शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

विनोद खन्ना यांच्याबद्दलच्या पन्हाळकरांच्या आठवणी ताज्या

By admin | Updated: April 27, 2017 18:31 IST

लहु के दो रंग, शत्रुता चित्रपटाचे झाले होते चित्रिकरण

आॅनलाईन लोकमत/संदीप आडनाईक

कोल्हापूर : देखणा आणि दणकेबाज अभिनेता विनोद खन्ना यांच्या निधनामुळे पन्हाळकर हळहळले. १९७८ आणि १९९६ या काळात विनोद खन्ना दोन चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी पन्हाळगडावर मुक्कामी होते. या काळात त्यांच्या पन्हाळ्यातील चित्रपट रसिकांशी चांगले ऋणानुबंध जुळले होते.

पन्हाळगडावर १९७८ मध्ये ‘लहू के दो रंग’ या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. पन्हाळ्यावरील हॉटेल रसना येथे तसेच अंबरखाना परिसरात या चित्रपटातील हाणामारीची काही दृश्ये चित्रित करण्यात आली होती. महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अभिनेता डॅनी, हेलन, शबाना आझमी, इंद्राणी मुखर्जी, रणजित, आदी कलाकारांनी भाग घेतला होता. या चित्रपटाचे कलादिग्दर्शन मधुकर शिंदे यांनी केले होते. अभिनेता विनोद खन्ना यांची या चित्रपटात दुहेरी भूमिका होती.

अंबरखाना परिसरातील धान्याच्या कोठारावर डॅनी, रणजित आणि विनोद खन्ना यांच्यातील काही दृश्ये चित्रित करण्यात आली होती. यावेळी हॉटेल रसनामध्ये विनोद खन्ना व इतर सहकलाकार चहापानासाठी थांबत. त्यावेळी पन्हाळकरांना आपल्या या आवडत्या कलाकाराला जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्यावेळीही विनोद खन्ना यांचे देखणे व्यक्तिमत्त्व पाहण्यासाठी कोल्हापूरहून अनेक चाहते पन्हाळ्यावर आल्याचे हे चित्रीकरण प्रत्यक्ष पाहणाऱ्या चित्रपटरसिकांनी सांगितले.

दुसरी आठवण ‘शत्रुता’ या १९९६ मध्ये पन्हाळ्यावर झालेल्या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या प्रसंगाची आहे. या चित्रपटाचे पन्हाळ्यावर विविध ठिकाणी चित्रीकरण झाले. जवळजवळ तीन आठवडे अनेक मातब्बर कलावंत या चित्रपटाच्या चित्रीकरणात सहभागी झाले होते. यामध्ये इंद्राणी मुखर्जी, कुलभूषण खरबंदा या कलाकारांनी भाग घेतला होता.

पन्हाळगडावरील महाराणी ताराराणींच्या राजवाड्यासमोरील जागेत म्हणजे शिवाजी महाराजांच्या मंदिरासमोरील जागेत, साठमारी, तीन दरवाजा, संभाजी महाराजांचे मंदिर या परिसरात हे चित्रीकरण झाले होते. संभाजी महाराज मंदिर परिसरातील चित्रीकरणादरम्यान स्फोटाच्या दृश्याचे आणि इंद्राणी मुखर्जी यांना बांधून घातलेल्या दृश्याचे चित्रीकरण झाले होते. त्यावेळी ते हॉटेल मेघदुतमध्ये वास्तव्यास होते.

रोज सकाळी बॅडमिंटन खेळणे हा त्यांचा शिरस्ता. याही वेळेस विनोद खन्ना यांच्या चाहत्यांनी पन्हाळगडावर गर्दी केली होती. हा चित्रपट अद्यापही प्रदर्शित झालेला नाही. या दोन चित्रपटांच्या चित्रीकरणामुळे पन्हाळकरांशी विनोद खन्ना यांचे ऋणानुबंध जुळले होते. त्यांच्या निधनामुळे पन्हाळ्यातील चित्रपट चाहत्यांच्या आठवणी जाग्या झाल्या.