शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

‘पी. डी.’, सरनोबतांकडे एवढी प्रॉपर्टी आली कोठून?

By admin | Updated: September 23, 2015 00:59 IST

मानसिंगराव जाधव यांचा सवाल : आमच्या हेतूवर शंका घेण्यापेक्षा त्यांचा कारभार आठवावा

राजाराम लोंढे -कोल्हापूर ==शेतकरी संघाच्या निवडणुकीत सत्तारूढ पॅनेलच्या नेत्यांसह उमेदवारांच्या हेतूबद्दल शंका घेणारे पी. डी. पाटील, धनाजीराव सरनोबत व सुरेश देसाई यांच्याकडे एवढी मालमत्ता आली कोठून? असा सवाल करीत, या मंडळींच्या ताब्यात संघ असताना त्यांनी काय दिवे लावलेत, हे सभासद जाणून असल्याची टीका ‘मोहिते-नेसरीकर सत्तारूढ पॅनेल’चे प्रमुख शोभादेवी शिंदे-नेसरीकर व मानसिंगराव जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. शोभादेवी शिंदे आणि मानसिंगराव जाधव म्हणाले, गेल्या पाच वर्षांत आम्ही अत्यंत काटकसरीचा कारभार करून संघाला ऊर्जितावस्थेत आणण्याचा प्रयत्न केला. संघावरील कर्जाचा बोजा कमी करीत सभासदांना पाच वर्षांत सात टक्क्यांपासून १२ टक्क्यांपर्यंत लाभांश दिला. एकेकाळी आशिया खंडात नावाजलेल्या संघाचे वैभव परत आणण्यासाठी गेली पाच वर्षे सर्वांनी मनापासून काम केले. रुकडी येथील खताचा कारखाना सुरू केला, कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले. शाखा सक्षम करून व्यवसाय वाढविला. डिझेल विभाग, चटणी-मसाले, खते हे विभाग नफ्यात आणले. संघाचे हित डोळ्यांसमोर ठेवूनच आम्ही वाटचाल केली. सत्ताधारी पॅनेलमध्ये अनुभवी चेहरे नसल्याची टीका विरोधक करीत आहेत; पण गेली ५५ वर्षे आपण सहकारात काम करीत आहोत. साखर उद्योगात संपूर्ण महाराष्ट्रात माझी ओळख आहे. त्याचबरोबर राजू पाटील, दिलीप पाटील, व्यंकाप्पा भोसले, आदी मंडळींनी सहकारात आपला ठसा उमटविला आहे. विरोधकांपेक्षा कितीतरी पटींनी अनुभवी व स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार आमच्याकडे असल्याचे मानसिंगराव जाधव यांनी सांगितले. जे आमच्यावर टीका करीत आहेत, त्यांच्या काळात संघाची अवस्था काय झाली, याचे आत्मचिंतन करावे; मग आमच्यावर बोलावे. या मंडळींच्या कारभारामुळे आपण बदनाम होऊ म्हणून मी आणि स्वर्गीय शामराव शिंदे यांनी राजीनामा दिला होता. आम्हाला कधीच सत्तेची हाव नाही; पण आमच्या हेतूवर शंका घेणारे पी. डी. पाटील, सुरेश देसाई व धनाजीराव सरनोबत यांच्याकडे एवढी मालमत्ता आली कशी? याचे आत्मचिंंतन करावे, असा टोलाही त्यांनी लगावला. सत्तेच्या लालसेपोटी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो नाही. ‘मोहिते-नेसरीकर’ यांच्या विचारांवर प्रेम करणारी मंडळी आहोत. त्यांच्या विचारांना तडा जाईल, त्या दिवशी संघातून बाहेर पडू, असे जाधव व शोभादेवी शिंदे यांनी सांगितले.