शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

त्र्यंबोली यात्रेसाठी पी ढबाकचा गजर यंदा चार दिवस

By admin | Updated: July 3, 2017 16:13 IST

आषाढी यात्रेसाठी चारच दिवस मिळणार

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0३ : त्र्यंबोली देवीच्या आषाढी यात्रेसाठी यंदा दोन मंगळवार आणि दोन शुक्रवार असे चारच दिवस मिळणार आहे. शुक्रवापासून (दि. ७) कोल्हापुरात पी ढबाकचा गजर सुरु होणार असून शहरातील पेठापेठांमध्ये, आणि तालीम मंडळांमध्ये याची जय्यत तयारी सुरु झाली आहे.

पंचगंगेला आलेले नवीन पाणी आषाढातील मंगळवार आणि शुक्रवारी त्र्यंबोली देवीला वाहण्याची परंपरा आहे. यासाठी शहरातील प्रत्येके पेठांमधून नदीचे पाणी भरलेले कलश घेवून नागरिक त्र्यंबोली टेकडीवर जातात. या यात्रेसाठी घरटी वर्गणी गोळा केली जाते. आषाढ महिना सुरु होवून आठ दिवस झाले असले तरी पंढरपूरला गेलेले वारकर परत आल्याशिवाय आणि आषाढी एकादशी झाल्याशिवाय या यात्रेला प्रारंभ होत नाही.

मंगळवारीच एकादशी असल्याने त्र्यंबोली यात्रेचा हा दिवस गेला. त्यामुळे शुक्रवारपासून (दि.७) यात्रेला खऱ्या अर्थाने सुरवात होईल. पुढील आठवड्यातील मंगळवार (दि. ११) आणि शुक्रवार (दि.१४) या दोन दिवशी भाविकांची मोठी गर्दी असणार आहे. त्यानंतरच्या शुक्रवारी (दि.२१) प्रदोष असल्याने या दिवशीही त्र्यंबोली यात्रा साजरी करता येणार नाही.

रविवारी (दि.२३) अमावस्या आहे. त्यामुळे यंदा या यात्रेसाठी दोन मंगळवार आणि दोन शुक्रवार असे चारच दिवस मिळणार आहेत. यामुळे आता शहरातील सर्व गल्ली बोळांमध्ये आणि पेठापेठांमधील फलकांवर त्र्यंबोली यात्रेची तारीख आणि वर्गणीची रक्कम नोंद करण्यात आली आहे. महागाई वाढल्याने वर्गणीचा दरही अडीचशे करण्यात आला आहे.