शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

....अन्यथा कोल्हापुरी ‘फुटबॉल ’ हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:31 IST

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या कार्यालयाला टाळे ठोकणाऱ्या अपप्रवृत्तीला वेळीच रोखले नाही. तर कोल्हापूरचा ‘फुटबॉल’ हद्दपार होईल,

ठळक मुद्देके. एस. ए. कार्यालयास टाळे : फुटबॉलप्रेमींमधून तीव्र नाराजी, कारवाईची मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या कार्यालयाला टाळे ठोकणाऱ्या अपप्रवृत्तीला वेळीच रोखले नाही. तर कोल्हापूरचा ‘फुटबॉल’ हद्दपार होईल, अशी भीती फुटबॉल शौकिनांमधून व्यक्त केली जात आहे. या घटनेबद्दल अनेकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

राजाराम छत्रपती यांनी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन १९४०मध्ये स्थापन केली. या असोसिएशनमुळे या करवीरनगरीत फुटबॉलसह अन्य खेळांना चालना मिळाली. विशेष म्हणजे, केळवकर लीग फुटबॉल (आताची के. एस. ए. लीग स्पर्धा) स्पर्धेमुळे कोल्हापूरचा फुटबॉल देशाच्या नकाशावर आला. त्यात अनेक नामवंत खेळाडू या मातीतून तयार झाले. सद्य:स्थितीत निखिल कदम (मोहन बागान), सुखदेव पाटील (२३ वर्षांखालील भारतीय संघ गोलरक्षक), अनिकेत जाधव (१७ वर्षांखालील भारतीय संघ, स्ट्राईकर) असे तीन मोहरे चमकदार कामगिरी करीत आहेत. यासह अनेक नामवंत खेळाडू राज्याला तसेच देशाला दिले आहेत; पण या फुटबॉलपटूंच्या खाणीलाच सुरुंग लावण्याचे काम काही अपप्रवृत्ती करू लागल्या आहेत. यात प्रथम सामन्यादरम्यान पंचांचा निर्णय अमान्य करीत समर्थकच हुल्लडबाजी करणे, पंचांंना अश्लील शिवीगाळ करणे, खेळाडूंमध्ये मैदानातच मारामारी होणे, असे प्रकार घडू लागले. मंगळवारी (दि. १३) फुटबॉलची मातृसंस्था असलेल्या के. एस. ए. कार्यालयालाच एका संघाच्या समर्थकांनी चक्क टाळे ठोकले. त्यामुळे या अपप्रवृत्तीला वेळीच पायबंद न घातल्यास ‘कोल्हापुरी फुटबॉल’ कधी हद्दपार होईल, हे कळणार नाही. संस्थेनेही संबधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शौकिनांकडून होत आहे. 

मातृसंस्थेला टाळे ठोकण्याची कृती निश्चितच निंदनीय आहे. कारवाईबाबत के. एस. ए.च्या कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल.- माणिक मंडलिक, सचिव, कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन