शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पानसरे हल्ल्यातील दुचाकी आंबोलीत ?

By admin | Updated: March 22, 2015 01:13 IST

कोल्हापूर, सिंधुदुर्ग पोलिसांचा कसून तपास

सावंतवाडी/कोल्हापूर : आंबोली येथे दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या संशयास्पद मोटारसायकलीचा वापर हा ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येतील मारेकऱ्यांनी केला होता का, याचा तपास सध्या सिंधुदुर्ग व कोल्हापूर पोलीस करीत आहेत. या मोटारसायकलीची माहिती घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक आंबोली येथे येऊन घटनास्थळांची व दुचाकीची पाहणी करून परतले. याबाबतचा अहवाल ते पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांना देणार आहेत. त्यानंतरच या तपासाची सूत्रे हलणार आहेत. या मोटारसायकलीचा नंबर के ए २८ व्ही- ५०३१ असा आहे. ही मोटारसायकल कर्नाटकातील राजशेखर नामक व्यक्तीची असल्याचे निष्पन्न झाले आहे.ती आॅगस्ट २०१४ मध्ये चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी बेळगावातील पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत माहिती अशी की, कोल्हापूरची हद्द संपल्यानंतर अवघ्या चार किलोमीटरवर असलेल्या गडदूवाडी आंबोली येथे मुख्य रस्त्यापासून चार किलोमीटर अंतरावर मोटारसायकल बेवारस स्थितीत वनमजुरांना आढळून आली. या वनमजुराने आंबोली पोलिसांना या घटनेची कल्पना दिल्यानंतर पोलिसांनी घटना स्थळावरून ती ताब्यात घेतली. यावेळी या मोटारसायकलीस पुढे व मागे नंबरप्लेट नव्हती. पुढचा भागही फुटलेल्या अवस्थेत होता. मोटारसायकलीतील पेट्रोलही संपले होते. आंबोली पोलिसांनी या गाडीचा पंचनामा केला तसेच याची खबर सर्वत्र दिली होती. त्यानंतर शुक्रवारी दुपारी कोल्हापूर पोलिसांचे पथक स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोलीत दाखल झाले. त्यांनी गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांनी ही काळ््या रंगाची दुचाकी वापरली होती. आंबोलीत सापडलेली दुचाकी व मारेकऱ्यांनी वापरलेली दुचाकी यात साम्य वाटत असल्याने पोलिसांनी दुचाकीसह जागेची पाहणी केली. ही गाडी नेमकी कुठली याचा शोधही पोलिसांंनी घेतला. कर्नाटकमधील राजशेखर शेखदारस यांच्या मालकीची ती असल्याचे निष्पण्ण झाले. ही मोटारसायकल २७ आॅगस्ट २०१४ ला चोरीला गेल्याची तक्रार टिळकवाडी बेळगाव या पोलीस ठाण्यात दिली असल्याचे पोलीस तपासांत निष्पन्न झाले आहे. या दुचाकीच्या तपासाबाबतचा अहवाल कोल्हापूर पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांना देणार असून, त्यानंतर पुढील तपासाची सूत्रे हलविण्यात येणार आहेत. पुढील भाग तुटलेल्या अवस्थेत गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी मारेकऱ्यांनी जी दुचाकी वापरली होती, ती काळ्या रंगाची होती तसेच या दुचाकीला कोल्हापुरात वृत्तपत्र विक्रेत्याच्या सायकलची धडक लागली होती. यावेळी सायकलस्वार व मारेकऱ्यांमध्ये किरकोळ बाचाबाचीही झाली होती. त्यामुळे सायकलच्या धडकेनंतर दुचाकीचा पुढील भाग मोडू शकतो का, याचाही अभ्यास सुरू असून, सद्य:स्थितीत काहीअंशी या मोटारसायकलीचे पुरावे मिळते जुळते आहेत. ‘सीसीटीव्ही’वर तपास केंद्रित पोलिसांनी तपासाची दिशा आंबोलीतील सीसीटीव्हीवर केंद्रित केली आहे. ज्या दिवशी गोविंद पानसरे यांची हत्या झाली. त्या दिवसापासूनचे आंबोली पोलीस दूरक्षेत्रावरील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासासाठी घेणार आहेत. या मोटारसायकलीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत असून, या विषयावर अधिकृतपणे बोलण्यास कोणीही तयार नाही. सर्व काही वरिष्ठस्तरावर सुरू असल्याचे पोलीस सांगत आहेत. (प्रतिनिधी)