शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

सबजेल हलवून पार्किंग करावे

By admin | Updated: June 17, 2016 00:36 IST

आनंद माने : कमी खर्चात जादा सुविधा देण्याचा विचार व्हावा

कोल्हापूर : पूर्वी अंबाबाईचे मंदिर हे केवळ स्थानिक भाविकांचे श्रद्धास्थान होते. गेल्या दहा-पंधरा वर्षांत देवीची महती देशभरात पोहोचल्याने भाविकांची संख्याही वाढली आहे. येथे आल्यानंतर भाविकांपुढे मोठा प्रश्न असतो तो पार्किंगचा. बिंदू चौकातील सबजेल हलवले गेले तर येथे प्रशस्त पार्किंग करता येईल. येथेच स्वच्छतागृहाची व्यवस्था केली तर भाविकांची मोठी सोय होणार आहे. मंदिराचा विकास करायचा म्हणजे येथे पिढ्यान्पिढ्या राहणारे नागरिक, व्यापारी यांना हलवावे लागणार. मात्र हे करीत असताना त्यांचे योग्य रीतीने पुनर्वसन करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. जमिनींचे हस्तांतरण आणि नागरिकांचे पुनर्वसन हा या आराखड्यातील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्याचाच खर्च मोठा आहे. नांदेडमध्ये ही प्रक्रिया योग्य रीतीने केली गेली; त्यामुळे त्यांच्यात तक्रारीचा सूर नाही. कोल्हापूरच्या नागरिकांची धरणग्रस्तांसारखी अवस्था होऊ नये. शाळांचेदेखील स्थलांतर करून त्यांना योग्य पर्याय दिला पाहिजे. मंदिराचे सौंदर्य अबाधित राखतानाच कमी खर्चात अधिक सुविधा कशा देता येतील, याचा विचार केला गेला पाहिजे.- आनंद माने, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सदर्शन मंडपाची गरज आहे का?अन्य देवस्थानांमध्ये केवळ मुख्य रांगांमधूनच देवतेचे दर्शन होते. कोल्हापूरच्या अंबाबाईचे मात्र महाद्वार, गरुड मंडप, कासव चौक अशा तीन-चार ठिकाणांहून सहज दर्शन घडते. शिवाय दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची ठरावीक कालावधीतच गर्दी असते. तेवढ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून दर्शन मंडप उभारण्याची खरंच गरज आहे का, याचा विचार व्हावा. मंदिर हे वारसास्थळ असल्याने त्या शेजारी कोणतीही नवी इमारत उभारता कामा नये. दर्शन मंडपासाठी परिसरातील इमारती ताब्यात घेता येऊ शकतील.झाकोळले भवानी मंडपाचे सौंदर्यजुना राजवाड्यासमोर आतील बाजूला शासकीय कार्यालये आहेत. ती हलवून तेथे भाविकांच्या विश्रांतीची सोय करता येईल. भवानी मंडपातून केएमटी हलवली. मात्र आता दुचाकी गाड्या, शासकीय गाड्या, फेरीवाले यांनी पूर्ण परिसर व्यापला आहे. हा परिसर ऐतिहासिक वारसा स्थळ असल्याने मोकळा पाहिजे.