शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अन्यथा शिवाजी पूल बंद करू

By admin | Updated: March 12, 2016 00:32 IST

सर्वपक्षीय कृती समिती : जकात नाक्याची इमारत आज पाडणार

कोल्हापूर : पंचगंगा नदीवरील नवीन पुलाचे काम आठ दिवसांत सुरू न केल्यास धोकादायक शिवाजी पूल दोन्ही बाजंूनी बंद करू, असा इशारा देत सर्वपक्षीय कृती समितीने राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता ए. ए. आवटी यांना चांगलेच धारेवर धरले. अंगावर गुन्हे घेऊ; पण विकासाच्या आडवे येणारे सर्व अडथळे उद्ध्वस्त केले जातील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.नवीन पुलाच्या रेंगाळलेल्या कामाबाबत शुक्रवारी आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने उपअभियंता आवटी यांची भेट घेऊन चर्चा केली. झाडे तोडण्याबाबत पुरातत्त्व खात्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी १५ मार्चला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महेश शर्मा यांच्यासमवेत बैठक बोलावली आहे. यामध्ये मान्यता मिळेल, असे उपअभियंता आवटी यांनी सांगितले. यावर हरकत घेत बाबा इंदुलकर म्हणाले, पुलाचा आराखडा तयार करताना हे अडथळे कळले नाहीत का? प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांनी चुका करायच्या आणि आम्ही मदतीसाठी भीक मागायची, हे चालणार नाही. प्रकल्पाची किंमत वाढविण्याचे हे षड्यंत्र असून पुलाचा आराखडा करणाऱ्या दोषी अधिकाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी करीत भाजपचे महेश जाधव म्हणाले, झाडे व हौद काढण्याबाबत कोणाचीच हरकत नसताना वेळकाढूपणाची भूमिका घेऊ नका, अन्यथा आम्हीच हौद आणि झाडे उद्ध्वस्त करू. स्थानिक नगरसेवकांशी चर्चा करून पाण्याचा हौद इतर ठिकाणी हलवावा. सर्व अडथळे दूर करण्याकामी कृती समिती तुमच्यासोबत आहे. तरीही तुम्ही काम सुरूच करणार नसाल तर जुना पूल दोन्ही बाजूंनी बंद करण्याचा इशारा आर. के. पोवार यांनी दिला. जकात नाका हलविण्यास लेखी परवानगी दिली असताना तो तुम्ही का हलवीत नाही? अशी विचारणा करीत आताच नाका हलवा, अन्यथा आम्ही तुम्हाला बाहेर सोडणार नसल्याचे जयकुमार शिंदे यांनी सांगितले. अखेर आवटी यांनी कार्यकारी अभियंता आर. के. बामणे यांच्याशी फोनवरून बोलून आज, शनिवारी सकाळी अकरा वाजता जकात नाका हलविला जाईल, असे लेखी सांगितल्यानंतर कार्यकर्त्यांनी कार्यालय सोडले. यावेळी बाबा पार्टे, संदीप देसाई, अशोक भंडारे, सतीशचंद्र कांबळे, लाला गायकवाड, एस. के. माळी, किसन कल्याणकर, सुभाष जाधव, जहिदा मुजावर, दिलीप पवार, हिदायत मणेर, वैशाली महाडिक, संभाजी जगदाळे, आदी उपस्थित होते.परवानगीमागील गौडबंगाल काय?झाडे व जकात नाका काढण्याची परवानगी दिल्याचे आयुक्त सांगतात आणि तुम्ही येथे कोणतीच परवानगी नसल्याचे सांगता; परवानगीमागील गौडबंगाल काय? अशी विचारणा करीत दिलीप देसाई यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्यासमवेत बैठक घेऊन विषय मार्गी लावण्याची मागणी केली.