शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

पानसरेंची हत्या सरकारपुरस्कृत

By admin | Updated: March 6, 2015 01:18 IST

कांगो यांचा आरोप : बुधवारी मुंबईत मोर्चा; तपासावर असमाधानी

 कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांचे हल्लेखोर सापडत नसल्याने त्यांचा खून शासनपुरस्कृत असल्याचा समज केवळ ‘भाकप’चा नव्हे तर महाराष्ट्रातील सूज्ञ जनतेचा झाला आहे, असा गंभीर आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते भालचंद्र कांगो यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर, अ‍ॅड. पानसरे यांच्या खुन्यांना अटक करावी, या मागणीसाठी ११ मार्चला मुंबईत सर्व डावे पक्ष, विविध संघटनांतर्फे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. कांगो म्हणाले, १६ फेब्रुवारीला अ‍ॅड. गोविंद पानसरे, पत्नी उमा पानसरे यांच्यावर गोळीबार झाला. दि. २० फेब्रुवारीला अ‍ॅड. पानसरे यांचा मृत्यू झाला. पानसरे यांचा खून सामाजिक, वैचारिक, राजकीय कारणांतून केला. त्यांच्या हत्येविरोधात संपूर्ण देशातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. केरळमध्ये १२५ ठिकाणी निदर्शने झाली. लातूरमध्ये सलग पंधरा दिवस मोर्चा निघाले. बिहार, झारखंड, दिल्ली, ओरिसा येथे शोकसभा झाल्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून निषेध व्यक्त करण्यात आला. आपल्या विरोधात विचार मांडणारे खुपत असल्यामुळे अतिशय नियोजनबद्धपणे हा खून केला. सरकारच्या उन्मादाचे हे द्योतक आहे. पोलीस तपास सुरू असल्याचे सांगत आहेत; परंतु प्रगती दिसत नाही. तपासांतून हाती काही मिळत नसल्यामुळे ‘भाकप’तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे कुठे जातील तेथे काळे झेंडे दाखविले जात आहेत. काळे झेंडे दाखविणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पकडून पोलिसांनी दडपशाही सुरू केली आहे. मात्र, जोपर्यंत खुनी शोधून काढत नाहीत तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणे बंद होणार नाही. तपासासंंबंधी भाष्य करताना व्यवस्था ढिसाळ झाल्याची कबुली स्वत: मुख्यमंत्र्यांनी दिली आहे, हे अतिशय गंभीर आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि खुन्यांना त्वरित पकडावे, यासाठी भायखळा राणीच्या बागेपासून बुधवारी(दि. ११) मोर्चाला प्रारंभ होईल. ११ तारखेपर्यंत पोलिसांच्या हाती काही लागले नाही तर त्याच दिवशी बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल. सावळागोंधळ होईल पानसरेंच्या खुनाची माहिती देणाऱ्यांना शासनाने २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. मात्र, बक्षिसाच्या आमिषापोटी नको ते लोक, नको ती माहिती देऊन अपुऱ्या पोलीस यंत्रणेची दिशाभूल करून तपासांत सावळा-गोंधळ निर्माण करतात, असे मत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे आहे, असेही कांगो यांनी सांगितले.