शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

‘पी. एन.’ यांचा सल्ला दूध उत्पादकांसह नेत्यांच्याही भल्याचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 16:04 IST

‘गोकुळ’वर लाखो शेतक-यांचे संसार उभे असल्याने राजकीय संघर्षात या अर्थवाहिनीला धक्का लागला तर दूध उत्पादक संपेलच; पण त्याबरोबर जिल्ह्याची आर्थिक घडी कोलमडून पडण्यास वेळ लागणार नाही.

राजाराम लोंढे

कोल्हापूर : ‘गोकुळ’वर लाखो शेतक-यांचे संसार उभे असल्याने राजकीय संघर्षात या अर्थवाहिनीला धक्का लागला तर दूध उत्पादकसंपेलच; पण त्याबरोबर जिल्ह्याची आर्थिक घडी कोलमडून पडण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे पी. एन. पाटील यांनी महादेवराव महाडिक व आमदार सतेज पाटील यांना दिलेला सबुरीचा सल्ला उत्पादकांबरोबरच नेत्यांच्या भल्याचा असेच म्हणावे लागेल.कोल्हापूरचे राजकारण साखर कारखान्यांभोवती फिरत असले तरी अर्थकारण मात्र दूध व्यवसायावरच अवलंबून आहे. पावणेदोन वर्षांनी मिळणा-या उसाच्या पैशातून अल्पभूधारक शेतक-यांच्या जीवनात कधीच स्थैर्य आले नाही. त्यामुळे या शेतक-यांना जगविण्याबरोबरच त्यांचे संसार उभे करण्याचे काम दूध व्यवसायाने, पर्यायाने ‘गोकुळ’ने केले. कोणतीही संस्था राजकारणविरहितराहूच शकत नाही. त्यात ‘गोकुळ’च्या दुधाची चव थोडी न्यारीच असल्याने येथे सत्तेत येणाºयांना हे दूध लवकर मानवते. येथील सत्तेचा वापर करून जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता येते आणि यासाठीच सध्या महाडिक-पाटीलयांच्यामध्ये अस्तित्वाची लढाई सुरू आहे. कोणत्याही संस्थेच्या निवडणुकीनंतर विरोधक किमान चार वर्षे तिकडे फिरकत नाहीत. ‘गोकुळ’बाबतही आतापर्यंत तसेच झाले आहे; पण या वेळेला सतेज पाटील यांनी पहिल्या सर्वसाधारण सभेपासूनच आक्रमक भूमिका घेतली. दुस-या सभेला हजर न राहताच सत्तारूढ गटाच्या अहंपणाने सभा जिंकली. सभा बेकायदेशीरची प्रक्रिया सुरूअसतानाच गाय दूध खरेदी दरातील कपातीचा मुद्दा घेऊन त्यांनी गेले महिनाभर रान उठविले. उत्पादकांच्या दृष्टीने ही भूमिका न्याय्य असल्याने पाटील यांच्या भूमिकेचे स्वागत झाले; पण या मागणीच्या आडून त्यांनी राजकीय उट्टे काढण्यास सुरुवात केल्याने उत्पादकांमध्ये संभ्रमावस्था पसरली.महाडिक-पाटील यांच्यातील वाद कशासाठी, हे जिल्ह्याला नव्याने सांगण्याची गरज नाही. ‘गोकुळ’चे नेतृत्व महाडिक यांच्याबरोबरच पी. एन. पाटील करतात. पण सतेज पाटील यांच्या टीकेचा रोख महाडिक यांच्यावरच राहिल्याने त्यांचा उद्देश लपून राहिलेला नाही.  राजकीय वैरत्वासाठी वेगळी मैदाने आहेत, त्या ठिकाणी ही भूमिका  कदाचित योग्यही असेल; पण सर्वसामान्य माणसांचा संसारज्या संस्थेवर उभा आहे, तिचा वापर करून एकमेकांचे उट्टे काढण्याचा हा प्रकार म्हणजे ‘घर जाळून कोळशाचा व्यापार करणे’ असाच म्हणावा लागेल.दोन्ही नेत्यांतील वादावर शांत बसलेल्या पी. एन. पाटील यांनी मोर्चात मनातील खदखद बोलून दाखवीत ‘स्वत:च्या राजकारणासाठी ‘गोकुळ’चा वापर करू नका,’ असा सबुरीचा सल्लाही दिला. या सल्ल्यानंतर महाडिक व पाटील यांना किमान ‘गोकुळ’बाबत तरी संयमाने वागावेच लागेल. पी. एन. पाटील यांचा सबुरीचा सल्ला उत्पादकांसह दोन्ही नेत्यांच्या भल्याचा आहे. दोघांच्या भांडणात सामान्यांच्या अर्थवाहिनीला धक्का लागला तर उत्पादक उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही.‘पी. एन.’ यांची सावध भूमिका-पी. एन. पाटील यांची १९९५ पासूनची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर त्यांच्या पाचपैकी चार विधानसभा निवडणुकीतील पराभव पक्षांतर्गत राजकारणामुळेच झाला आहे. ज्यांच्यासाठी विरोधकांसह स्वपक्षियांना अंगावर घेतले तेही ऐन वेळी आपले रंग दाखवीत असल्याने त्यांनी आता थोडी सावध भूमिका घेणेच पसंत केल्याची चर्चा आहे.संचालकांच्या सवयी बदलणे गरजेचे ‘गोकुळ’चे संचालकपद मानाचे आहेच; त्याबरोबर तेथील बडदास्तीमुळे ते अधिक चर्चेत राहिले. आमदारकी नको; पण संचालकपद द्या, अशी चर्चा होण्यामागे हेच कारण आहे. येथून पाठीमागे दूध उत्पादकांमध्ये जागृती नव्हती, त्यावेळेला कसेही वागले तरी कोणी विचारीत नव्हते. आता बहुतांश दूध उत्पादक हे तरुण व सुशिक्षित असल्याने दहा दिवसांचा हिशेब मांडला जातो. त्यामुळे पूर्वीच्यासवयींमध्ये संचालकांनी बदल करणे गरजेचे आहे; अन्यथा संघर्ष अटळ आहे.