शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

विनोद खन्ना यांच्याबद्दलच्या पन्हाळकरांच्या आठवणी ताज्या

By admin | Updated: April 27, 2017 18:31 IST

लहु के दो रंग, शत्रुता चित्रपटाचे झाले होते चित्रिकरण

आॅनलाईन लोकमत/संदीप आडनाईक

कोल्हापूर : देखणा आणि दणकेबाज अभिनेता विनोद खन्ना यांच्या निधनामुळे पन्हाळकर हळहळले. १९७८ आणि १९९६ या काळात विनोद खन्ना दोन चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी पन्हाळगडावर मुक्कामी होते. या काळात त्यांच्या पन्हाळ्यातील चित्रपट रसिकांशी चांगले ऋणानुबंध जुळले होते.

पन्हाळगडावर १९७८ मध्ये ‘लहू के दो रंग’ या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. पन्हाळ्यावरील हॉटेल रसना येथे तसेच अंबरखाना परिसरात या चित्रपटातील हाणामारीची काही दृश्ये चित्रित करण्यात आली होती. महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अभिनेता डॅनी, हेलन, शबाना आझमी, इंद्राणी मुखर्जी, रणजित, आदी कलाकारांनी भाग घेतला होता. या चित्रपटाचे कलादिग्दर्शन मधुकर शिंदे यांनी केले होते. अभिनेता विनोद खन्ना यांची या चित्रपटात दुहेरी भूमिका होती.

अंबरखाना परिसरातील धान्याच्या कोठारावर डॅनी, रणजित आणि विनोद खन्ना यांच्यातील काही दृश्ये चित्रित करण्यात आली होती. यावेळी हॉटेल रसनामध्ये विनोद खन्ना व इतर सहकलाकार चहापानासाठी थांबत. त्यावेळी पन्हाळकरांना आपल्या या आवडत्या कलाकाराला जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्यावेळीही विनोद खन्ना यांचे देखणे व्यक्तिमत्त्व पाहण्यासाठी कोल्हापूरहून अनेक चाहते पन्हाळ्यावर आल्याचे हे चित्रीकरण प्रत्यक्ष पाहणाऱ्या चित्रपटरसिकांनी सांगितले.

दुसरी आठवण ‘शत्रुता’ या १९९६ मध्ये पन्हाळ्यावर झालेल्या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या प्रसंगाची आहे. या चित्रपटाचे पन्हाळ्यावर विविध ठिकाणी चित्रीकरण झाले. जवळजवळ तीन आठवडे अनेक मातब्बर कलावंत या चित्रपटाच्या चित्रीकरणात सहभागी झाले होते. यामध्ये इंद्राणी मुखर्जी, कुलभूषण खरबंदा या कलाकारांनी भाग घेतला होता.

पन्हाळगडावरील महाराणी ताराराणींच्या राजवाड्यासमोरील जागेत म्हणजे शिवाजी महाराजांच्या मंदिरासमोरील जागेत, साठमारी, तीन दरवाजा, संभाजी महाराजांचे मंदिर या परिसरात हे चित्रीकरण झाले होते. संभाजी महाराज मंदिर परिसरातील चित्रीकरणादरम्यान स्फोटाच्या दृश्याचे आणि इंद्राणी मुखर्जी यांना बांधून घातलेल्या दृश्याचे चित्रीकरण झाले होते. त्यावेळी ते हॉटेल मेघदुतमध्ये वास्तव्यास होते.

रोज सकाळी बॅडमिंटन खेळणे हा त्यांचा शिरस्ता. याही वेळेस विनोद खन्ना यांच्या चाहत्यांनी पन्हाळगडावर गर्दी केली होती. हा चित्रपट अद्यापही प्रदर्शित झालेला नाही. या दोन चित्रपटांच्या चित्रीकरणामुळे पन्हाळकरांशी विनोद खन्ना यांचे ऋणानुबंध जुळले होते. त्यांच्या निधनामुळे पन्हाळ्यातील चित्रपट चाहत्यांच्या आठवणी जाग्या झाल्या.