शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 02:37 IST

पंढरपूर आणि शिर्डीच्या धर्तीवर कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची तरतूद असलेले

मुंबई : पंढरपूर आणि शिर्डीच्या धर्तीवर कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची तरतूद असलेले विधेयक विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले.या मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबतचे विधानसभा विधेयक संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी विधानसभेत मांडले होते.बुधवारी त्यावर चर्चा होऊन ते एकमताने मंजूर करण्यात आले.या पगारी पुजाऱ्यांमध्ये ५० टक्के पुजारी या महिला असतील अशी तरतूदही विधेयकात करण्यात आली आहे. .छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या शाहू वैदिक स्कूलला मंदिर व्यवस्थापन समिती पूर्ण मदत करणार आहे.श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर विश्वस्त व्यवस्था,कोल्हापूर अशी विश्वस्त व्यवस्थाही स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सभागृहात दिली.आज मंजूर झालेल्या विधेयकानुसार आता पगारी पुजारी नेमण्यात येतील.पूजा करणाºया व्यक्तींचे अनुवांशिक,संविदाकृत अधिकार नाहीसे होणार आहेत. मात्र असे वंशपरंपरागत अधिकार संपुष्टात आलेल्या व्यक्तीला ९० दिवसांत भरपाईच्या रकमेसाठी जिल्हा न्यायालयाकडे अर्ज करता येईल.नुकसानभरपाईसाठीचे सरासरी उत्पन्न हे नियमाच्या दिनांकापुर्वीच्या मागील दहा वर्षांच्या उत्पन्नाच्या आधारे निर्धारित करण्यात येणार आहे.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या जमिनींसंदर्भात फॉरेन्सिक अंकेक्षण पूर्ण झाले असून याबाबतचा अहवाल लवकरच सभागृहात सादर करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ.रणजित पाटील यांनी दिली.मंदिर विश्वस्त व्यवस्थापन समितीमंदिर विश्वस्त व्यवस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी श्री अंबाबाई मंदिर व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार आहे.या समितीत एकूण आठ सदस्य असतील. कोल्हापूरचे महापौर हे या समितीचे पदसिद्ध सदस्य असतील.क्षीरसागर यांच्या सूचनाशिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनी यावेळी काही महत्वाचे मुद्दे मांडले. पंढरपूर येथे रूख्मिणी मातेची पूजा महिला पुजा-यांकडून केली जाते.अंबाबाई देखील मातृदेवता असल्याने तिचीही पूजा महिला पुजाºयांकडून करण्यात यावी.तसेच छत्रपती शाहू महाराजांनी पूजाविधी स्कूलची स्थापना केली होती.या शाळेतून पुजाºयांची नेमणूक करण्यात यावी.पुजाºयांनी आतापर्यंत कोटयवधी रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे त्यांना नुकसानभरपाई देण्याची गरज नाही आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील जमिनीबाबत मी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.मुख्यमंत्रयांनी त्याची एसआयटी चौकशीही घोषित केली होती त्याचे काय झाले असा प्रश्नही क्षीरसागर यांनी विचारला.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील सर्व हिंदूंच्या मंदिरांमध्ये पुजारी नेमताना काही अटी शर्ती ठेवाव्यात व परीक्षा घेउन त्यांची नेमणूक करण्यात यावी व सर्व जातींच्या व्यक्तींना पुजारी होण्याची मुभा असावी अशी सूचना केली.