शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

परिक्षेत्रात शंभरपेक्षा जास्त बेकायदेशीर सुरक्षारक्षक कंपन्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 11:22 IST

कोल्हापूर शहरात तीन व्यक्तींवर गुन्हे दाखल झाल्यानंतर बेकायदेशीर सुरक्षारक्षक कंपन्या चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अशा व्यक्तींवर महाराष्ट्र खासगी सुरक्षारक्षक अधिनियम १९८१ कलम २० मधील १ व २ नुसार गुन्हे दाखल केले जात आहेत.

ठळक मुद्देशासनाच्या नियमांत सर्व कागदपत्रे बसत असतील तर त्याला मंजुरी दिली जाते. त्यानंतरच असा व्यवसाय करणे गरजेचे असते. या नोंदणीसाठी ५ ते १५ हजार रुपये खर्च येतो.

एकनाथ पाटीलकोल्हापूर : शासनमान्य नोंदणीला फाटा देऊन परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमध्ये अपार्टमेंट, रुग्णालये, कारखाने यांसह इतर विविध ठिकाणी बेकायदेशीर खासगी सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या शंभरपेक्षा जास्त कंपन्या आहेत. कमी पगारात सुरक्षारक्षक नियुक्त करून भरमसाट पैसा घरबसल्या मिळविणा-या बांडगुळांचा बीमोड करण्यासाठी पोलिसांनी कारवाईसत्र सुरू केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

अपार्टमेंट, रुग्णालये, कारखाने, कंपन्या, कार्यालये, लग्नसमारंभासह इतर सोहळ्यांमध्ये खासगी सुरक्षारक्षक दिसून येतात. साधारणत: ४० ते ६० वयोगटातील व्यक्ती या ठिकाणी काम करताना दिसतात. त्यांना सुरक्षारक्षक कंपनीकडून ड्रेसकोडही दिला जातो. परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमध्ये शासनमान्य नोंदणीकृत १४५ सुरक्षारक्षक संस्था असल्याची नोंद विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडे आहे; परंतु काही लोक स्वत: काही वर्षे कोल्हापूर, पुणे, मुंबई यांसह विविध जिल्ह्यांमध्ये खासगी सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करून तिच्या अनुभवावर कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या शहरांमध्ये सुरक्षारक्षक पुरविण्याचे काम करीत असून, शासनाचा महसूल बुडवीत असल्याचे निदर्शनास आले.

परिक्षेत्रात नोंदणी न करता शंभरपेक्षा जास्त बेकायदेशीर सुरक्षारक्षक कंपन्या असल्याच्या तक्रारी आहेत. त्यानुसार विनापरवाना खासगी सुरक्षारक्षक पुरविणाºया व्यक्ती व कंपन्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी दिले. कोल्हापूर शहरात तीन व्यक्तींवर गुन्हे दाखल झाल्यानंतर बेकायदेशीर सुरक्षारक्षक कंपन्या चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अशा व्यक्तींवर महाराष्ट्र खासगी सुरक्षारक्षक अधिनियम १९८१ कलम २० मधील १ व २ नुसार गुन्हे दाखल केले जात आहेत. 

अशी होते नोंदणीही सुरक्षा पुरविण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर अर्जदार राहत असलेल्या हद्दीतील पोलीस ठाण्याकडे पडताळणीसाठी तो अर्ज जातो. या ठिकाणी अर्जदाराचा जबाब, चारित्र्य पडताळणी दाखला, रहिवासी दाखला, आजूबाजूच्या चार व्यक्तींचे जबाब, कंपनी स्थापन केलेल्या कार्यालयाची कागदपत्रे, पॅनकार्ड, आधारकार्ड, आयकर भरलेली कागदपत्रे जमा करून घेतली जातात. तेथून तो अर्ज पोलीस उपअधीक्षक कार्यालयाकडून अधीक्षक कार्यालयाकडे येतो. या ठिकाणी पोलीस अधीक्षकांची सही झाल्यानंतर तो विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडे येतो. शासनाच्या नियमांत सर्व कागदपत्रे बसत असतील तर त्याला मंजुरी दिली जाते. त्यानंतरच असा व्यवसाय करणे गरजेचे असते. या नोंदणीसाठी ५ ते १५ हजार रुपये खर्च येतो. 

घरबसल्या भरमसाट पैसाखासगी सुरक्षारक्षक कंपन्या चालविणा-या व्यक्ती अपार्टमेंट, रुग्णालये, कारखाने, कंपन्या, कार्यालये यांना सुरक्षारक्षक पुरवून त्यांच्याकडून महिन्याला दहा ते बारा हजार रुपये प्रत्येक व्यक्तीमागे घेतात. सुरक्षारक्षकांच्या हातावर ते सहा हजार रुपयेच ठेवतात. उर्वरित चार ते सहा हजार रुपये स्वत:ला ठेवतात. घरबसल्या भरमसाट पैसा मिळत असल्याने नवनवीन सुरक्षारक्षक कंपन्या पुढे येत आहेत. नोंदणी केल्यानंतर कंपनीत रुजू होणा-या सुरक्षारक्षकाला शासनाच्या नियमानुसार पगार, फंड, विमा, पेन्शन द्यावी लागते. त्यामध्ये कंपनी चालविणा-या व्यक्तींचा फायदा होत नाही. त्यांना एका व्यक्तीमागे एक हजार रुपयेच राहतात. त्यामुळे नोंदणीला फाटा देऊन बेकायदेशीर सुरक्षारक्षक कंपनी चालविणा-यांचे पेव फुटले आहे. 

 

बेकायदेशीर खासगी सुरक्षारक्षक कंपनी चालविणाºयांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या कंपनीने कायदेशीर परवानगी प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही, याची खात्री संबंधितांनी करून सुरक्षारक्षक ठेवावेत.- डॉ. सुहास वारके : विशेष पोलीस महानिरीक्षक

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजी