शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

सबजेल हलवून पार्किंग करावे

By admin | Updated: June 17, 2016 00:36 IST

आनंद माने : कमी खर्चात जादा सुविधा देण्याचा विचार व्हावा

कोल्हापूर : पूर्वी अंबाबाईचे मंदिर हे केवळ स्थानिक भाविकांचे श्रद्धास्थान होते. गेल्या दहा-पंधरा वर्षांत देवीची महती देशभरात पोहोचल्याने भाविकांची संख्याही वाढली आहे. येथे आल्यानंतर भाविकांपुढे मोठा प्रश्न असतो तो पार्किंगचा. बिंदू चौकातील सबजेल हलवले गेले तर येथे प्रशस्त पार्किंग करता येईल. येथेच स्वच्छतागृहाची व्यवस्था केली तर भाविकांची मोठी सोय होणार आहे. मंदिराचा विकास करायचा म्हणजे येथे पिढ्यान्पिढ्या राहणारे नागरिक, व्यापारी यांना हलवावे लागणार. मात्र हे करीत असताना त्यांचे योग्य रीतीने पुनर्वसन करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. जमिनींचे हस्तांतरण आणि नागरिकांचे पुनर्वसन हा या आराखड्यातील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्याचाच खर्च मोठा आहे. नांदेडमध्ये ही प्रक्रिया योग्य रीतीने केली गेली; त्यामुळे त्यांच्यात तक्रारीचा सूर नाही. कोल्हापूरच्या नागरिकांची धरणग्रस्तांसारखी अवस्था होऊ नये. शाळांचेदेखील स्थलांतर करून त्यांना योग्य पर्याय दिला पाहिजे. मंदिराचे सौंदर्य अबाधित राखतानाच कमी खर्चात अधिक सुविधा कशा देता येतील, याचा विचार केला गेला पाहिजे.- आनंद माने, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सदर्शन मंडपाची गरज आहे का?अन्य देवस्थानांमध्ये केवळ मुख्य रांगांमधूनच देवतेचे दर्शन होते. कोल्हापूरच्या अंबाबाईचे मात्र महाद्वार, गरुड मंडप, कासव चौक अशा तीन-चार ठिकाणांहून सहज दर्शन घडते. शिवाय दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची ठरावीक कालावधीतच गर्दी असते. तेवढ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून दर्शन मंडप उभारण्याची खरंच गरज आहे का, याचा विचार व्हावा. मंदिर हे वारसास्थळ असल्याने त्या शेजारी कोणतीही नवी इमारत उभारता कामा नये. दर्शन मंडपासाठी परिसरातील इमारती ताब्यात घेता येऊ शकतील.झाकोळले भवानी मंडपाचे सौंदर्यजुना राजवाड्यासमोर आतील बाजूला शासकीय कार्यालये आहेत. ती हलवून तेथे भाविकांच्या विश्रांतीची सोय करता येईल. भवानी मंडपातून केएमटी हलवली. मात्र आता दुचाकी गाड्या, शासकीय गाड्या, फेरीवाले यांनी पूर्ण परिसर व्यापला आहे. हा परिसर ऐतिहासिक वारसा स्थळ असल्याने मोकळा पाहिजे.