शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
4
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
5
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
6
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
7
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
8
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
9
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
10
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
11
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
12
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
13
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
14
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
15
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

पानसरे यांच्या हत्येचा तपास एटीएसकडे द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:29 IST

कोल्हापूर : काॅम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडूनही खऱ्या सूत्रधाराला पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे हा तपास ...

कोल्हापूर : काॅम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडूनही खऱ्या सूत्रधाराला पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे हा तपास महाराष्ट्र ‘एटीएस’कडे द्यावा, अशी मागणी गुरुवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने बिंदू चौक येथे झालेल्या निर्दशनादरम्यान करण्यात आली.

काॅम्रेड पानसरे यांची १६ फेब्रुवारी २०१५ रोजी राहत्या घरासमोरील रस्त्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. उपचारादरम्यान २० फेब्रुवारी २०१५ ला ते शहीद झाले. त्यानंतर १६ सप्टेंबर २०१५ ला एका संशयिताला याप्रकरणी अटक करण्यात आली. मात्र, त्याच्या इतर साथीदारांना व मास्टरमाईंडला पोलिसांना पकडण्यात गेल्या साडेसहा वर्षांत यश आलेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचा तपास यंत्रणेवरील विश्वास उडू लागला आहे. त्यामुळे सरकारने महाराष्ट्र एटीएसकडे हा तपास सुपूर्द करावा, अशी मागणी करण्यात आली. काॅम्रेड गोविंद पानसरे अमर रहे, भारतीय संविधान जिंदाबाद, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे यांनी प्रास्ताविक केले. राज्य सचिव नामदेवराव गावडे, शहर सचिव रघुनाथ कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाकपचे चंद्रकांत यादव, शेकापचे बाबूराव कदम, बी. एल. बर्गे, सुमन पाटील, सहसचिव गिरीश फोंडे, दिलदार मुजावर, रमेश वडणगेकर, एस. बी. पाटील, शाहीर सदाशिव निकम, प्रशांत आंबी, सुनीता अमृतसागर, इर्शाद फरास, शंकर काटाळे, आरती रेडेकर, हरिष कांबळे, कृष्णा पानसे, बाबा ढेरे, अनिल चव्हाण, संजय सदलगेकर, बळवंत पवार, एन. सी. पाटील,आदी उपस्थित होते.

फोटो : १९०८२०२१-कोल-एमकेपी

ओळी : कोल्हापुरात काॅम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाचा तपास एटीएसकडे द्यावा, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने बिंदू चौकात गुरुवारी निदर्शने करण्यात आली.

(छाया : आदित्य वेल्हाळ)