शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

प्रकल्पग्रस्त दाखल्यासाठी परवड

By admin | Updated: September 3, 2015 23:48 IST

आत्मदहनाचा इशारा : दूधगंगा कालव्याचे कामही निकृष्ट दर्जाचे; शेतकऱ्यांची तक्रार

महेश पाटील- कावणे  दूधगंगा डावा कालवा प्रकल्पामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती फुलली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला. पण, ज्या शेतकऱ्यांच्या प्रकल्पासाठी जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांना अजूनही जगण्यासाठी झगडावे लागत आहे. किंबहुना, आपल्या न्याय्य मागण्यांसाठी त्यांच्यावर संघर्ष करण्याची वेळ येऊ लागली आहे. काळमावाडी धरणाच्या दूधगंगा डाव्या कालव्यासाठी करवीर तालुक्यातील कावणे गावची ३२ एकर जमीन गेली आहे; पण या गावच्या प्रकल्पग्रस्तांना शासनाने कोणत्याही सोयीसुविधा दिल्या नसल्याची खंत प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली. त्याचबरोबर डाव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, प्रकल्पग्रस्त दाखले न मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजनांचाही लाभ घेता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने याची दाखल घेऊन दाखले द्यावेत, अन्यथा प्रकल्पग्रस्तांच्यावतीने रामचंद्र महादेव पाटील यांनी येथील ग्रामपंचायतीसमोर १० सप्टेंबरला आत्मदहनाचा इशारा दिला आहे.करवीर तालुक्यातील कावणे गावच्या दूधगंगा डाव्या कालव्याच्या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे २००२ मध्ये मूल्यांकन झाले. ही जमीन बागायती असूनही त्याकाळी या जमिनीला कोरडवाहू दर्जा देऊन अतिशय कमी किमतीने या जमिनीचे मूल्यांकन करण्यात आले. २००५ मध्ये या जमिनीमध्ये उभी असणारी पिके काढायला सांगून, गुंठ्याला ५२० ते ७२० रुपयांप्रमाणे मोबदला देऊन जमीन संपादित करण्यात आली आणि कालव्याचे काम सुरू करण्यात आले. त्या जमिनीमधील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्यासाठीच्या पाईपलाईन कालव्याचे काम सुरू झाल्याने फुटल्या. त्यावेळी शेतकऱ्यांनी कालव्याचे काम थांबविले होते; पण ठेकेदाराने काम पूर्ण झाल्यानंतर सर्व पाईपलाईन बसवून देतो, असे सांगून काम सुरू केले; पण अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. कालव्याचे काम हे दर्जाहिन केलेले असून, कालव्याचे पूल, रस्ता मोठा केलेला नसल्याने याचा त्रास आजूबाजूच्या शेतकऱ्यांना होत आहे. येथील प्रकल्पग्रस्तांपैकी अनेक प्रकल्पग्रस्त भूमिहीन झाले आहेत, तरीसुद्धा या लोकांची दारिद्र्य रेषेखाली असणारी नावे कमी केल्याने त्यांना रेशन मिळत नाही. त्यामुळे त्यांना मोलमजुरी केलेल्या पैशांत पुरेसे धान्य घेता येत नाही. त्यामुळे पोट भरायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.दूधगंगा डाव्या कालव्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले आहे. काम चालू होण्याअगोदरच्या शेतीच्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यावर जोडून देतो, असे सांगून काढल्या; पण, अद्याप ठेकेदाराने त्या जोडल्या नसल्याने कालव्यावरील क्षेत्र पाण्याविना आहे. कालव्याच्या मोऱ्या, पूल आणि रस्त्याचे कामही अपूर्णच आहे. - सुनील निवृत्ती पाटील, प्रकल्पग्रस्त शेतकरीआमची पूर्ण जमीन कालव्यासाठी गेल्याने आम्ही भूमिहीन झालो आहोत. त्यामुळे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करावा लागतो. धान्य व इतर खरेदीसाठी मोलमजुरीचे पैसे पुरत नाहीत. दारिद्र्य रेषेखाली नाव नसल्यामुळे स्वस्त धान्य मिळत नाही, मग आम्ही जगायचे कसे?- रंजना पाटील, भूमिहीन प्रकल्पग्रस्त शेतकरीआम्ही प्रकल्पग्रस्त असतानाही आम्हाला प्रकल्पग्रस्त दाखला दिलेला नाही. त्यामुळे आमच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी अडचणी येत आहेत. दारिद्र्य रेषेखाली नाव नसल्याने आम्हाला धान्य मिळत नाही. शासनाने आम्हाला प्रकल्पग्रस्त दाखले दिले नाहीत, तर १० सप्टेंबरला मी आत्मदहन देण्याचा इशारा संबंधित विभागांना अर्ज करून दिला आहे.- रामचंद्र महादेव पाटील, भूमिहीन प्रकल्पग्रस्त शेतकरी.