोलीस घरी येऊन करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना टॅब देण्यात आले आहेत. १ जानेवारी २०१८ पासून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे.कोल्हापुरातून साधारणत: वर्षाकाठी सुमारे ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पासपोर्टसाठी लागणारी पोलीस पडताळणी (व्हेरिफिकेशन) वेळेत होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. आता हीच पडताळणी पोलीस घरी येऊन करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना टॅब देण्यात आले आहेत. १ जानेवारी २०१८ पासून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे.कोल्हापुरातून साधारणत: वर्षाकाठी सुमारे २० ते २५ हजार नागरिक, विद्यार्थी हे पासपोर्टसाठी अर्ज करतात. अचानक पासपोर्टची गरज लागल्यास, कागदपत्रांची छाननी, त्यातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी येथील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी पुण्याला जावे लागत होते. धावपळ, वेळ आणि पैसा खर्च होत होता.परराष्ट्र खात्याकडून कसबा बावडा मार्गावरील पोस्टाच्या मुख्य कार्यालयात स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुरू केल्याने पुण्याला जावे लागत नाही; परंतु पासपोर्टसाठी संबंधित व्यक्तीचा अर्ज पोलीस पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याला गोपनीय विभागाकडून निरोप दिला जातो.काहीवेळा कर्मचाºयांवर कामाचा अतिरिक्त भार असल्याने अर्ज पुढे जाण्यासाठी रेंगाळतात, तर काही वेळा संबंधित व्यक्ती पाठपुरावा करत नसल्याने अर्जांकडे कोणी लक्ष देत नाही. या घोळामध्ये पासपोर्ट अर्जांच्या पडताळणीला विलंब होतो. लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ७२ तासांच्या आत पासपोर्टच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून ते पुढील कार्यवाहीसाठी पासपोर्ट केंद्राला पाठवून देण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागातील कर्मचाºयांना दिले आहेत.पोलीस मुख्यालयातील पासपोर्ट विभागास एका पासपोर्टची एकवीस दिवसात प्रक्रिया पूर्ण केल्यास १५० रुपये मिळतात. वर्षभरात २६ हजार पासपोर्टची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्या प्रत्येकामागे १५० रुपयांप्रमाणे ३ लाख ९० हजार रुपये शासनाकडून मिळाले आहेत तसेच प्रत्येक नागरिकाने पासपोर्टसाठी अर्ज केल्यास त्याचेकडून पंधराशे रुपये भरून घेतले जातात.या जमा झालेल्या निधीतून पासपोर्ट विभागाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना प्रत्येकी दोन टॅब दिले आहेत. नागरिकांच्यासोयीसाठी पोलीस ठाण्यात होणारी पडताळणी आता पोलीस घरी जाऊन करणार आहेत. त्यामुळे नागरिकांना पासपोर्टसाठी पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागणार नाही.दहा दिवसांत पासपोर्ट हातीपासपोर्ट काढण्यासाठी सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून तो अर्ज पोलीस मुख्यालयातील पासपोर्ट विभागात सादर केला जातो तेथून तो पोलीस पडताळणीसाठी संबंधित पोलीस ठाण्यात पाठविला जातो. येथील गोपनीय विभागाकडून संबंधित व्यक्तीवर कोणत्याही प्रकारे गुन्हे दाखल नसल्याची खात्री केली जाते. त्यानंतर पोलीस निरीक्षकांच्या समोर होणारी ओळख परेड आता थेट पोलीस घरी जावून करतील. त्यानंतर तो अर्ज टपालाने पुन्हा पासपोर्ट विभागाला पाठविला जाईल. त्यानंतर तो येथील निरीक्षकांच्या सहीने कसबा बावडा येथील टपाल कार्यालयातील पासपोर्ट केंद्राला पाठविला जाईल. तेथून तो जावक क्रमांक देऊन पुणे पासपोर्ट कार्यालयाकडे पाठविला जाईल. अवघ्या दहा दिवसांत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांच्या घरी पासपोर्ट टपालाने मिळणार आहे.नागरिकांच्या सोयीसाठी आता पोलीस त्यांच्या घरी जावून पासपोर्ट संबंधी पडताळणी करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना टॅब देण्यात आले आहेत. जानेवारी २०१८ मध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस प्रशासनाची तयारी सुरू आहे.-शिवाजी शेंडे, सहायक पोलीस निरीक्षक, पासपोर्ट विभाग