शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

‘पंचगंगा’प्रश्नी पालिकेची वीज तोडणार

By admin | Updated: September 30, 2015 00:34 IST

प्रदूषण नियंत्रणची कारवाई : मुंबईतील वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला; सुनावणीनंतर निर्णय

भीमगोंडा देसाई--कोल्हापूर प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना न केल्याने व सांडपाणी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पातील वायुगळतीप्रकरणी कोल्हापूर महानगरपालिकेची वीज तोडावी, असा प्रस्ताव येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबईतील वरिष्ठ कार्यालयाकडे आठवड्यापूर्वी दिला आहे. या प्रस्तावावर सुनावणी झाल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. ऐन निवडणुकीत महापालिकेला वीज तोडण्याच्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. सुनावणी सुरू आहे. प्रदूषण रोखण्यासाठी वेळोवेळी पावले न उचललेल्या कोल्हापूर पालिका, इचलकरंजी नगरपालिका व अन्य संस्थांना प्रदूषणाविरुद्ध उपाययोजना करण्याची सूचना न्यायालय सुनावणीवेळी देत आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उपाययोजनेचा पाठपुरावा व नियंत्रण ठेवण्यासाठी समिती कार्यरत आहे. फुलेवाडी, दुधाळी, लक्षतीर्थ, जुना बुधवार, जामदार क्लब, राजहंस, रामन, लाईन बझार, कसबा बावडा व छत्रपती, बापट कॅम्प, कावळा नाका, वीटभट्टी अशा बारा नाल्यांद्वारे सांडपाणी अजूनही थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. सांडपाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नाही. त्यातून प्रक्रिया होऊन बाहेर पडणारे पाणी शेतीला न वापरता पुन्हा नदीमध्येच जाते. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे दोन महिन्यांपूर्वी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात वायुगळती झाली. वैद्यकीय कचऱ्यावरही प्रक्रिया होत नाही.प्रदूषणप्रश्नी यापूर्वी महानगरपालिकेवर फौजदारी गुन्हा व वीज तोडण्याच्या कारवाईची नामुष्की ओढवली होती. तरीही प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने व्यापक उपाययोजना राबविल्या नाहीत. महानगरपालिका प्रशासन याप्रश्नी गंभीर नाही, असा आरोप पर्यावरणवाद्यांनी अनेक वेळा जाहीरपणे केला आहे. ओढ्यावर कच्चे बंधारे बांधणे, निर्जंतुकीकरण करणे असे तात्पुरते उपाय ‘निरी’ या संस्थेने सुचविले आहेत; पण याकडे अपेक्षित लक्ष न दिल्याने प्रदूषित पाणी थेट नदीत मिसळत आहे. कमीत कमी ९६ दशलक्ष लिटर सांडपाणीशहरात कमीत कमी सरासरी रोज १२० दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा होतो. यांपैकी कमी म्हणजे ९६ दशलक्ष लिटर सांडपाणी पंचगंगा नदीत थेट मिसळत आहे. शहरातील ३५ टक्के भागात भुयारी गटारे नाहीत. रोज १६५ टन नागरी घनकचरा निर्मिती होते. यावर प्रक्रिया होत नाही. नऊशे किलो प्रतिदिन निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प नाही.यापूर्वीही कारवाईप्रदूषणप्रश्नी यापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. वीज तोडण्याचीही कारवाई झाली होती. प्रदूषण नियंत्रण मंडळाने चार समजपत्रे, एक कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. १८ लाखांची बँक हमीही जप्त करण्यात आली आहे. आता पुन्हा वीज तोडण्याच्या कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.उद्या मुंबईत बैठकपंचगंगा नदीप्रदूषण रोखण्यासाठी तयार करण्यात आलेला आराखडा सादरीकरण आणि चर्चा करण्यासाठी उद्या, गुरुवारी मुंबई येथील मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले आहे. पर्यावरण विभागात ही बैठक होणार आहे. जिल्हा परिषदेने आराखडा तयार केला आहे. या आराखड्यावर चर्चा होईल. बैठकीस येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासह पर्यावरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.