शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

गुऱ्हाळघर मालकही आर्थिक अरिष्टात..

By admin | Updated: November 21, 2014 00:36 IST

२५ ते ३० हवे मनुष्यबळ : गुऱ्हाळघर उभारणीस २५ लाखांचा खर्च .

प्रकाश पाटील - कोपार्डे -ग्रामीण भागात ज्यांची चार ते पाच एकर शेती आहे, असे शेतकरीच शेती सांभाळत छोटासा व्यवसाय म्हणून गुऱ्हाळघराची उभारणी करतात. या व्यवसायासाठी लागणारा पैसा, मनुष्यबळ, स्थावर मालमत्ता गुंतविताना गुऱ्हाळघर मालकांच्या आवाक्याबाहेर गेले असून, एका गुऱ्हाळघरासाठी किमान २५ लाखांची गुंतवणूक करून स्वत:ची एकर, दीड एकर जमीन गुंतवावी लागते.एक गुऱ्हाळघर उभा करावयाचे झाल्यास त्यासाठी स्वत:ची किमान एकरभर जमीन लागते. गुऱ्हाळघरासाठी ऊसतोड मजुरांसह घाणकरी, गुळवे अशी एकूण २५ मजुरांची आवश्यकता असून, प्रत्येक मजुराला त्याच्या कामाप्रमाणे २५० ते ४०० रुपये मजुरी द्यावी लागते. हे मजूर आपल्याकडे हंगामात कामासाठी यावेत यासाठी १५ ते २० हजार रुपये अ‍ॅडव्हान्स द्यावा लागतो. गुऱ्हाळघर उभारणारे शेतकरी हे सर्वसामान्य असतात. त्यामुळे त्यांना पैसे उभा करण्यासाठी बॅँक, अडते व व्यापारी यांच्याकडे बिगर हंगामात हात पसरावे लागतात. यात बॅँका जरी कमी व्याजदराने पैसे देत असले तरी व्यापारी व अडत दुकानदार उचललेल्या पैशावर २० ते २५ टक्के व्याजदर लावतात. एवढे करून जर गुळाचे दर पडल्यास शेतकरी आपला ऊस गुऱ्हाळघराला पाठवत नाहीत. त्यावेळी त्यावेळी स्वत:चा ऊस गाळावा लागतो. कारण मजुराची सध्या २५० रुपये दिवसाला मजुरी व एक किलो गूळ द्यावा लागतो. तर गुळव्याला ४०० रुपये व दोन किलो गूळ द्यावा लागतो. दिवसाला किमान या मजुरांची सहा हजार २५० रुपये मजुरी होते. जिल्ह्यातील १३०० गुऱ्हाळघरांपैकी केवळ ४२५ गुऱ्हाळघरे सुरू आहेत. शिंदेवाडी (ता. करवीर) येथील गुऱ्हाळघर मालकांने तर, गुऱ्हाळघर म्हणजे हत्ती पाळण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया देताना यावर्षी गुऱ्हाळघर बंद करून ट्रॅक्टर कारखान्याला लावल्याची प्रतिक्रिया दिली.