शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगेने गाठली इशारा पातळी

By admin | Updated: August 5, 2016 01:59 IST

‘राधानगरी’चे चार दरवाजे बंद : एकातून ३ हजार ६२८ क्युसेक्स विसर्ग सुरू

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला संततधार पावसाचा जोर गुरुवारी ओसरला तरी राधानगरीसह कासारी व कुंभी धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे पंचगंगा नदीने रात्री ‘इशारा पातळी’ गाठली. बुधवारी सुरू असलेले राधानगरी धरणाचे पाचपैकी चार दरवाजे गुरुवारी बंद झाल्याने ५ क्रमांकाच्या दरवाजातून ३ हजार ६२८ क्युसेक्स विसर्ग सुरू राहिला. सायंकाळी राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ३८.६ फुटांवर गेली. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण ५९४.३७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून यामध्ये चंदगडमध्ये सर्वाधिक ८७.८३ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील ५२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.जिल्ह्यात पावसाने गेल्या चार दिवसांपासून संततधार सुरू ठेवली आहे. गुरुवारी पावसाचा जोर थोडा ओसरला. शहरात काही काळ सूर्यनारायणाचे दर्शनही झाले; परंतु दिवसभरात पावसाच्या मोठ्या सरींमुळे सर्वत्र पाणी-पाणी होऊन ते सखल भागात साचून राहिले. बुुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडून त्यातून ९००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला; परंतु गुरुवारी पावसाने उसंत घेतल्याने यापैकी चार दरवाजे बंद करण्यात येऊन क्रमांक ५ च्या दरवाज्यातून ३ हजार ६२८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला. पावसाचा जोर कमी असला तरी राधानगरीसह कुंभी-कासारी धरणांतून मोठ्या प्रमाणात झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन रात्री ‘इशारा पातळी’ गाठली. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पंचगंगा नदीवरील ७, भोगावतीवरील ५, तुळशीवरील १, वारणेवरील ७, कासारीवरील ८, कुंभीवरील ४, कडवीवरील ४, वेदगंगेवरील ६, हिरण्यकेशीवरील ४, ताम्रपर्णीवरील २, दुधगंगेवरील १, धामणीवरील २, जांबरेवरील १ असे ५२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील ७ राज्यमार्ग, ९ जिल्हा मार्ग, १० इतर जिल्हा मार्ग, ९ ग्रामीण मार्ग खंडित झाले असून या मार्गावरील वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. इतर सर्व मार्गांवरील एस. टी. वाहतूक सुरळीत आहे.गुरुवारी सकाळी आठपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय पाऊस मि.मी.मध्ये असा- हातकणंगले-१३.२५, शिरोळ-१३.७१, पन्हाळा-६८.७१, शाहूवाडी-५७, राधानगरी-६९.५०, गगनबावडा-६९, करवीर-३५.९०, कागल-४०.६०, गडहिंग्लज-३०, भुदरगड-४३.०८, आजरा-६९.२५, चंदगड-८७.८३.पाणी जामदार क्लबपर्यंतकोल्हापूर : गेले तीन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून गुरुवारी दुपारी जामदार क्लबजवळ आले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली; तर बाबूभाई परीख पूल, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौक, आदी सखल भागांत पाणी साचून राहिले. -वृत्त/हॅलो १कृष्णा, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढजयसिंगपूर : धरणक्षेत्रात कोसळत असलेला धुवाधार पाऊस व तालुक्यात झालेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत कृष्णेच्या पाणीपातळीत दहा फुटाने, तर पंचगंगेच्या पाणीपातळीत सात फुटाने वाढ झाली आहे. आलमट्टी धरणात येणारे पाणी आणि होणारा विसर्ग याकडे जिल्हा प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे. -वृत्त/४