शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

पानसरे यांच्या हत्येचा तपास एटीएसकडे द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:29 IST

कोल्हापूर : काॅम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडूनही खऱ्या सूत्रधाराला पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे हा तपास ...

कोल्हापूर : काॅम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडूनही खऱ्या सूत्रधाराला पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे हा तपास महाराष्ट्र ‘एटीएस’कडे द्यावा, अशी मागणी गुरुवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने बिंदू चौक येथे झालेल्या निर्दशनादरम्यान करण्यात आली.

काॅम्रेड पानसरे यांची १६ फेब्रुवारी २०१५ रोजी राहत्या घरासमोरील रस्त्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. उपचारादरम्यान २० फेब्रुवारी २०१५ ला ते शहीद झाले. त्यानंतर १६ सप्टेंबर २०१५ ला एका संशयिताला याप्रकरणी अटक करण्यात आली. मात्र, त्याच्या इतर साथीदारांना व मास्टरमाईंडला पोलिसांना पकडण्यात गेल्या साडेसहा वर्षांत यश आलेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचा तपास यंत्रणेवरील विश्वास उडू लागला आहे. त्यामुळे सरकारने महाराष्ट्र एटीएसकडे हा तपास सुपूर्द करावा, अशी मागणी करण्यात आली. काॅम्रेड गोविंद पानसरे अमर रहे, भारतीय संविधान जिंदाबाद, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे यांनी प्रास्ताविक केले. राज्य सचिव नामदेवराव गावडे, शहर सचिव रघुनाथ कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाकपचे चंद्रकांत यादव, शेकापचे बाबूराव कदम, बी. एल. बर्गे, सुमन पाटील, सहसचिव गिरीश फोंडे, दिलदार मुजावर, रमेश वडणगेकर, एस. बी. पाटील, शाहीर सदाशिव निकम, प्रशांत आंबी, सुनीता अमृतसागर, इर्शाद फरास, शंकर काटाळे, आरती रेडेकर, हरिष कांबळे, कृष्णा पानसे, बाबा ढेरे, अनिल चव्हाण, संजय सदलगेकर, बळवंत पवार, एन. सी. पाटील,आदी उपस्थित होते.

फोटो : १९०८२०२१-कोल-एमकेपी

ओळी : कोल्हापुरात काॅम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाचा तपास एटीएसकडे द्यावा, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने बिंदू चौकात गुरुवारी निदर्शने करण्यात आली.

(छाया : आदित्य वेल्हाळ)