शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

‘आपले सरकार’ची जनतेशी नाळ तुटली: शासनाच्या पोर्टलवर न्याय मिळणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 11:37 IST

राज्यातील भाजप सरकारने सत्तेत आल्यावर नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी ‘आपले सरकार’ हे पोर्टल सुरू केले; परंतु नावीन्यपूर्ण असलेला हा उपक्रम नव्याची नवलाईच ठरल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्दे‘आपले सरकार’ची जनतेशी नाळ तुटली: शासनाच्या पोर्टलवर न्याय मिळणे बंद२१ दिवसांत निर्णय घेण्याचे धोरण पडले मागे, तक्रारींवर दोन-दोन वर्षे प्रतिसादच नाही

प्रवीण देसाई

कोल्हापूर : राज्यातील भाजप सरकारने सत्तेत आल्यावर नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी ‘आपले सरकार’ हे पोर्टल सुरू केले; परंतु नावीन्यपूर्ण असलेला हा उपक्रम नव्याची नवलाईच ठरल्याचे दिसत आहे. २१ दिवसांत तक्रारीवर कार्यवाही होणे अपेक्षित असताना दोन-दोन वर्षे होऊनही कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे जनता आणि मंत्रालय अंतर कमी करण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या या उपक्रमाची स्थिती पाहता, शासनाची जनतेशी असलेली नाळ तुटत चालली की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.राज्यात भाजपप्रणीत सरकार २०१४ मध्ये सत्तेत आले. त्यानंतर त्याने जनहिताचे काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी ‘आपले सरकार’ हे पोर्टल सुरू केले. या माध्यमातून नागरिकांना थेट तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

तसेच तक्रार आॅनलाईनद्वारे दाखल केल्यावर २१ दिवसांत कार्यवाही होणे अपेक्षित होते. तसे सुरुवातीला वर्षभर तरी चांगल्या पद्धतीने नागरिकांच्यातक्रारींची दखल घेऊन त्यांना न्याय देण्याचे काम झाले. सुरुवातीला चांगल्या पद्धतीने सुरू असलेल्या या उपक्रमातून नागरिकांच्या तक्रारींवर कार्यवाही करणे बंद केले.

महिला व बाल विकास विभागाशी संबंधित १५ हून अधिक तक्रारी या दोन वर्षांत दाखल केल्या आहेत; परंतु त्याला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, हे शासनाच्या एका प्रातिनिधिक विभागाचे चित्र आहे. इतर विभागांसंबंधीही जवळपास अशीच स्थिती असल्याचे बोलले जात आहे.

या तक्रारींची दखलच नाहीमहिला आणि बाल विकास विभागाशी संबंधित बालकल्याण समिती सुविधांसंदर्भात ३१ आॅगस्ट २०१७ रोजी तक्रार क्रमांक ८६७ अन्वये दाखल तक्रारीची सद्य:स्थिती ‘जैसे थे’ आहे. ३१ आॅगस्ट २०१७ च्या नवीन बालगृह मान्यतासंदर्भात दिलेली तक्रार क्रमांक ८६८, २४ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र बाल न्याय नियमानुसार ‘एमएसडब्ल्यू’विषय पदाधिकारी नियुक्तीमध्ये वगळल्याची तक्रार क्रमांक ११२९ अन्वये आॅनलाईनद्वारे अर्ज दाखल आहे. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही; तसेच कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

या उपक्रमाची सुरुवात चांगली झाली होती. काही तक्रारींवर सुरुवातीच्या टप्प्यात चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत २१ दिवसांत निर्णयही झाले. तसेच निर्णय झाल्यावरही मेलद्वारे ‘आम्ही केलेल्या कार्यवाहीवर आपण समाधानी आहात का?’ अशी असा फीडबॅकही घेतला जात होता. मात्र ही शासनाची नव्याची नवलाई वर्षभरानंतर बंदच झाल्याचे दिसत आहे. जवळपास १५ हून अधिक तक्रारी दोन वर्षांत दाखल करूनही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.- अतुल देसाई, अध्यक्ष, आभास फौंडेशन 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर