शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बाबांची मात, काकांची वात

By admin | Updated: March 21, 2017 23:26 IST

बाबांची मात, काकांची वात

श्रीनिवास नागेचमत्कार घडविणाऱ्यांचे दात घशात घालत भाजपनं अखेर जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवलाच. भाजप जेवढा सत्तेच्या जवळ होता, तेवढा काँग्रेस-राष्ट्रवादीचा जोडा दूर होता. एकतर सर्वाधिक संख्याबळ, त्यात केंद्रासह राज्यातली सत्ता, सत्तेत भागीदार असलेल्या घटक पक्ष-आघाड्यांकडंच असलेल्या सत्तेच्या चाव्या, जुळणीसाठी कामाला लागलेली तगडी मंडळी, शिवाय राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या विरोधात एकवटलेले विरोधक यामुळं भाजपची जुळवाजुळव जमली.जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालानंतर भाजप २५ जागा घेऊन सर्वांत मोठा पक्ष बनला तरी ३१च्या ‘मॅजिक फिगर’साठी जुळणी सोपी दिसत नव्हती. कारण चार जागा हातात असलेल्या रयत आघाडीच्या काही नेत्यांनी खोडा घातला होता. आघाडीच्या नेत्यांचा राग कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांवर होता. सदाभाऊंनी परस्परच भाजपला पाठिंबा जाहीर करून टाकला होता. (स्वत:चा एकही सदस्य नसताना!) त्यामुळं महाडिक गटानं खमकेपणा दाखवत निर्णय झाला नसल्याचं ठासून सांगितलं. इस्लामपूर नगरपालिकेतली राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकण्याचं श्रेय सदाभाऊंनी एकट्यानं लाटलं होतं, मुख्यमंत्र्यांकडून सत्कार करवून घेतला होता, शिवाय इस्लामपुरातल्या महाआरोग्य शिबिरावेळी महाडिकांना निमंत्रणही दिलं नव्हतं, याची खदखद महाडिकांच्या पवित्र्यातून बाहेर पडली. तिला खासदार राजू शेट्टी-सदाभाऊ यांच्यातल्या शीतयुद्धाचीही जोड होती. दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे आमदार पतंगराव कदम आणि जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम या बंधूद्वयांनी जयंत पाटील यांना गाठलं. त्यांना जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता येऊ द्यायची नव्हती. भाजप सत्तेत आला तर पृथ्वीराज देशमुखांचं वजन आणखी वाढणार होतं. (पलूस-कडेगावात आठपैकी सात जागा आल्यानं आधी ते वाढलं होतंच..) त्यात संग्रामसिंह देशमुख अध्यक्ष झाले तर कदम गटासाठी धोक्याचं होतं. त्यामुळं त्यांनी जुळवाजुळव सुरू केली. राष्ट्रवादीकडं काँग्रेसपेक्षा जादा जागा असूनही जयंतरावांना मागं ठेवलं गेलं, कारण त्यांना असणारा तीव्र विरोध. रयत आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अपक्ष, अजितराव घोरपडे गट आणि शिवसेना यांच्यासोबत बोलणी सुरू झाली. तिकडं भाजपनं दबावतंत्र सुरू केलं. रयत आघाडी, अपक्षाला घेऊन पार मुंबईपर्यंतच्या वाऱ्या केल्या. ‘कमिटमेंट’चा भडीमार केला आणि रयत आघाडीनं राजू शेट्टींचा विरोध (अप्रत्यक्ष) असतानाही ‘कमळ’ जवळ केलं. या आघाडीत महाडिकांच्या दोन, तर काँग्रेसच्या सी. बी. पाटील गटाची आणि वाळव्याच्या नायकवडी गटाची प्रत्येकी एक जागा होती. महाडिक, सी. बी. पाटील यांच्यासह भाजपला आयुष्यभर जवळ न केलेल्या नागनाथअण्णा नायकवडींच्या वारसदारांनी भाजपशी हातमिळवणी केली. अर्थात यामागं जयंतरावांना पर्यायानं राष्ट्रवादीला विरोध, हे मूळ कारण होतंच, पण उत्तर आधुनिकतावादाला चिकटून आलेल्या तत्त्वांच्या तिलांजलीवरही यामुळं शिक्कामोर्तब झालं. हा बदलत्या राजकारणाचा अस्सल नमुना.रयत आघाडीनं हिरवा कंदील दाखवताच भाजपनं शिवसेनेवर फासे टाकले. सांगलीकडं सोलापुरातूनच पाहणारे पालकमंत्री सुभाषबापू देशमुख स्वत: जातीनं इथं आले. त्यांनी भाजपचे आमदार अनिल बाबर यांना गेस्ट हाऊसवर येण्याचं निमंत्रण धाडलं. काँग्रेसचं गणित जुळत नसल्याचं स्पष्ट होताच मोहनराव कदमांशी असलेला ‘याराना’ बाजूला ठेवत बाबरही सुभाषबापूंकडं गेले. (अलीकडं त्यांचा संजयकाकांशी ‘दोस्ताना’ वाढलाय.) भाजप सरकारच्या हातात असलेली टेंभू योजनांची कामं आणि नागेवाडी साखर कारखान्याचा प्रश्न कामी आला. सहकार खातं हातात असलेल्या सुभाषबापूंनी दुखरी नस दाबली. झालं... काँग्रेसनं दिलेल्या अध्यक्षपदाच्या ‘आॅफर’वर पाणी सोडत बाबर यांनी भाजपकडून मुलासाठी उपाध्यक्षपद घेतलं! ‘सत्तेचा महिमा’, तो हाच! ...काँग्रेस-राष्ट्रवादीला शक्य असताना जयंतरावांनी म्हणावा तेवढा जोर लावला नाही. निवडीच्या आधल्या दिवशी ते ‘पिक्चर’मध्ये आले. पतंगरावांच्या बंगल्यावर जाऊन त्यांनी ‘सिक्सर’ मारण्याचा प्रयत्न केला, पण भाजपनं टाकलेल्या गुगलीनं आणि लावलेल्या ‘टाईट फिल्डिंग’मुळं जमलं नाही. गणितं फिसकटल्यानं काँग्रेसला हातावर हात चोळत बसावं लागलं.जाता-जाता : अध्यक्षपदासाठी संग्रामसिंह देशमुख यांचं नाव जाहीर होताच संजयकाका गटात सन्नाटा पसरला. संजयकाकांनी चुलते डी. के. पाटलांचं नाव मागं घेतलं. मग शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे अर्ज भरण्यासाठी पुढं आले. (ही काकांचीच चाल.) अर्थात डोंगरेंची इच्छा आधीपासूनच प्रबळ होती. ते अर्ज भरण्यासाठी आले, पण राष्ट्रवादीच्या सदस्यांसोबत! पृथ्वीराजबाबांचं काळीज लक्कदिशी हललं... अखेर सुभाषबापू देशमुखांसोबत जिल्हा परिषदेच्या आवारात आलेले संजयकाका पुढं आले आणि त्यांनी डोंगरेंना अर्ज भरताभरता थांबवलं... भाजपच्या लेखी एक बंड थंड झालं... पण काकांनी पेटवलेली वात बाबांच्या नजरेतून सुटली नाही...