शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 02:37 IST

पंढरपूर आणि शिर्डीच्या धर्तीवर कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची तरतूद असलेले

मुंबई : पंढरपूर आणि शिर्डीच्या धर्तीवर कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची तरतूद असलेले विधेयक विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले.या मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबतचे विधानसभा विधेयक संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी विधानसभेत मांडले होते.बुधवारी त्यावर चर्चा होऊन ते एकमताने मंजूर करण्यात आले.या पगारी पुजाऱ्यांमध्ये ५० टक्के पुजारी या महिला असतील अशी तरतूदही विधेयकात करण्यात आली आहे. .छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या शाहू वैदिक स्कूलला मंदिर व्यवस्थापन समिती पूर्ण मदत करणार आहे.श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर विश्वस्त व्यवस्था,कोल्हापूर अशी विश्वस्त व्यवस्थाही स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सभागृहात दिली.आज मंजूर झालेल्या विधेयकानुसार आता पगारी पुजारी नेमण्यात येतील.पूजा करणाºया व्यक्तींचे अनुवांशिक,संविदाकृत अधिकार नाहीसे होणार आहेत. मात्र असे वंशपरंपरागत अधिकार संपुष्टात आलेल्या व्यक्तीला ९० दिवसांत भरपाईच्या रकमेसाठी जिल्हा न्यायालयाकडे अर्ज करता येईल.नुकसानभरपाईसाठीचे सरासरी उत्पन्न हे नियमाच्या दिनांकापुर्वीच्या मागील दहा वर्षांच्या उत्पन्नाच्या आधारे निर्धारित करण्यात येणार आहे.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या जमिनींसंदर्भात फॉरेन्सिक अंकेक्षण पूर्ण झाले असून याबाबतचा अहवाल लवकरच सभागृहात सादर करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ.रणजित पाटील यांनी दिली.मंदिर विश्वस्त व्यवस्थापन समितीमंदिर विश्वस्त व्यवस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी श्री अंबाबाई मंदिर व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार आहे.या समितीत एकूण आठ सदस्य असतील. कोल्हापूरचे महापौर हे या समितीचे पदसिद्ध सदस्य असतील.क्षीरसागर यांच्या सूचनाशिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनी यावेळी काही महत्वाचे मुद्दे मांडले. पंढरपूर येथे रूख्मिणी मातेची पूजा महिला पुजा-यांकडून केली जाते.अंबाबाई देखील मातृदेवता असल्याने तिचीही पूजा महिला पुजाºयांकडून करण्यात यावी.तसेच छत्रपती शाहू महाराजांनी पूजाविधी स्कूलची स्थापना केली होती.या शाळेतून पुजाºयांची नेमणूक करण्यात यावी.पुजाºयांनी आतापर्यंत कोटयवधी रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे त्यांना नुकसानभरपाई देण्याची गरज नाही आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील जमिनीबाबत मी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.मुख्यमंत्रयांनी त्याची एसआयटी चौकशीही घोषित केली होती त्याचे काय झाले असा प्रश्नही क्षीरसागर यांनी विचारला.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील सर्व हिंदूंच्या मंदिरांमध्ये पुजारी नेमताना काही अटी शर्ती ठेवाव्यात व परीक्षा घेउन त्यांची नेमणूक करण्यात यावी व सर्व जातींच्या व्यक्तींना पुजारी होण्याची मुभा असावी अशी सूचना केली.