शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

तीन दशकांचे अथक परिश्रम अन् फुललेले नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:16 IST

वर्ष १९८९-९०... अत्यंत दूरदृष्टीचा तरुण तळसंदे (जि. कोल्हापूर) सारख्या माळरान जमिनीवर नंदनवन फुलवण्याचे, हा कॅम्पस 'एज्युकेशन हब' बनवण्याचे स्वप्न ...

वर्ष १९८९-९०... अत्यंत दूरदृष्टीचा तरुण तळसंदे (जि. कोल्हापूर) सारख्या माळरान जमिनीवर नंदनवन फुलवण्याचे, हा कॅम्पस 'एज्युकेशन हब' बनवण्याचे स्वप्न पाहतो. तीन दशकांच्या अथक परिश्रमातून कृषीविषयक विविध प्रयोग, शिक्षण संस्था असा विस्तार करत या ठिकाणी कृषी व तंत्र क्षेत्रातील विद्यापीठाची स्थापना करतो. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील हे या जिद्दी तरुणाचे नाव... तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे आज गुरुवारी उद्घाटन होत असून डॉ. संजय डी. पाटील यांनी पाहिलेल्या त्यांच्या स्वप्नाचा प्रवास आज खऱ्या अर्थाने वास्तवात उतरत आहे त्यानिमित्ताने...

संपूर्ण देशभरात उत्तम गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या डी. वाय. पाटील ग्रुपच्या पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची ३७ वर्षांपूर्वी १९८४ मध्ये डॉ. डी. वाय पाटील (दादासाहेब) यांनी कसबा बावडा (कोल्हापूर) येथे स्थापना केली. आपले पुत्र संजय पाटील यांच्याकडे त्यांनी या महविद्यालयाचे नेतृत्व सोपवले. संजय पाटील यांना सुरुवातीपासूनच कृषी क्षेत्राची आवड होती. दादासाहेबांनी ही आवड ओळखून त्यांना शेती खरेदी करण्यास प्रेरणा दिली. त्यानुसार डॉ. संजय पाटील यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी तळसंदे येथे १९८९-९० मध्ये १४८ मालकांना एकत्र आणत २०५ एकर शेतीची खरेदी केली.

त्यावेळी हे क्षेत्र म्हणे एक माळरान होते. डोंगराळ, मुरबाड असलेल्या या जमिनीवर डॉ. संजय पाटील यांनी प्रचंड मेहनत घेतली. डॉ. संजय पाटील यांच्याकडून शेतीतील विविध प्रयोग या ठिकाणी करण्यात आले. कृषी क्षेत्रातील विविध प्रयोगांची दखल घेत डॉ. संजय पाटील यांना वसंतराव नाईक कृषिभूषण, इंदिरा प्रियदर्शिनी, बळीराजा, सकाळ अॅग्रोवन एक्सलन्स अॅवाॅर्ड, विद्याभारती, 'वनश्री पुरस्कार', गोल्डस्टार इंटरनॅशनल अॅवाॅर्ड यासह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. बेंगळुरू येथील अखिल भारतीय आंबा महोत्सवात प्रथम क्रमांकाने त्यांना सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना हिमाचल प्रदेश विद्यापीठाने 'डॉक्टरेट' देऊन गौरवले आहे.

कृषिविषयक अद्ययावत ज्ञान, नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी १९९१ मध्ये या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली. या विस्तीर्ण परिसरात सध्या ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर व एमबीए महविद्यालय सुरू असून साडेतीन हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

कृषी क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण अनुभवी शिक्षण देणारे विद्यापीठ व्हावे, असे स्वप्न डॉ. संजय डी. पाटील यांनी पाहिले होते. त्यानुसार तळसंदे येथील कॅम्पसमध्ये 'डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ' हे खासगी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी राज्य शासनाकडे विनंती अर्ज करण्यात आला. ९ डिसेंबर २०२० ला राज्य मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली. १५ डिसेंबर २०२० ला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी हे विद्यापीठ स्थापन करण्याबाबतच्या कायद्याला मंजुरी दिली. त्यानंतर माननीय राज्यपाल महोदयांनी २८ डिसेंबर २०२० रोजी या कायद्यावर स्वाक्षऱ्या करून त्याला अधिस्वीकृती दिली.

त्यानुसार २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून नवे विद्यापीठ कार्यरत होत असून त्याचा आज १ जुलै रोजी शुभारंभ होत आहे. दादासाहेब व आईसाहेबांचा आशीर्वाद, डॉ. संजय पाटील यांचे नियोजन व धाकटे बंधू संस्थेचे उपाध्यक्ष सतेज पाटील व पुत्र विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांच्या विशेष प्रयत्न व मेहनतीमधून हे विद्यापीठ आजपासून शैक्षणिक सेवेत रुजू होत आहे. राज्यभरात 'कृषी दिन' म्हणून साजरा होत असतानाच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतून या विद्यापीठाचा ऑनलाइन उद्घाटन सोहळ्याचा दुग्धशर्करा योग यानिमित्ताने जुळून आला आहे.