शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

‘आपले सरकार’ची जनतेशी नाळ तुटली: शासनाच्या पोर्टलवर न्याय मिळणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 11:37 IST

राज्यातील भाजप सरकारने सत्तेत आल्यावर नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी ‘आपले सरकार’ हे पोर्टल सुरू केले; परंतु नावीन्यपूर्ण असलेला हा उपक्रम नव्याची नवलाईच ठरल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्दे‘आपले सरकार’ची जनतेशी नाळ तुटली: शासनाच्या पोर्टलवर न्याय मिळणे बंद२१ दिवसांत निर्णय घेण्याचे धोरण पडले मागे, तक्रारींवर दोन-दोन वर्षे प्रतिसादच नाही

प्रवीण देसाई

कोल्हापूर : राज्यातील भाजप सरकारने सत्तेत आल्यावर नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी ‘आपले सरकार’ हे पोर्टल सुरू केले; परंतु नावीन्यपूर्ण असलेला हा उपक्रम नव्याची नवलाईच ठरल्याचे दिसत आहे. २१ दिवसांत तक्रारीवर कार्यवाही होणे अपेक्षित असताना दोन-दोन वर्षे होऊनही कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे जनता आणि मंत्रालय अंतर कमी करण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या या उपक्रमाची स्थिती पाहता, शासनाची जनतेशी असलेली नाळ तुटत चालली की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.राज्यात भाजपप्रणीत सरकार २०१४ मध्ये सत्तेत आले. त्यानंतर त्याने जनहिताचे काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी ‘आपले सरकार’ हे पोर्टल सुरू केले. या माध्यमातून नागरिकांना थेट तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

तसेच तक्रार आॅनलाईनद्वारे दाखल केल्यावर २१ दिवसांत कार्यवाही होणे अपेक्षित होते. तसे सुरुवातीला वर्षभर तरी चांगल्या पद्धतीने नागरिकांच्यातक्रारींची दखल घेऊन त्यांना न्याय देण्याचे काम झाले. सुरुवातीला चांगल्या पद्धतीने सुरू असलेल्या या उपक्रमातून नागरिकांच्या तक्रारींवर कार्यवाही करणे बंद केले.

महिला व बाल विकास विभागाशी संबंधित १५ हून अधिक तक्रारी या दोन वर्षांत दाखल केल्या आहेत; परंतु त्याला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, हे शासनाच्या एका प्रातिनिधिक विभागाचे चित्र आहे. इतर विभागांसंबंधीही जवळपास अशीच स्थिती असल्याचे बोलले जात आहे.

या तक्रारींची दखलच नाहीमहिला आणि बाल विकास विभागाशी संबंधित बालकल्याण समिती सुविधांसंदर्भात ३१ आॅगस्ट २०१७ रोजी तक्रार क्रमांक ८६७ अन्वये दाखल तक्रारीची सद्य:स्थिती ‘जैसे थे’ आहे. ३१ आॅगस्ट २०१७ च्या नवीन बालगृह मान्यतासंदर्भात दिलेली तक्रार क्रमांक ८६८, २४ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र बाल न्याय नियमानुसार ‘एमएसडब्ल्यू’विषय पदाधिकारी नियुक्तीमध्ये वगळल्याची तक्रार क्रमांक ११२९ अन्वये आॅनलाईनद्वारे अर्ज दाखल आहे. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही; तसेच कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

या उपक्रमाची सुरुवात चांगली झाली होती. काही तक्रारींवर सुरुवातीच्या टप्प्यात चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत २१ दिवसांत निर्णयही झाले. तसेच निर्णय झाल्यावरही मेलद्वारे ‘आम्ही केलेल्या कार्यवाहीवर आपण समाधानी आहात का?’ अशी असा फीडबॅकही घेतला जात होता. मात्र ही शासनाची नव्याची नवलाई वर्षभरानंतर बंदच झाल्याचे दिसत आहे. जवळपास १५ हून अधिक तक्रारी दोन वर्षांत दाखल करूनही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.- अतुल देसाई, अध्यक्ष, आभास फौंडेशन 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर