शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

पंचगंगेची पूररेषा आता २०२१च्या महापूर पातळीवर आधारित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:29 IST

पंचगंगा नदीला महापूर आला आणि नागरी वस्तीत महापुराचे पाणी शिरले की मग सर्वांनाच पंचगंगेच्या पूररेषेची आठवण होते. त्यावर चर्चा ...

पंचगंगा नदीला महापूर आला आणि नागरी वस्तीत महापुराचे पाणी शिरले की मग सर्वांनाच पंचगंगेच्या पूररेषेची आठवण होते. त्यावर चर्चा होते. महापूर ओसरला की, मग हळूहळू या विषयावरील चर्चाही ओसरते. गेले अनेक वर्षांचा हा अनुभव आहे. सन २०१९ ला महापूर आला, तेव्हापासून शहर हद्दीतील पूररेषा पुन्हा एकदा चर्चेत आली. पंधरा दिवस महापुराचे पाणी शहराच्या चाळीस टक्के भागात राहिल्याने पूररेषेचे गांभीर्य सर्वांनाच पटले. त्यामुळे या महापुराच्या कटु आठवणी लक्षात घेऊन पूररेषेचे काम सुरू झाले, पण ते शहर हद्दीत अर्धवटच राहिले. कोरोना संसर्ग सुरू झाल्यामुळे काम थांबल्याचे सांगण्यात येते.

२०२१ चा महापूर तर मागच्या दोन वर्षांपूर्वीपेक्षा अधिक होता. हा पूर चार दिवसांत ओसरला तरी त्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आता पूररेषेचे महत्त्व अधिक गडद झाले. यासंदर्भात नुकतीच पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होऊन २०१९ ऐवजी आता २०२१ च्या महापुराची पातळी लक्षात घेऊन पूररेषा निश्चित करण्याचे ठरले. त्यानुसार काम सुरू होऊन महापुराचे पाणी आलेल्या परिसरातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पुढील दोन महिन्यांत काम पूर्ण होईल, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

कोल्हापूर विभागाने सध्या पंचगंगा नदी शहराच्या ज्या भागातून वाहते, त्या भागातील पूररेषा निश्चित करण्यास प्राधान्य दिले आहे. उर्वरित काम नंतर टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणार आहे. शहरातील पूररेषा निश्चितीकरण झाले की, आयआयटी, मुंबई या संस्थेच्या तज्ज्ञाकडून तपासून घेऊन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडे अहवाल पाठविला जाईल. मुख्य अभियंता स्तरावर त्याचा अंतिम निर्णय होईल.

पॉईंटर -

- पंचगंगा नदीची उगमापासून संगमापर्यंत लांबी - ८१ किलोमीटर

- कोल्हापूर शहर हद्दीतील नदीची लांबी - १९ किलोमीटर

- सर्वेक्षण झालेली नदीची लांबी - १४ किलोमीटर

- सर्वेक्षण राहिलेली नदीची लांबी - ५ किलोमीटर.

( शिंगणापूर ते शिवाजी पूल व जाधववाडी, कदमवाडी, भोसलेवाडी काम बाकी)

-महापूर पातळी अशी आहे-

- २०१९ चा महापूर - पातळी ५५ फूट ७ इंच

- २०२१ चा महापूर - पातळी ५६ फूट ३ इंच

कोट -

प्राधान्यक्रमाने पंचगंगा नदीची कोल्हापूर शहर हद्दीतील पूररेषा निश्चित करण्याचे काम हाती घेतले आहे. २०१९ च्या पूरपातळीनुसार सर्वेक्षणाचे काम झाले होते, आता २०२१ ची पूरपातळी विचारात घेऊन सुधारित सर्वेक्षणाचे काम अंतिम केले जात आहे.

महेश सुर्वे, अधीक्षक अभियंता.

जलसंपदा विभाग कोल्हापूर.

कशी ठरविली जाते पूररेषा ?

जलसंपदा विभागातर्फे शंभर वर्षांतील पावसाच्या नोंदी, तसेच महापुराची महत्तम पातळी विचारात घेतली जाते. शास्त्रीय पद्धतीने संख्याशास्त्र, तसेच अभियांत्रिक शास्त्राचा आधार घेऊन पूररेषा निश्चित केली जाते. त्याची पडताळणी आयआयटीसारख्या संस्थेकडून करून घेतली जाते. त्यांच्या सूचनांचा विचार करून पूररेषा अंतिम केली जाते. ही पूररेषा निळ्या, तांबड्या व हिरव्या रेषेने दाखविली जाते.