शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

पुढील पिढीसाठी निसर्गसंपत्ती जपणे आपले कर्तव्य : मधुकर बाचूळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 14:57 IST

सध्या विकासाच्या नावाखाली जंगले जाळून टाकली जात आहेत; पण त्यातून होणारी हानी ही कधीही न भरून काढता येणारी, मोजदाद न करता येणारी आहे. आपण ज्या पश्चिम घाटात राहतो, तो भूभाग निसर्गाची मुक्त उधळण असलेला आहे. तेथील निसर्गसंपत्ती पुढच्या पिढीसाठी जपून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी येथे केले.

ठळक मुद्दे पुढील पिढीसाठी निसर्गसंपत्ती जपणे आपले कर्तव्य : मधुकर बाचूळकरशिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागात व्याख्यान

कोल्हापूर : सध्या विकासाच्या नावाखाली जंगले जाळून टाकली जात आहेत; पण त्यातून होणारी हानी ही कधीही न भरून काढता येणारी, मोजदाद न करता येणारी आहे. आपण ज्या पश्चिम घाटात राहतो, तो भूभाग निसर्गाची मुक्त उधळण असलेला आहे. तेथील निसर्गसंपत्ती पुढच्या पिढीसाठी जपून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्यापर्यावरणशास्त्र विभागातर्फे मंगळवारी (दि. १८) आयोजित केलेल्या प्रा. नरहर विष्णू कारेकर या विज्ञानविषयक व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘जैवविविधतेचे मानवी जीवनावरील परिणाम’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत होते.

डॉ. बाचूळकर म्हणाले, पृथ्वीतलावर असलेल्या फक्त १८ ते २० टक्के जैवविविधतेचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास झाला आहे. पृथ्वीच्या आणि पर्यायाने सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणारी जैवविविधता समजून घेण्यापूर्वीच ती नष्ट होत आहे.

जगभरात केवळ १७ देश जैवविविधतेने नटले आहेत. त्यात भारताचा समावेश असणे ही जरी आनंद व अभिमान वाटणारी गोष्ट असली, तरी जैवविविधता नष्ट करीत चाललेल्या १० देशांच्या यादीतदेखील भारताचा समावेश असल्याचा खेद आहे. या कार्यक्रमात डॉ. आसावरी जाधव यांनी प्रास्ताविक केले. निर्मला पोखर्णीकर यांनी आभार मानले.नैतिक जबाबदारीजैवविविधतेचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. ती प्रत्येकाने पार पडणे महत्वाचे आहे; अन्यथा भविष्यात आपणास नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागेल, असे मत डॉ. राऊत यांनी व्यक्त केले.

 

 

टॅग्स :environmentपर्यावरणShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर