शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

Kolhapur- परिख पुलाचे रुंदीकरण अशक्य, रेल्वेचे महापालिकेस पत्र; वाहतुकीचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता

By भारत चव्हाण | Updated: April 8, 2023 12:57 IST

पुलाखालून वाहतूक धोकादायक

भारत चव्हाणकोल्हापूर : रेल्वे स्थानकावर नव्याने बांधलेल्या प्लॅटफॉर्ममुळे बाबुभाई परिख पुलाचे रुंदीकरण, पुनर्विकास करणे अशक्य असल्याने तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नवीन पर्यायांचा शोध घ्यावा, असे रेल्वे प्रशासनाने महानगरपालिका प्रशासनाला पत्राने कळविले आहे. एवढेच नाही तर या रुंदीकरणाच्या कामाकरिता सल्लागाराचे दहा लाख रुपयांचे शुल्कही रेल्वेने महापालिकेला परत केले आहे. त्यामुळे परिख पुलाचे रुंदीकरण होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.कोल्हापूर शहरातील परिख पूल नूतनीकरण समितीने शहरातील वाढती वाहतूक तसेच या पुलाखालून होणारी वाहतूक लक्षात घेऊन रुंदीकरणाची मागणी लावून धरली आहे. त्यासाठी आंदोलनही केले होते. त्याची दखल घेत महापालिकेचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी व नूतनीकरण समितीचे सदस्य यांनी संयुक्त पाहणी केली होती. त्यावेळी सल्लागाराचे दहा लाख रुपयांचे शुल्क भरण्यास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. महापालिकेने ते तत्काळ भरले.दि. २२ डिसेंबरला रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी परिख पुलाची पाहणी केली. विद्यमान परिख पुलाचा पुनर्विकास, नूतनीकरण करणे क्रॉसओवर आणि सध्याच्या संरेखनात नव्याने बांधलेल्या प्लॅटफॉर्ममुळे शक्य नाही, यावर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले. त्यानंतर त्यांनी पर्यायी उपाय देण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञ सल्लागाराचे मत घ्यावे आणि योग्य ठिकाणी रोड ओव्हर ब्रिज बांधावा, यावर विचार करण्यास पालिकेला सुचविले आहे. महापालिकेला त्यांच्या प्रस्तावांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचा रेल्वेचा प्रयत्न राहील, असेही कळविले आहे.

पुलाखालून वाहतूक धोकादायकरेल्वे फाटक क्रमांक १ हा वाहतुकीसाठी कायमचा बंद ठेवण्यात आल्यापासून अपरिहार्य कारणास्तव परिख पुलाखालून हलक्या वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी दिली गेली. त्यामुळे फाटक बंद केल्यानंतर वाहतुकीचा तितका गंभीर प्रश्न निर्माण झाला नव्हता. परंतु, आता हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे रेल्वे प्रशासनाने महापालिकेला कळविले आहे, शिवाय काही अपघात झाल्यास रेल्वे जबाबदार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे. तरीही वाहतूक सुरू आहे. जर रेल्वेने या पुलाखालील वाहतूक बंद केली तर मात्र प्रश्न अधिकच गंभीर होऊ शकतो.उड्डाणपुलाची आवश्यकतागोकुळ हॉटेल ते टेंबलाई रेल्वे उड्डाणपूल या साधारण तीन ते चार किलोमीटर अंतरात रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल नसल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. अवजड वाहनांना मोठा वळसा मारून जावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे फाटक क्रमांक १ किंवा शिवाजी पार्क ते साईक्स एक्स्टेशन या दरम्यान वाहतुकीसाठी उड्डाणपूल बांधण्याची आवश्यकता आहे. फाटक क्रमांक १ येथे पादचारी उड्डाणपूल तत्काळ बांधणे आवश्यक आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर