शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या सायकलीसाठी आधी पालकांची पदरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:53 IST

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या व शाळेपासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत राहणाºया मुलींना राज्य शासन सायकली देणार आहे; परंतु पालकांना त्यासाठी आधी पदरमोड करावी लागणार आहे. पालक गरीब असतो, त्याला मुलीसाठी सायकल घेता येत नाही, म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे; ...

ठळक मुद्देशासनाचे धोरण : रकमेत पाचशे रुपयांची केली वाढ; एकूण साडेतीन हजार रुपये मिळणार

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या व शाळेपासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत राहणाºया मुलींना राज्य शासन सायकली देणार आहे; परंतु पालकांना त्यासाठी आधी पदरमोड करावी लागणार आहे. पालक गरीब असतो, त्याला मुलीसाठी सायकल घेता येत नाही, म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे; परंतु पुन्हा त्या योजनेलाच हरताळ फासणारे धोरण सरकारने निश्चित केले आहे. पूर्वी या सायकलीसाठी सरकार तीन हजार रुपये देत होते. यंदापासून त्यात पाचशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील खेडोपाडी अजूनही शाळेसाठी मुलामुलींची पायपीट होते. मुलींना शाळेला चालत जावे लागते म्हणून सुरक्षिततेच्या कारणावरून पालक तिचे शिक्षणच बंद करतात. मुलांना सायकल किंवा तत्सम काहीतरी सोय करून दिली जाते; परंतु अजूनही तेवढी सजगता मुलींच्या शिक्षणासाठी समाजामध्ये आलेली नाही. त्यामुळे तिला लांबच्या गावाला चालत जावे लागते; या कारणावरून मुलींचे शिक्षण थांबू नये यासाठी मुलींसाठी सायकल वाटप करण्याची योजना राज्य सरकार राबविते. व्यापक अर्थाने ही चांगली योजना आहे; परंतु तिच्या अंमलबजावणीतील दोष योजनेच्या मुळावर येणारे आहेत.नव्या वर्षात २०१८-१९ साठी ही योजना नियोजन विभागाने मंजूर केली आहे. त्यासंबंधीचा शासन आदेशही शुक्रवारी (दि. २३) काढण्यात आला आहे. त्यानुसार ज्या मुलींचे घरापासून शाळेपर्यंतचे अंतर शून्य ते पाच किलोमीटर आहे अशा लाभधारक मुलींना सायकल खरेदीसाठी ३५०० रुपये देण्यात येणार आहेत; परंतु त्यातील दोन हजार अगोदर देण्यात येतील व सायकल खरेदी केल्याची पावती व इतर कागदपत्रे सादर केल्यानंतरच उर्वरित दीड हजार रुपये सरकार अदा करणार आहे. म्हणजे पालकाने अगोदर पदरमोड करून ही सायकल खरेदी करावी लागणार आहे व मग पावत्या व अन्य कागदपत्रे सादर केल्यानंतर कधीतरी त्यांना राहिलेले दीड हजार रुपये मिळणार आहेत.सायकल दारापर्यंत पोहोचेपर्यंत अनेक दिव्यमुळात मुलींच्या ब्रॅँडेड सायकलीची किंमत ४५०० रुपये आहे; परंतु तेवढी रक्कम द्यायला जमत नाही म्हणून जिल्हा परिषद मग निविदा मागवून सायकल खरेदी करते. त्या अत्यंत हलक्या दर्जाच्या असतात. त्या मुलींंना वर्षभरही चांगलेपणाने वापरता येत नाहीत. शेतकरी सहकारी संघासारख्या चांगल्या संस्थेकडून अशा सायकली विकत घेतल्या पाहिजेत; पण त्यांच्याकडून काही मिळत नसल्याने खासगी व्यापाºयांकडून त्या घेतल्या जातात. मागच्या वर्षात खरेदी केलेल्या सायकली अजूनही काही पंचायत समित्यांमध्ये थप्पी लावलेल्या आहेत. त्या वाटप करताना होणारे राजकारण व त्यातून मिळणारा वाटा हा भाग वेगळाच आहे. एवढे सगळे करून ही सायकल त्या मुलींपर्यंत पोहोचणार आहेत.