शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

बाबांची मात, काकांची वात

By admin | Updated: March 21, 2017 23:26 IST

बाबांची मात, काकांची वात

श्रीनिवास नागेचमत्कार घडविणाऱ्यांचे दात घशात घालत भाजपनं अखेर जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवलाच. भाजप जेवढा सत्तेच्या जवळ होता, तेवढा काँग्रेस-राष्ट्रवादीचा जोडा दूर होता. एकतर सर्वाधिक संख्याबळ, त्यात केंद्रासह राज्यातली सत्ता, सत्तेत भागीदार असलेल्या घटक पक्ष-आघाड्यांकडंच असलेल्या सत्तेच्या चाव्या, जुळणीसाठी कामाला लागलेली तगडी मंडळी, शिवाय राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या विरोधात एकवटलेले विरोधक यामुळं भाजपची जुळवाजुळव जमली.जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालानंतर भाजप २५ जागा घेऊन सर्वांत मोठा पक्ष बनला तरी ३१च्या ‘मॅजिक फिगर’साठी जुळणी सोपी दिसत नव्हती. कारण चार जागा हातात असलेल्या रयत आघाडीच्या काही नेत्यांनी खोडा घातला होता. आघाडीच्या नेत्यांचा राग कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांवर होता. सदाभाऊंनी परस्परच भाजपला पाठिंबा जाहीर करून टाकला होता. (स्वत:चा एकही सदस्य नसताना!) त्यामुळं महाडिक गटानं खमकेपणा दाखवत निर्णय झाला नसल्याचं ठासून सांगितलं. इस्लामपूर नगरपालिकेतली राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकण्याचं श्रेय सदाभाऊंनी एकट्यानं लाटलं होतं, मुख्यमंत्र्यांकडून सत्कार करवून घेतला होता, शिवाय इस्लामपुरातल्या महाआरोग्य शिबिरावेळी महाडिकांना निमंत्रणही दिलं नव्हतं, याची खदखद महाडिकांच्या पवित्र्यातून बाहेर पडली. तिला खासदार राजू शेट्टी-सदाभाऊ यांच्यातल्या शीतयुद्धाचीही जोड होती. दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे आमदार पतंगराव कदम आणि जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम या बंधूद्वयांनी जयंत पाटील यांना गाठलं. त्यांना जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता येऊ द्यायची नव्हती. भाजप सत्तेत आला तर पृथ्वीराज देशमुखांचं वजन आणखी वाढणार होतं. (पलूस-कडेगावात आठपैकी सात जागा आल्यानं आधी ते वाढलं होतंच..) त्यात संग्रामसिंह देशमुख अध्यक्ष झाले तर कदम गटासाठी धोक्याचं होतं. त्यामुळं त्यांनी जुळवाजुळव सुरू केली. राष्ट्रवादीकडं काँग्रेसपेक्षा जादा जागा असूनही जयंतरावांना मागं ठेवलं गेलं, कारण त्यांना असणारा तीव्र विरोध. रयत आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अपक्ष, अजितराव घोरपडे गट आणि शिवसेना यांच्यासोबत बोलणी सुरू झाली. तिकडं भाजपनं दबावतंत्र सुरू केलं. रयत आघाडी, अपक्षाला घेऊन पार मुंबईपर्यंतच्या वाऱ्या केल्या. ‘कमिटमेंट’चा भडीमार केला आणि रयत आघाडीनं राजू शेट्टींचा विरोध (अप्रत्यक्ष) असतानाही ‘कमळ’ जवळ केलं. या आघाडीत महाडिकांच्या दोन, तर काँग्रेसच्या सी. बी. पाटील गटाची आणि वाळव्याच्या नायकवडी गटाची प्रत्येकी एक जागा होती. महाडिक, सी. बी. पाटील यांच्यासह भाजपला आयुष्यभर जवळ न केलेल्या नागनाथअण्णा नायकवडींच्या वारसदारांनी भाजपशी हातमिळवणी केली. अर्थात यामागं जयंतरावांना पर्यायानं राष्ट्रवादीला विरोध, हे मूळ कारण होतंच, पण उत्तर आधुनिकतावादाला चिकटून आलेल्या तत्त्वांच्या तिलांजलीवरही यामुळं शिक्कामोर्तब झालं. हा बदलत्या राजकारणाचा अस्सल नमुना.रयत आघाडीनं हिरवा कंदील दाखवताच भाजपनं शिवसेनेवर फासे टाकले. सांगलीकडं सोलापुरातूनच पाहणारे पालकमंत्री सुभाषबापू देशमुख स्वत: जातीनं इथं आले. त्यांनी भाजपचे आमदार अनिल बाबर यांना गेस्ट हाऊसवर येण्याचं निमंत्रण धाडलं. काँग्रेसचं गणित जुळत नसल्याचं स्पष्ट होताच मोहनराव कदमांशी असलेला ‘याराना’ बाजूला ठेवत बाबरही सुभाषबापूंकडं गेले. (अलीकडं त्यांचा संजयकाकांशी ‘दोस्ताना’ वाढलाय.) भाजप सरकारच्या हातात असलेली टेंभू योजनांची कामं आणि नागेवाडी साखर कारखान्याचा प्रश्न कामी आला. सहकार खातं हातात असलेल्या सुभाषबापूंनी दुखरी नस दाबली. झालं... काँग्रेसनं दिलेल्या अध्यक्षपदाच्या ‘आॅफर’वर पाणी सोडत बाबर यांनी भाजपकडून मुलासाठी उपाध्यक्षपद घेतलं! ‘सत्तेचा महिमा’, तो हाच! ...काँग्रेस-राष्ट्रवादीला शक्य असताना जयंतरावांनी म्हणावा तेवढा जोर लावला नाही. निवडीच्या आधल्या दिवशी ते ‘पिक्चर’मध्ये आले. पतंगरावांच्या बंगल्यावर जाऊन त्यांनी ‘सिक्सर’ मारण्याचा प्रयत्न केला, पण भाजपनं टाकलेल्या गुगलीनं आणि लावलेल्या ‘टाईट फिल्डिंग’मुळं जमलं नाही. गणितं फिसकटल्यानं काँग्रेसला हातावर हात चोळत बसावं लागलं.जाता-जाता : अध्यक्षपदासाठी संग्रामसिंह देशमुख यांचं नाव जाहीर होताच संजयकाका गटात सन्नाटा पसरला. संजयकाकांनी चुलते डी. के. पाटलांचं नाव मागं घेतलं. मग शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे अर्ज भरण्यासाठी पुढं आले. (ही काकांचीच चाल.) अर्थात डोंगरेंची इच्छा आधीपासूनच प्रबळ होती. ते अर्ज भरण्यासाठी आले, पण राष्ट्रवादीच्या सदस्यांसोबत! पृथ्वीराजबाबांचं काळीज लक्कदिशी हललं... अखेर सुभाषबापू देशमुखांसोबत जिल्हा परिषदेच्या आवारात आलेले संजयकाका पुढं आले आणि त्यांनी डोंगरेंना अर्ज भरताभरता थांबवलं... भाजपच्या लेखी एक बंड थंड झालं... पण काकांनी पेटवलेली वात बाबांच्या नजरेतून सुटली नाही...