शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
2
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
3
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
4
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
5
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
6
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
7
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
8
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
9
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
10
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
11
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
12
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
13
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
14
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
15
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
16
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
17
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
18
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
19
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
20
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!

Kolhapur- परिख पुलाचे रुंदीकरण अशक्य, रेल्वेचे महापालिकेस पत्र; वाहतुकीचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता

By भारत चव्हाण | Updated: April 8, 2023 12:57 IST

पुलाखालून वाहतूक धोकादायक

भारत चव्हाणकोल्हापूर : रेल्वे स्थानकावर नव्याने बांधलेल्या प्लॅटफॉर्ममुळे बाबुभाई परिख पुलाचे रुंदीकरण, पुनर्विकास करणे अशक्य असल्याने तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नवीन पर्यायांचा शोध घ्यावा, असे रेल्वे प्रशासनाने महानगरपालिका प्रशासनाला पत्राने कळविले आहे. एवढेच नाही तर या रुंदीकरणाच्या कामाकरिता सल्लागाराचे दहा लाख रुपयांचे शुल्कही रेल्वेने महापालिकेला परत केले आहे. त्यामुळे परिख पुलाचे रुंदीकरण होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.कोल्हापूर शहरातील परिख पूल नूतनीकरण समितीने शहरातील वाढती वाहतूक तसेच या पुलाखालून होणारी वाहतूक लक्षात घेऊन रुंदीकरणाची मागणी लावून धरली आहे. त्यासाठी आंदोलनही केले होते. त्याची दखल घेत महापालिकेचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी व नूतनीकरण समितीचे सदस्य यांनी संयुक्त पाहणी केली होती. त्यावेळी सल्लागाराचे दहा लाख रुपयांचे शुल्क भरण्यास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. महापालिकेने ते तत्काळ भरले.दि. २२ डिसेंबरला रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी परिख पुलाची पाहणी केली. विद्यमान परिख पुलाचा पुनर्विकास, नूतनीकरण करणे क्रॉसओवर आणि सध्याच्या संरेखनात नव्याने बांधलेल्या प्लॅटफॉर्ममुळे शक्य नाही, यावर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले. त्यानंतर त्यांनी पर्यायी उपाय देण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञ सल्लागाराचे मत घ्यावे आणि योग्य ठिकाणी रोड ओव्हर ब्रिज बांधावा, यावर विचार करण्यास पालिकेला सुचविले आहे. महापालिकेला त्यांच्या प्रस्तावांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचा रेल्वेचा प्रयत्न राहील, असेही कळविले आहे.

पुलाखालून वाहतूक धोकादायकरेल्वे फाटक क्रमांक १ हा वाहतुकीसाठी कायमचा बंद ठेवण्यात आल्यापासून अपरिहार्य कारणास्तव परिख पुलाखालून हलक्या वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी दिली गेली. त्यामुळे फाटक बंद केल्यानंतर वाहतुकीचा तितका गंभीर प्रश्न निर्माण झाला नव्हता. परंतु, आता हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे रेल्वे प्रशासनाने महापालिकेला कळविले आहे, शिवाय काही अपघात झाल्यास रेल्वे जबाबदार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे. तरीही वाहतूक सुरू आहे. जर रेल्वेने या पुलाखालील वाहतूक बंद केली तर मात्र प्रश्न अधिकच गंभीर होऊ शकतो.उड्डाणपुलाची आवश्यकतागोकुळ हॉटेल ते टेंबलाई रेल्वे उड्डाणपूल या साधारण तीन ते चार किलोमीटर अंतरात रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल नसल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. अवजड वाहनांना मोठा वळसा मारून जावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे फाटक क्रमांक १ किंवा शिवाजी पार्क ते साईक्स एक्स्टेशन या दरम्यान वाहतुकीसाठी उड्डाणपूल बांधण्याची आवश्यकता आहे. फाटक क्रमांक १ येथे पादचारी उड्डाणपूल तत्काळ बांधणे आवश्यक आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर