शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

कोल्हापूर बंदला उस्फुर्त प्रतिसाद, व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांचा पाठींबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 14:28 IST

Bharat Bandh, FarmarStrike, Kolhapurnews केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदला कोल्हापूरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरासह ग्रामीण भागात व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांनी पाठींबा दिला.

ठळक मुद्देकोल्हापूर बंदला उस्फुर्त प्रतिसाद, व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांचा पाठींबा शहरातून दुचाकी रॅली, विधेयकाची होळी

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदलाकोल्हापूरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरासह ग्रामीण भागात व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांनी पाठींबा दिला.

शिवसेनेने शहरातून रॅली काढून केंद्राचा निषेध नोंदवला सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ऐतिहासिक बिंदू चौकात एकत्रीत येत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वाभाडे काढले. ह्यस्वाभिमानीह्णने शिरोळमध्ये कृषी विधेयकांची होळी केली.केंद्र सरकारने तीन कृषी विधेयक अंमलात आणल्याने त्याविरोधात पंजाब, हरियाणा येथील शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरु केले आहे. त्याला पाठींबा देण्यासाठी देशातील राजकीय पक्षांनी भारत बंदची हाक दिली होती. कोल्हापूरात त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ग्रामीण भागात व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला. मूरगूड येथे राधानगरी ते निपाणी राज्यमार्ग रोखून धरला. कोल्हापूर शहराततील व्यापाऱ्यांनीही पाठींबा दिला. राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी आदी बाजारपेठेत दुकाने दिवसभर बंद होती. औषध, पेट्रोलपंप वगळता इतर सगळे व्यवहार ठप्प होते. शहरातील रस्त्यांवर वर्दळ होती.कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, माकप, भाकप, शेकाप यासह वीस राजकीय पक्षांनी एकत्रीत केंद्र सरकारचा निषेध केला. बिंदू चौकात एकत्रित येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर आसूड ओढले. ह्यस्वाभिमानीह्णचे नेते राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, शेतकरी एकदा अशांत झाला तर कोणालाही राज्यकारभार करता येणार नाही.कोल्हापूर बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी कांदा-बटाटा, भाजीपाला, फळे, गूळाचे सौदे बंद केले होते. त्याचबरोबर शहरातील प्रमुख पाडळकर मार्केट, कपिलतीर्थ, गंगावेश येथील भाजीमंडई ओस पडल्या होत्या. बाजार समितीमध्ये भाजीपाला, फळे, गुळाची आवक न झाल्याने तिथे सुमारे साडे तीन कोटीची उलाढाल ठप्प झाली. दूधाचे संकलन सुरू असले तरी त्यावरही परिणाम झाला आहे. छोटीमोठी दुकाने बंद राहिल्याने कोट्यावधीची उलाढाल थांबली. 

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदFarmer strikeशेतकरी संपkolhapurकोल्हापूर