शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
2
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
3
IND vs SA T20I : कटकच्या मैदानात हार्दिक पांड्याची कडक खेळी; सिक्सरच्या 'सेंच्युरी'सह साजरी केली 'फिफ्टी'
4
अनंत अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान! मिळाला प्रतिष्ठेचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्कार
5
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
6
राज्यात थंडीचा कडाका वाढला! अहिल्यानगरमध्ये ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद
7
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
8
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
9
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
10
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
11
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
12
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
13
प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न
14
हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
15
Jara Hatke: फुटक्या कवडीची खरी किंमत माहितीय? प्राचीन चलनव्यवस्थेशी आहे थेट संबंध 
16
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
17
‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले नसते तर देशाची फाळणी झाली नसती, अमित शाहांची नेहरूंवर टीका 
18
Puja Rituals: उदबत्तीची रक्षा, जळलेल्या वाती तुम्ही कचऱ्यात तर फेकून देत नाही ना? 
19
महिला पडली तरुणाच्या प्रेमात, बकरी चरायला नेण्याच्या बहाण्याने झाली घरातून पसार, त्यानंतर...
20
गोव्यातील 'त्या' क्लब मालकांची अवैध मालमत्ता पाडण्याचे आदेश; कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणला होता दबाव
Daily Top 2Weekly Top 5

पुढील पिढीसाठी निसर्गसंपत्ती जपणे आपले कर्तव्य : मधुकर बाचूळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 14:57 IST

सध्या विकासाच्या नावाखाली जंगले जाळून टाकली जात आहेत; पण त्यातून होणारी हानी ही कधीही न भरून काढता येणारी, मोजदाद न करता येणारी आहे. आपण ज्या पश्चिम घाटात राहतो, तो भूभाग निसर्गाची मुक्त उधळण असलेला आहे. तेथील निसर्गसंपत्ती पुढच्या पिढीसाठी जपून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी येथे केले.

ठळक मुद्दे पुढील पिढीसाठी निसर्गसंपत्ती जपणे आपले कर्तव्य : मधुकर बाचूळकरशिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागात व्याख्यान

कोल्हापूर : सध्या विकासाच्या नावाखाली जंगले जाळून टाकली जात आहेत; पण त्यातून होणारी हानी ही कधीही न भरून काढता येणारी, मोजदाद न करता येणारी आहे. आपण ज्या पश्चिम घाटात राहतो, तो भूभाग निसर्गाची मुक्त उधळण असलेला आहे. तेथील निसर्गसंपत्ती पुढच्या पिढीसाठी जपून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्यापर्यावरणशास्त्र विभागातर्फे मंगळवारी (दि. १८) आयोजित केलेल्या प्रा. नरहर विष्णू कारेकर या विज्ञानविषयक व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘जैवविविधतेचे मानवी जीवनावरील परिणाम’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत होते.

डॉ. बाचूळकर म्हणाले, पृथ्वीतलावर असलेल्या फक्त १८ ते २० टक्के जैवविविधतेचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास झाला आहे. पृथ्वीच्या आणि पर्यायाने सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणारी जैवविविधता समजून घेण्यापूर्वीच ती नष्ट होत आहे.

जगभरात केवळ १७ देश जैवविविधतेने नटले आहेत. त्यात भारताचा समावेश असणे ही जरी आनंद व अभिमान वाटणारी गोष्ट असली, तरी जैवविविधता नष्ट करीत चाललेल्या १० देशांच्या यादीतदेखील भारताचा समावेश असल्याचा खेद आहे. या कार्यक्रमात डॉ. आसावरी जाधव यांनी प्रास्ताविक केले. निर्मला पोखर्णीकर यांनी आभार मानले.नैतिक जबाबदारीजैवविविधतेचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. ती प्रत्येकाने पार पडणे महत्वाचे आहे; अन्यथा भविष्यात आपणास नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागेल, असे मत डॉ. राऊत यांनी व्यक्त केले.

 

 

टॅग्स :environmentपर्यावरणShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर