शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

अन्यथा शिवाजी पूल बंद करू

By admin | Updated: March 12, 2016 00:32 IST

सर्वपक्षीय कृती समिती : जकात नाक्याची इमारत आज पाडणार

कोल्हापूर : पंचगंगा नदीवरील नवीन पुलाचे काम आठ दिवसांत सुरू न केल्यास धोकादायक शिवाजी पूल दोन्ही बाजंूनी बंद करू, असा इशारा देत सर्वपक्षीय कृती समितीने राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता ए. ए. आवटी यांना चांगलेच धारेवर धरले. अंगावर गुन्हे घेऊ; पण विकासाच्या आडवे येणारे सर्व अडथळे उद्ध्वस्त केले जातील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.नवीन पुलाच्या रेंगाळलेल्या कामाबाबत शुक्रवारी आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने उपअभियंता आवटी यांची भेट घेऊन चर्चा केली. झाडे तोडण्याबाबत पुरातत्त्व खात्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी १५ मार्चला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महेश शर्मा यांच्यासमवेत बैठक बोलावली आहे. यामध्ये मान्यता मिळेल, असे उपअभियंता आवटी यांनी सांगितले. यावर हरकत घेत बाबा इंदुलकर म्हणाले, पुलाचा आराखडा तयार करताना हे अडथळे कळले नाहीत का? प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांनी चुका करायच्या आणि आम्ही मदतीसाठी भीक मागायची, हे चालणार नाही. प्रकल्पाची किंमत वाढविण्याचे हे षड्यंत्र असून पुलाचा आराखडा करणाऱ्या दोषी अधिकाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी करीत भाजपचे महेश जाधव म्हणाले, झाडे व हौद काढण्याबाबत कोणाचीच हरकत नसताना वेळकाढूपणाची भूमिका घेऊ नका, अन्यथा आम्हीच हौद आणि झाडे उद्ध्वस्त करू. स्थानिक नगरसेवकांशी चर्चा करून पाण्याचा हौद इतर ठिकाणी हलवावा. सर्व अडथळे दूर करण्याकामी कृती समिती तुमच्यासोबत आहे. तरीही तुम्ही काम सुरूच करणार नसाल तर जुना पूल दोन्ही बाजूंनी बंद करण्याचा इशारा आर. के. पोवार यांनी दिला. जकात नाका हलविण्यास लेखी परवानगी दिली असताना तो तुम्ही का हलवीत नाही? अशी विचारणा करीत आताच नाका हलवा, अन्यथा आम्ही तुम्हाला बाहेर सोडणार नसल्याचे जयकुमार शिंदे यांनी सांगितले. अखेर आवटी यांनी कार्यकारी अभियंता आर. के. बामणे यांच्याशी फोनवरून बोलून आज, शनिवारी सकाळी अकरा वाजता जकात नाका हलविला जाईल, असे लेखी सांगितल्यानंतर कार्यकर्त्यांनी कार्यालय सोडले. यावेळी बाबा पार्टे, संदीप देसाई, अशोक भंडारे, सतीशचंद्र कांबळे, लाला गायकवाड, एस. के. माळी, किसन कल्याणकर, सुभाष जाधव, जहिदा मुजावर, दिलीप पवार, हिदायत मणेर, वैशाली महाडिक, संभाजी जगदाळे, आदी उपस्थित होते.परवानगीमागील गौडबंगाल काय?झाडे व जकात नाका काढण्याची परवानगी दिल्याचे आयुक्त सांगतात आणि तुम्ही येथे कोणतीच परवानगी नसल्याचे सांगता; परवानगीमागील गौडबंगाल काय? अशी विचारणा करीत दिलीप देसाई यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्यासमवेत बैठक घेऊन विषय मार्गी लावण्याची मागणी केली.