शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘पी. एन.’ यांचा सल्ला दूध उत्पादकांसह नेत्यांच्याही भल्याचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 16:04 IST

‘गोकुळ’वर लाखो शेतक-यांचे संसार उभे असल्याने राजकीय संघर्षात या अर्थवाहिनीला धक्का लागला तर दूध उत्पादक संपेलच; पण त्याबरोबर जिल्ह्याची आर्थिक घडी कोलमडून पडण्यास वेळ लागणार नाही.

राजाराम लोंढे

कोल्हापूर : ‘गोकुळ’वर लाखो शेतक-यांचे संसार उभे असल्याने राजकीय संघर्षात या अर्थवाहिनीला धक्का लागला तर दूध उत्पादकसंपेलच; पण त्याबरोबर जिल्ह्याची आर्थिक घडी कोलमडून पडण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे पी. एन. पाटील यांनी महादेवराव महाडिक व आमदार सतेज पाटील यांना दिलेला सबुरीचा सल्ला उत्पादकांबरोबरच नेत्यांच्या भल्याचा असेच म्हणावे लागेल.कोल्हापूरचे राजकारण साखर कारखान्यांभोवती फिरत असले तरी अर्थकारण मात्र दूध व्यवसायावरच अवलंबून आहे. पावणेदोन वर्षांनी मिळणा-या उसाच्या पैशातून अल्पभूधारक शेतक-यांच्या जीवनात कधीच स्थैर्य आले नाही. त्यामुळे या शेतक-यांना जगविण्याबरोबरच त्यांचे संसार उभे करण्याचे काम दूध व्यवसायाने, पर्यायाने ‘गोकुळ’ने केले. कोणतीही संस्था राजकारणविरहितराहूच शकत नाही. त्यात ‘गोकुळ’च्या दुधाची चव थोडी न्यारीच असल्याने येथे सत्तेत येणाºयांना हे दूध लवकर मानवते. येथील सत्तेचा वापर करून जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता येते आणि यासाठीच सध्या महाडिक-पाटीलयांच्यामध्ये अस्तित्वाची लढाई सुरू आहे. कोणत्याही संस्थेच्या निवडणुकीनंतर विरोधक किमान चार वर्षे तिकडे फिरकत नाहीत. ‘गोकुळ’बाबतही आतापर्यंत तसेच झाले आहे; पण या वेळेला सतेज पाटील यांनी पहिल्या सर्वसाधारण सभेपासूनच आक्रमक भूमिका घेतली. दुस-या सभेला हजर न राहताच सत्तारूढ गटाच्या अहंपणाने सभा जिंकली. सभा बेकायदेशीरची प्रक्रिया सुरूअसतानाच गाय दूध खरेदी दरातील कपातीचा मुद्दा घेऊन त्यांनी गेले महिनाभर रान उठविले. उत्पादकांच्या दृष्टीने ही भूमिका न्याय्य असल्याने पाटील यांच्या भूमिकेचे स्वागत झाले; पण या मागणीच्या आडून त्यांनी राजकीय उट्टे काढण्यास सुरुवात केल्याने उत्पादकांमध्ये संभ्रमावस्था पसरली.महाडिक-पाटील यांच्यातील वाद कशासाठी, हे जिल्ह्याला नव्याने सांगण्याची गरज नाही. ‘गोकुळ’चे नेतृत्व महाडिक यांच्याबरोबरच पी. एन. पाटील करतात. पण सतेज पाटील यांच्या टीकेचा रोख महाडिक यांच्यावरच राहिल्याने त्यांचा उद्देश लपून राहिलेला नाही.  राजकीय वैरत्वासाठी वेगळी मैदाने आहेत, त्या ठिकाणी ही भूमिका  कदाचित योग्यही असेल; पण सर्वसामान्य माणसांचा संसारज्या संस्थेवर उभा आहे, तिचा वापर करून एकमेकांचे उट्टे काढण्याचा हा प्रकार म्हणजे ‘घर जाळून कोळशाचा व्यापार करणे’ असाच म्हणावा लागेल.दोन्ही नेत्यांतील वादावर शांत बसलेल्या पी. एन. पाटील यांनी मोर्चात मनातील खदखद बोलून दाखवीत ‘स्वत:च्या राजकारणासाठी ‘गोकुळ’चा वापर करू नका,’ असा सबुरीचा सल्लाही दिला. या सल्ल्यानंतर महाडिक व पाटील यांना किमान ‘गोकुळ’बाबत तरी संयमाने वागावेच लागेल. पी. एन. पाटील यांचा सबुरीचा सल्ला उत्पादकांसह दोन्ही नेत्यांच्या भल्याचा आहे. दोघांच्या भांडणात सामान्यांच्या अर्थवाहिनीला धक्का लागला तर उत्पादक उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही.‘पी. एन.’ यांची सावध भूमिका-पी. एन. पाटील यांची १९९५ पासूनची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर त्यांच्या पाचपैकी चार विधानसभा निवडणुकीतील पराभव पक्षांतर्गत राजकारणामुळेच झाला आहे. ज्यांच्यासाठी विरोधकांसह स्वपक्षियांना अंगावर घेतले तेही ऐन वेळी आपले रंग दाखवीत असल्याने त्यांनी आता थोडी सावध भूमिका घेणेच पसंत केल्याची चर्चा आहे.संचालकांच्या सवयी बदलणे गरजेचे ‘गोकुळ’चे संचालकपद मानाचे आहेच; त्याबरोबर तेथील बडदास्तीमुळे ते अधिक चर्चेत राहिले. आमदारकी नको; पण संचालकपद द्या, अशी चर्चा होण्यामागे हेच कारण आहे. येथून पाठीमागे दूध उत्पादकांमध्ये जागृती नव्हती, त्यावेळेला कसेही वागले तरी कोणी विचारीत नव्हते. आता बहुतांश दूध उत्पादक हे तरुण व सुशिक्षित असल्याने दहा दिवसांचा हिशेब मांडला जातो. त्यामुळे पूर्वीच्यासवयींमध्ये संचालकांनी बदल करणे गरजेचे आहे; अन्यथा संघर्ष अटळ आहे.