शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

मुलींच्या सायकलीसाठी आधी पालकांची पदरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:53 IST

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या व शाळेपासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत राहणाºया मुलींना राज्य शासन सायकली देणार आहे; परंतु पालकांना त्यासाठी आधी पदरमोड करावी लागणार आहे. पालक गरीब असतो, त्याला मुलीसाठी सायकल घेता येत नाही, म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे; ...

ठळक मुद्देशासनाचे धोरण : रकमेत पाचशे रुपयांची केली वाढ; एकूण साडेतीन हजार रुपये मिळणार

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या व शाळेपासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत राहणाºया मुलींना राज्य शासन सायकली देणार आहे; परंतु पालकांना त्यासाठी आधी पदरमोड करावी लागणार आहे. पालक गरीब असतो, त्याला मुलीसाठी सायकल घेता येत नाही, म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे; परंतु पुन्हा त्या योजनेलाच हरताळ फासणारे धोरण सरकारने निश्चित केले आहे. पूर्वी या सायकलीसाठी सरकार तीन हजार रुपये देत होते. यंदापासून त्यात पाचशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील खेडोपाडी अजूनही शाळेसाठी मुलामुलींची पायपीट होते. मुलींना शाळेला चालत जावे लागते म्हणून सुरक्षिततेच्या कारणावरून पालक तिचे शिक्षणच बंद करतात. मुलांना सायकल किंवा तत्सम काहीतरी सोय करून दिली जाते; परंतु अजूनही तेवढी सजगता मुलींच्या शिक्षणासाठी समाजामध्ये आलेली नाही. त्यामुळे तिला लांबच्या गावाला चालत जावे लागते; या कारणावरून मुलींचे शिक्षण थांबू नये यासाठी मुलींसाठी सायकल वाटप करण्याची योजना राज्य सरकार राबविते. व्यापक अर्थाने ही चांगली योजना आहे; परंतु तिच्या अंमलबजावणीतील दोष योजनेच्या मुळावर येणारे आहेत.नव्या वर्षात २०१८-१९ साठी ही योजना नियोजन विभागाने मंजूर केली आहे. त्यासंबंधीचा शासन आदेशही शुक्रवारी (दि. २३) काढण्यात आला आहे. त्यानुसार ज्या मुलींचे घरापासून शाळेपर्यंतचे अंतर शून्य ते पाच किलोमीटर आहे अशा लाभधारक मुलींना सायकल खरेदीसाठी ३५०० रुपये देण्यात येणार आहेत; परंतु त्यातील दोन हजार अगोदर देण्यात येतील व सायकल खरेदी केल्याची पावती व इतर कागदपत्रे सादर केल्यानंतरच उर्वरित दीड हजार रुपये सरकार अदा करणार आहे. म्हणजे पालकाने अगोदर पदरमोड करून ही सायकल खरेदी करावी लागणार आहे व मग पावत्या व अन्य कागदपत्रे सादर केल्यानंतर कधीतरी त्यांना राहिलेले दीड हजार रुपये मिळणार आहेत.सायकल दारापर्यंत पोहोचेपर्यंत अनेक दिव्यमुळात मुलींच्या ब्रॅँडेड सायकलीची किंमत ४५०० रुपये आहे; परंतु तेवढी रक्कम द्यायला जमत नाही म्हणून जिल्हा परिषद मग निविदा मागवून सायकल खरेदी करते. त्या अत्यंत हलक्या दर्जाच्या असतात. त्या मुलींंना वर्षभरही चांगलेपणाने वापरता येत नाहीत. शेतकरी सहकारी संघासारख्या चांगल्या संस्थेकडून अशा सायकली विकत घेतल्या पाहिजेत; पण त्यांच्याकडून काही मिळत नसल्याने खासगी व्यापाºयांकडून त्या घेतल्या जातात. मागच्या वर्षात खरेदी केलेल्या सायकली अजूनही काही पंचायत समित्यांमध्ये थप्पी लावलेल्या आहेत. त्या वाटप करताना होणारे राजकारण व त्यातून मिळणारा वाटा हा भाग वेगळाच आहे. एवढे सगळे करून ही सायकल त्या मुलींपर्यंत पोहोचणार आहेत.