शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
5
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
6
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
7
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
8
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
9
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
10
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
11
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
12
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
13
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
14
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
15
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
16
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
17
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
18
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
19
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
20
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी

पंचगंगेने गाठली इशारा पातळी

By admin | Updated: August 5, 2016 01:59 IST

‘राधानगरी’चे चार दरवाजे बंद : एकातून ३ हजार ६२८ क्युसेक्स विसर्ग सुरू

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला संततधार पावसाचा जोर गुरुवारी ओसरला तरी राधानगरीसह कासारी व कुंभी धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे पंचगंगा नदीने रात्री ‘इशारा पातळी’ गाठली. बुधवारी सुरू असलेले राधानगरी धरणाचे पाचपैकी चार दरवाजे गुरुवारी बंद झाल्याने ५ क्रमांकाच्या दरवाजातून ३ हजार ६२८ क्युसेक्स विसर्ग सुरू राहिला. सायंकाळी राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ३८.६ फुटांवर गेली. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण ५९४.३७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून यामध्ये चंदगडमध्ये सर्वाधिक ८७.८३ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील ५२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.जिल्ह्यात पावसाने गेल्या चार दिवसांपासून संततधार सुरू ठेवली आहे. गुरुवारी पावसाचा जोर थोडा ओसरला. शहरात काही काळ सूर्यनारायणाचे दर्शनही झाले; परंतु दिवसभरात पावसाच्या मोठ्या सरींमुळे सर्वत्र पाणी-पाणी होऊन ते सखल भागात साचून राहिले. बुुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडून त्यातून ९००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला; परंतु गुरुवारी पावसाने उसंत घेतल्याने यापैकी चार दरवाजे बंद करण्यात येऊन क्रमांक ५ च्या दरवाज्यातून ३ हजार ६२८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला. पावसाचा जोर कमी असला तरी राधानगरीसह कुंभी-कासारी धरणांतून मोठ्या प्रमाणात झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन रात्री ‘इशारा पातळी’ गाठली. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पंचगंगा नदीवरील ७, भोगावतीवरील ५, तुळशीवरील १, वारणेवरील ७, कासारीवरील ८, कुंभीवरील ४, कडवीवरील ४, वेदगंगेवरील ६, हिरण्यकेशीवरील ४, ताम्रपर्णीवरील २, दुधगंगेवरील १, धामणीवरील २, जांबरेवरील १ असे ५२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील ७ राज्यमार्ग, ९ जिल्हा मार्ग, १० इतर जिल्हा मार्ग, ९ ग्रामीण मार्ग खंडित झाले असून या मार्गावरील वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. इतर सर्व मार्गांवरील एस. टी. वाहतूक सुरळीत आहे.गुरुवारी सकाळी आठपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय पाऊस मि.मी.मध्ये असा- हातकणंगले-१३.२५, शिरोळ-१३.७१, पन्हाळा-६८.७१, शाहूवाडी-५७, राधानगरी-६९.५०, गगनबावडा-६९, करवीर-३५.९०, कागल-४०.६०, गडहिंग्लज-३०, भुदरगड-४३.०८, आजरा-६९.२५, चंदगड-८७.८३.पाणी जामदार क्लबपर्यंतकोल्हापूर : गेले तीन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून गुरुवारी दुपारी जामदार क्लबजवळ आले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली; तर बाबूभाई परीख पूल, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौक, आदी सखल भागांत पाणी साचून राहिले. -वृत्त/हॅलो १कृष्णा, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढजयसिंगपूर : धरणक्षेत्रात कोसळत असलेला धुवाधार पाऊस व तालुक्यात झालेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत कृष्णेच्या पाणीपातळीत दहा फुटाने, तर पंचगंगेच्या पाणीपातळीत सात फुटाने वाढ झाली आहे. आलमट्टी धरणात येणारे पाणी आणि होणारा विसर्ग याकडे जिल्हा प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे. -वृत्त/४