शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 02:37 IST

पंढरपूर आणि शिर्डीच्या धर्तीवर कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची तरतूद असलेले

मुंबई : पंढरपूर आणि शिर्डीच्या धर्तीवर कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची तरतूद असलेले विधेयक विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले.या मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबतचे विधानसभा विधेयक संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी विधानसभेत मांडले होते.बुधवारी त्यावर चर्चा होऊन ते एकमताने मंजूर करण्यात आले.या पगारी पुजाऱ्यांमध्ये ५० टक्के पुजारी या महिला असतील अशी तरतूदही विधेयकात करण्यात आली आहे. .छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या शाहू वैदिक स्कूलला मंदिर व्यवस्थापन समिती पूर्ण मदत करणार आहे.श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर विश्वस्त व्यवस्था,कोल्हापूर अशी विश्वस्त व्यवस्थाही स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सभागृहात दिली.आज मंजूर झालेल्या विधेयकानुसार आता पगारी पुजारी नेमण्यात येतील.पूजा करणाºया व्यक्तींचे अनुवांशिक,संविदाकृत अधिकार नाहीसे होणार आहेत. मात्र असे वंशपरंपरागत अधिकार संपुष्टात आलेल्या व्यक्तीला ९० दिवसांत भरपाईच्या रकमेसाठी जिल्हा न्यायालयाकडे अर्ज करता येईल.नुकसानभरपाईसाठीचे सरासरी उत्पन्न हे नियमाच्या दिनांकापुर्वीच्या मागील दहा वर्षांच्या उत्पन्नाच्या आधारे निर्धारित करण्यात येणार आहे.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या जमिनींसंदर्भात फॉरेन्सिक अंकेक्षण पूर्ण झाले असून याबाबतचा अहवाल लवकरच सभागृहात सादर करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ.रणजित पाटील यांनी दिली.मंदिर विश्वस्त व्यवस्थापन समितीमंदिर विश्वस्त व्यवस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी श्री अंबाबाई मंदिर व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार आहे.या समितीत एकूण आठ सदस्य असतील. कोल्हापूरचे महापौर हे या समितीचे पदसिद्ध सदस्य असतील.क्षीरसागर यांच्या सूचनाशिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनी यावेळी काही महत्वाचे मुद्दे मांडले. पंढरपूर येथे रूख्मिणी मातेची पूजा महिला पुजा-यांकडून केली जाते.अंबाबाई देखील मातृदेवता असल्याने तिचीही पूजा महिला पुजाºयांकडून करण्यात यावी.तसेच छत्रपती शाहू महाराजांनी पूजाविधी स्कूलची स्थापना केली होती.या शाळेतून पुजाºयांची नेमणूक करण्यात यावी.पुजाºयांनी आतापर्यंत कोटयवधी रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे त्यांना नुकसानभरपाई देण्याची गरज नाही आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील जमिनीबाबत मी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.मुख्यमंत्रयांनी त्याची एसआयटी चौकशीही घोषित केली होती त्याचे काय झाले असा प्रश्नही क्षीरसागर यांनी विचारला.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील सर्व हिंदूंच्या मंदिरांमध्ये पुजारी नेमताना काही अटी शर्ती ठेवाव्यात व परीक्षा घेउन त्यांची नेमणूक करण्यात यावी व सर्व जातींच्या व्यक्तींना पुजारी होण्याची मुभा असावी अशी सूचना केली.