शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

मुलींच्या सायकलीसाठी आधी पालकांची पदरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:53 IST

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या व शाळेपासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत राहणाºया मुलींना राज्य शासन सायकली देणार आहे; परंतु पालकांना त्यासाठी आधी पदरमोड करावी लागणार आहे. पालक गरीब असतो, त्याला मुलीसाठी सायकल घेता येत नाही, म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे; ...

ठळक मुद्देशासनाचे धोरण : रकमेत पाचशे रुपयांची केली वाढ; एकूण साडेतीन हजार रुपये मिळणार

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या व शाळेपासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत राहणाºया मुलींना राज्य शासन सायकली देणार आहे; परंतु पालकांना त्यासाठी आधी पदरमोड करावी लागणार आहे. पालक गरीब असतो, त्याला मुलीसाठी सायकल घेता येत नाही, म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे; परंतु पुन्हा त्या योजनेलाच हरताळ फासणारे धोरण सरकारने निश्चित केले आहे. पूर्वी या सायकलीसाठी सरकार तीन हजार रुपये देत होते. यंदापासून त्यात पाचशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील खेडोपाडी अजूनही शाळेसाठी मुलामुलींची पायपीट होते. मुलींना शाळेला चालत जावे लागते म्हणून सुरक्षिततेच्या कारणावरून पालक तिचे शिक्षणच बंद करतात. मुलांना सायकल किंवा तत्सम काहीतरी सोय करून दिली जाते; परंतु अजूनही तेवढी सजगता मुलींच्या शिक्षणासाठी समाजामध्ये आलेली नाही. त्यामुळे तिला लांबच्या गावाला चालत जावे लागते; या कारणावरून मुलींचे शिक्षण थांबू नये यासाठी मुलींसाठी सायकल वाटप करण्याची योजना राज्य सरकार राबविते. व्यापक अर्थाने ही चांगली योजना आहे; परंतु तिच्या अंमलबजावणीतील दोष योजनेच्या मुळावर येणारे आहेत.नव्या वर्षात २०१८-१९ साठी ही योजना नियोजन विभागाने मंजूर केली आहे. त्यासंबंधीचा शासन आदेशही शुक्रवारी (दि. २३) काढण्यात आला आहे. त्यानुसार ज्या मुलींचे घरापासून शाळेपर्यंतचे अंतर शून्य ते पाच किलोमीटर आहे अशा लाभधारक मुलींना सायकल खरेदीसाठी ३५०० रुपये देण्यात येणार आहेत; परंतु त्यातील दोन हजार अगोदर देण्यात येतील व सायकल खरेदी केल्याची पावती व इतर कागदपत्रे सादर केल्यानंतरच उर्वरित दीड हजार रुपये सरकार अदा करणार आहे. म्हणजे पालकाने अगोदर पदरमोड करून ही सायकल खरेदी करावी लागणार आहे व मग पावत्या व अन्य कागदपत्रे सादर केल्यानंतर कधीतरी त्यांना राहिलेले दीड हजार रुपये मिळणार आहेत.सायकल दारापर्यंत पोहोचेपर्यंत अनेक दिव्यमुळात मुलींच्या ब्रॅँडेड सायकलीची किंमत ४५०० रुपये आहे; परंतु तेवढी रक्कम द्यायला जमत नाही म्हणून जिल्हा परिषद मग निविदा मागवून सायकल खरेदी करते. त्या अत्यंत हलक्या दर्जाच्या असतात. त्या मुलींंना वर्षभरही चांगलेपणाने वापरता येत नाहीत. शेतकरी सहकारी संघासारख्या चांगल्या संस्थेकडून अशा सायकली विकत घेतल्या पाहिजेत; पण त्यांच्याकडून काही मिळत नसल्याने खासगी व्यापाºयांकडून त्या घेतल्या जातात. मागच्या वर्षात खरेदी केलेल्या सायकली अजूनही काही पंचायत समित्यांमध्ये थप्पी लावलेल्या आहेत. त्या वाटप करताना होणारे राजकारण व त्यातून मिळणारा वाटा हा भाग वेगळाच आहे. एवढे सगळे करून ही सायकल त्या मुलींपर्यंत पोहोचणार आहेत.