शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

पुढील पिढीसाठी निसर्गसंपत्ती जपणे आपले कर्तव्य : मधुकर बाचूळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 14:57 IST

सध्या विकासाच्या नावाखाली जंगले जाळून टाकली जात आहेत; पण त्यातून होणारी हानी ही कधीही न भरून काढता येणारी, मोजदाद न करता येणारी आहे. आपण ज्या पश्चिम घाटात राहतो, तो भूभाग निसर्गाची मुक्त उधळण असलेला आहे. तेथील निसर्गसंपत्ती पुढच्या पिढीसाठी जपून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी येथे केले.

ठळक मुद्दे पुढील पिढीसाठी निसर्गसंपत्ती जपणे आपले कर्तव्य : मधुकर बाचूळकरशिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागात व्याख्यान

कोल्हापूर : सध्या विकासाच्या नावाखाली जंगले जाळून टाकली जात आहेत; पण त्यातून होणारी हानी ही कधीही न भरून काढता येणारी, मोजदाद न करता येणारी आहे. आपण ज्या पश्चिम घाटात राहतो, तो भूभाग निसर्गाची मुक्त उधळण असलेला आहे. तेथील निसर्गसंपत्ती पुढच्या पिढीसाठी जपून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्यापर्यावरणशास्त्र विभागातर्फे मंगळवारी (दि. १८) आयोजित केलेल्या प्रा. नरहर विष्णू कारेकर या विज्ञानविषयक व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘जैवविविधतेचे मानवी जीवनावरील परिणाम’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत होते.

डॉ. बाचूळकर म्हणाले, पृथ्वीतलावर असलेल्या फक्त १८ ते २० टक्के जैवविविधतेचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास झाला आहे. पृथ्वीच्या आणि पर्यायाने सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणारी जैवविविधता समजून घेण्यापूर्वीच ती नष्ट होत आहे.

जगभरात केवळ १७ देश जैवविविधतेने नटले आहेत. त्यात भारताचा समावेश असणे ही जरी आनंद व अभिमान वाटणारी गोष्ट असली, तरी जैवविविधता नष्ट करीत चाललेल्या १० देशांच्या यादीतदेखील भारताचा समावेश असल्याचा खेद आहे. या कार्यक्रमात डॉ. आसावरी जाधव यांनी प्रास्ताविक केले. निर्मला पोखर्णीकर यांनी आभार मानले.नैतिक जबाबदारीजैवविविधतेचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. ती प्रत्येकाने पार पडणे महत्वाचे आहे; अन्यथा भविष्यात आपणास नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागेल, असे मत डॉ. राऊत यांनी व्यक्त केले.

 

 

टॅग्स :environmentपर्यावरणShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर