शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘पंचगंगा’प्रश्नी पालिकेची वीज तोडणार

By admin | Updated: September 30, 2015 00:34 IST

प्रदूषण नियंत्रणची कारवाई : मुंबईतील वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला; सुनावणीनंतर निर्णय

भीमगोंडा देसाई--कोल्हापूर प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना न केल्याने व सांडपाणी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पातील वायुगळतीप्रकरणी कोल्हापूर महानगरपालिकेची वीज तोडावी, असा प्रस्ताव येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबईतील वरिष्ठ कार्यालयाकडे आठवड्यापूर्वी दिला आहे. या प्रस्तावावर सुनावणी झाल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. ऐन निवडणुकीत महापालिकेला वीज तोडण्याच्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. सुनावणी सुरू आहे. प्रदूषण रोखण्यासाठी वेळोवेळी पावले न उचललेल्या कोल्हापूर पालिका, इचलकरंजी नगरपालिका व अन्य संस्थांना प्रदूषणाविरुद्ध उपाययोजना करण्याची सूचना न्यायालय सुनावणीवेळी देत आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उपाययोजनेचा पाठपुरावा व नियंत्रण ठेवण्यासाठी समिती कार्यरत आहे. फुलेवाडी, दुधाळी, लक्षतीर्थ, जुना बुधवार, जामदार क्लब, राजहंस, रामन, लाईन बझार, कसबा बावडा व छत्रपती, बापट कॅम्प, कावळा नाका, वीटभट्टी अशा बारा नाल्यांद्वारे सांडपाणी अजूनही थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. सांडपाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नाही. त्यातून प्रक्रिया होऊन बाहेर पडणारे पाणी शेतीला न वापरता पुन्हा नदीमध्येच जाते. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे दोन महिन्यांपूर्वी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात वायुगळती झाली. वैद्यकीय कचऱ्यावरही प्रक्रिया होत नाही.प्रदूषणप्रश्नी यापूर्वी महानगरपालिकेवर फौजदारी गुन्हा व वीज तोडण्याच्या कारवाईची नामुष्की ओढवली होती. तरीही प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने व्यापक उपाययोजना राबविल्या नाहीत. महानगरपालिका प्रशासन याप्रश्नी गंभीर नाही, असा आरोप पर्यावरणवाद्यांनी अनेक वेळा जाहीरपणे केला आहे. ओढ्यावर कच्चे बंधारे बांधणे, निर्जंतुकीकरण करणे असे तात्पुरते उपाय ‘निरी’ या संस्थेने सुचविले आहेत; पण याकडे अपेक्षित लक्ष न दिल्याने प्रदूषित पाणी थेट नदीत मिसळत आहे. कमीत कमी ९६ दशलक्ष लिटर सांडपाणीशहरात कमीत कमी सरासरी रोज १२० दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा होतो. यांपैकी कमी म्हणजे ९६ दशलक्ष लिटर सांडपाणी पंचगंगा नदीत थेट मिसळत आहे. शहरातील ३५ टक्के भागात भुयारी गटारे नाहीत. रोज १६५ टन नागरी घनकचरा निर्मिती होते. यावर प्रक्रिया होत नाही. नऊशे किलो प्रतिदिन निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प नाही.यापूर्वीही कारवाईप्रदूषणप्रश्नी यापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. वीज तोडण्याचीही कारवाई झाली होती. प्रदूषण नियंत्रण मंडळाने चार समजपत्रे, एक कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. १८ लाखांची बँक हमीही जप्त करण्यात आली आहे. आता पुन्हा वीज तोडण्याच्या कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.उद्या मुंबईत बैठकपंचगंगा नदीप्रदूषण रोखण्यासाठी तयार करण्यात आलेला आराखडा सादरीकरण आणि चर्चा करण्यासाठी उद्या, गुरुवारी मुंबई येथील मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले आहे. पर्यावरण विभागात ही बैठक होणार आहे. जिल्हा परिषदेने आराखडा तयार केला आहे. या आराखड्यावर चर्चा होईल. बैठकीस येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासह पर्यावरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.