शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वर्चस्ववादी राजकारणामुळेच पानसरेंचा खून

By admin | Updated: April 7, 2015 01:17 IST

भालचंद्र कांगो : ‘पानसरे यांचा खून का झाला?’ पुस्तकाचे सांगलीत प्रकाशन

सांगली : संपूर्ण जगात सांस्कृतिक दहशतवाद फोफावत असतानाच, भारतात सध्या हिंदुत्ववादी विचारांचे सरकार सत्तारूढ आहे. संपूर्ण घटनांचा गांभीर्याने विचार केला, तर गोविंदराव पानसरे यांचा खून हा राजकीय वर्चस्ववादातून झाला असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते भालचंद्र कांगो यांनी शनिवारी येथे केला. अ‍ॅड. के. डी. शिंदे लिखित ‘कॉ. पानसरे यांचा खून का झाला... ?’ या पुस्तिकेचे प्रकाशन कांगो यांच्याहस्ते करण्यात आले. प्राचार्य विश्वास सायनाकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कांगो म्हणाले की, दाभोलकर आणि पानसरे यांच्या विचाराने अनेकांना प्रेरणा मिळत होती. यामुळेच त्यांना संपविण्यात आले. या खुनामागे कोण आहे? असा प्रश्न जेव्हा उत्पन्न होतो, तेव्हा काही घटकांचा विचार करावा लागतो. सध्या सत्ता कोणाच्या ताब्यात आहे, त्यांची विचारसरणी काय आहे, हे लक्षात घेतले तर, हा राजकीय खून असल्याचेच दिसते. पानसरेंची हत्या उन्मादातून करण्यात आली आहे. हिंदुत्ववादी सरकारचे धोरण वर्चस्ववादाचे आहे, तर महात्मा गांधी आणि विवेकानंद यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मानवतावादाचा होता, हे दुर्लक्षून चालणार नाही. मोदी सरकार आल्यापासून ज्या विपरित घटना समाजात घडत होत्या, त्याविरोधात पानसरे हे वैचारिक हल्ला करीत होते. हल्लेखोरांनी केवळ पानसरेंवर हल्ला केला नाही, तर समतेच्या लढ्यावर हल्ला करून पुरोगामी विचारसरणीच संपविण्याचा प्रयत्न केला. डॉ. बाबूराव गुरव म्हणाले की, बहुजन समाजाच्या भावना भडकावून त्यांना आपल्याकडे वळविणे हेच काहींचे काम आहे. याला रोखणे गरजेचे आहे. याकरिता बहुजन समाजाने लिहिते झाले पाहिजे. त्याचा प्रारंभ ‘या’ पुस्तिकेच्या माध्यमातून झाला आहे. अ‍ॅड. के. डी. शिंदे म्हणाले, विचार संपविण्यासाठीच पानसरेंचा खून केला असून, त्यामागील वस्तुस्थिती समाजासमोर आणण्यासाठीच पुस्तिकेचे लेखन केले आहे. प्राचार्य विश्वास सायनाकर यांनी, धार्मिक गुलामगिरी लवकर संपविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. शंकर पुजारी यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. राहुल थोरात यांनी आभार मानले. यावेळी माजी आमदार प्रा. शरद पाटील, धनाजी गुरव, अ‍ॅड. अमित शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)वैचारिक मंथनकॉ. पानसरे यांनी ‘हू किल्ड करकरे?’ या पुस्तकावर परिसंवाद ठेवला होता. त्यातून वैचारिक मंथन झाले होते. तीच परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी कम्युनिस्ट पक्षातर्फे देशभरात पन्नास ठिकाणी असे परिसंवाद आयोजित करण्यात येणार असल्याचे कांगो यांनी सांगितले.