शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

पालिकेसाठी उद्या शिरोळ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:54 IST

शिरोळ : शिरोळला नगरपालिका स्थापनेसाठी जनआंदोलनाची गरज आहे. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. १ आॅगस्टपासून आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा निर्णय रविवारी शिरोळ येथे सभेत घेण्यात आला. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून १ आॅगस्ट रोजी शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढून गावबंद ठेवण्याचा निर्णय यावेळी झाला.शिरोळचे ग्रामपंचायतीऐवजी नगरपालिकेत रुपांतर व्हावे, या पार्श्वभूमीवर येथील शिवाजी ...

ठळक मुद्देसर्वपक्षीय लढा उभारण्यासाठी नेतेमंडळीसह ग्रामस्थ एकवटले

शिरोळ : शिरोळला नगरपालिका स्थापनेसाठी जनआंदोलनाची गरज आहे. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. १ आॅगस्टपासून आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा निर्णय रविवारी शिरोळ येथे सभेत घेण्यात आला. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून १ आॅगस्ट रोजी शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढून गावबंद ठेवण्याचा निर्णय यावेळी झाला.शिरोळचे ग्रामपंचायतीऐवजी नगरपालिकेत रुपांतर व्हावे, या पार्श्वभूमीवर येथील शिवाजी चौकात रविवारी सायंकाळी सभा झाली. अध्यक्षस्थानी रावसाहेब देसाई होते. तीन वर्षापासून नगरपालिका होण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. पालिका स्थापन करण्यासाठी सर्व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाली असतानाही नगरपालिका का होत नाही. त्यामुळे आता सर्वपक्षीय लढा उभारण्यासाठी नेतेमंडळीसह ग्रामस्थ एकवटले आहेत. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून १ आॅगस्ट रोजी गावबंद ठेवून तहसिल कार्यालयावर मोर्चा काढणे त्यानंतर ८ आॅगस्टला चक्काजाम आंदोलन, १४ आॅगस्टपर्यंत नगरपालिकेबाबत शासनस्तरावर निर्णय न झाल्यास १५ आॅगस्ट स्वातंत्र्यदिनी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय यावेळी झाला.यावेळी आमदार उल्हास पाटील म्हणाले, ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रुपांतर होण्यासाठी जनरेट्याची गरज आहे. शासन पातळीवर माझा निश्चित प्रयत्न राहील. गावच्या हितासाठी आता निर्णायक लढा उभारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्राणांतिक उपोषणात सहभागी होणार आहे.यावेळी उपसरपंच पृथ्वीराज यादव, पं.स.सदस्य सचिन शिंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष धैर्यशिल देसाई, दरगू गावडे, जि.प.सदस्य अशोकराव माने, अमरसिंह पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, बी.जी.माने, गजानन पाटील, शिवाजी संकपाळ, रावसाहेब देसाई यांनी मनोगते व्यक्त केली. स्वागत व प्रास्ताविक आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी केले. सुत्रसंचालन नंदू सुतार यांनी केले. बजरंग काळे यांनी आभार मानले.तीव्र लढा उभारणारशिरोळ ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रुपांतर व्हावे, या मागणीच्या पार्श्वभूमीवर लढा उभा करण्यासाठी सुकाणू समिती व कृती समितीची स्थापना यावेळी करण्यात आली. या दोन्ही समितीच्या माध्यमातून तीव्र लढा उभारण्याचा निर्णय यावेळी झाला.शिरोळकरांची वज्रमूठशिरोळ येथे रविवारी झालेल्या सभेत सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी नगरपालिका व्हावी, यासाठी पाठिंबा व्यक्त केला. नगरपालिका काळाची गरज असून शिरोळ जनतेच्या रेट्यासमोर शासनाला झुकावे लागेल.शिरोळ आणि आंदोलन हे समीकरण आहे. त्यामुळे आंदोलनाच्या भूमिकेतून शिरोळकरांनी वज्रमूठ बांधली आहे.