शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

निधी न देऊन आमचा विश्वासघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 20:49 IST

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापन करताना आमच्यासह सर्व मित्रपक्षांच्या जिल्हा परिषद सदस्यांना भरीव निधी देण्याचे दिलेले आश्वासन न पाळता आमचा विश्वासघात केला असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या आठ सदस्यांनी केला आहे

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापन करताना आमच्यासह सर्व मित्रपक्षांच्या जिल्हा परिषद सदस्यांना भरीव निधी देण्याचे दिलेले आश्वासन न पाळता आमचा विश्वासघात केला असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या आठ सदस्यांनी केला आहे. गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन या सर्वांनी त्यांना आणि खासदार धनंजय महाडिक यांना लेखी पत्र दिले आहे.

या आठ सदस्यांच्या या भूमिकेमुळे जिल्हा परिषदेच्या सर्वच सदस्यांमध्ये असणाºया नाराजीला तोंड फुटले असून, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर याबाबत आणखी उठाव होण्याची शक्यता आहे. निधी देऊ असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्याचे राहुल आवाडे यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीचे राहुल आवाडे, वंदना मगदूम, महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शुभांगी शिंदे, पद्माराणी पाटील, शिवसेनेचे कुंभोजचे सदस्य प्रवीण यादव, चंदगड विकास आघाडीच्या विद्या पाटील, युवक क्रांती आघाडी चंदगडचे कल्लाप्पाण्णा भोगण आणि अपक्ष रसिका पाटील यांच्या या निवेदनावर स'ा आहेत.

निवेदनामध्ये म्हटले आहे, केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता असल्याने जिल्हा परिषदेत भाजपचे संख्याबळ नसतानाही आम्ही पाठिंबा दिला. सर्व ठिकाणी भाजपची सत्ता असल्याने मतदारसंघातील विविध कामे मार्गी लागतील, यासाठी आम्ही पाठिंबा दिला. आमचा विरोध असतानाही केवळ आमच्या नेत्यांच्या सांगण्यावरून आम्ही कोणत्याही आर्थिक आमिषाला बळी न पडता विकासाच्या मुद्द्यावर आपणास पाठिंबा दिला.परंतु आठ महिने झाले तरी विकासकामांसाठी कोणताही निधी मिळाला नाही; त्यामुळे काही कामे झाली नाहीत. त्यामुळे मतदारसंघांतील ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे. पाठिंबा मागताना तुम्ही २५/१२ योजना, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा देखभाल-दुरुस्ती, गावनिहाय पाणी योजना, शिक्षण, कृषी, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, ग्रामविकास व इतर योजना, जिल्हा नियोजन व सदस्यांसाठी खास निधी देतो, असे आश्वासन दिले होते.काय भूमिका घ्यायची ते तुम्हीच सांगा!मतदारसंघात आठ महिन्यांत कोणतीही कामे न झाल्याने सदस्यांविषयीच संभ्रम निर्माण झाला आहे. तेव्हा मतदारांना आम्ही नेमके काय उत्तर द्यायचे आणि यापुढे आम्ही काय भूमिका घ्यायची, हेदेखील तुम्हीच सांगा, असे या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.आकांक्षा पाटील यांनी सही टाळलीया निवेदनावर शाहूवाडी तालुक्यातील शिवसेनेच्या सदस्या आकांक्षा पाटील यांचे नाव आहे. मात्र त्यांनी ऐनवेळी या निवेदनावर सही देण्यास नकार दिल्याचे समजते.