शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
3
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
6
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
7
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
8
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
9
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
10
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
11
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
12
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
13
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
14
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
15
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
16
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
17
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
18
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
19
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
20
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी

पार्लेत हत्तींचा उच्छाद

By admin | Updated: December 26, 2014 00:46 IST

१२ दिवसांपासून धुमाकूळ : वीस एकर ऊस, शंभर पोती भाताचे नुकसान

चंदगड : गेले १२ दिवस पार्ले (ता. चंदगड) येथील धनगरवाड्याजवळ असलेल्या म्हार झाऱ्याजवळील पाझर तलावाजवळ ठाण मांडून असलेल्या ५ हत्तींच्या कळपाने येथील शेतकऱ्याचा ऊस, भात, केळी, बाबूंच्या बेटी आदी पिकांचे नुकसान करून उच्छाद मांडला आहे. १२ दिवसांपासून हत्तीचा या ठकाणी मुक्काम आहे.धनगरवाड्याजवळ असलेल्या पाझर तलावात दिवसभर मस्त डुंबायचे व रात्री गावालगतच्या शिवारातील पिकांचे नुकसान करायचे, असा या हत्तींचा दिनक्रम सुरू आहे. या हत्तींच्या नुकसानीपुढे वनविभागही हतबल झाला आहे. केवळ पंचनामे करण्यापलीकडे वनविभागाचे कर्मचारी काहीच करू शकत नाहीत. वनविभागाकडे हत्तींना हुसकावून लावण्यासाठी ठोस उपाययोजना नसल्याने शेतकऱ्यांनाही नुकसान सोसण्यापलीकडे काहीच करता येत नाही. या परिसरातील कृष्णा दत्तू गावडे, विकास दत्तू पाटील, सटू जानकू गावडे, लक्ष्मण जोतिबा गावडे, गुंडू पोमाजी गावडे, सटू जानकू पाटील, लक्ष्मण नागोजी फाटक, दत्तू आप्पाजी फाटक, तानाजी गुरव यांच्या जवळपास २० एकर क्षेत्रातील ऊस फस्त केला आहे तर भात मळून ट्रॅक्टरमध्ये भरलेली गुंडू बापू गावडे यांची ३० भाताची व विठू गोपाळ पाटील यांची खळ्यावरील २० पोती भात हत्तींनी खाऊन फक्त केले आहे.यशवंत म्हाकेकर यांचे १० पोती भात, भावकू गावकर, निळू गावडे २० पोती भात, १ केळी बाग, रेमा झिलू गावडे, लक्ष्मण गावडे, गणु रामा गावडे यांच्या भाताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. याशिवाय वैजू डामू गावडे, शामराव नरसू गावडे, ओमाणा डामू गावडे यांच्या बांबूंच्या बेटी व विठ्ठल गणू गावडे यांच्या मिरचीचे तरवा हत्तींनी फस्त करून मोठे नुकसान केले आहे. गावातील अन्य शेतकऱ्यांच्याही पिकांचे हत्तींनी नुकसान केले.वनविभागाचे कर्मचारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम करत आहेत. पण मिळणारी नुकसानभरपाई व झालेले नुकसान यामध्ये तफावत असून वर्षभर घातलेल्या खताचा खर्चही निघत नाही. हत्तींनी घातलेल्या नुकसानीच्या धाडसत्रात येथील शेतकरी हतबल झाला असून, हत्ती हटाव मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. (प्रतिनिधी)दरवर्षी डिसेंबर १५ पूर्वी हे हत्ती कर्नाटकमध्ये जात असतात. मात्र, यावर्षी तालुक्यात उशिरा अवकाळी पडलेल्या पावसामुळे सुगी १ महिना लांबली आहे. त्यामुळे हत्तींना मुबलक चारा व पाणी मिळत आहे. त्यामुळे हत्तींचा परतीचा कालावधी वाढला आहे. सुगी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे हत्ती ८ दिवसांत मार्गक्रमण करतील, अशी शक्यता आहे.- एस. बी. तळवडेकर, वनक्षेत्रपाल पाटणेहत्तींनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे वनविभाग करीत आहे. ही चांगली बाब आहे. मात्र, होणारे नुकसान व मिळणारी भरपाई यांचा ताळमेळ बसत नाही. वर्षभर घातलेल्या खत व मजुरी मशागत यांचा निम्मा खर्चही भरपाईपोटी मिळत नाही. त्यामुळे वनविभागाकडून नुकसानभरपाई नको पण हत्तींचा बंदोबस्त कायमचा करावा.- विठ्ठल गणु गावडे, नुकसानग्रस्त शेतकरी, पार्ले.