शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

...अन्यथा चांदोलीचे फाटक अडवू

By admin | Updated: March 24, 2015 00:15 IST

अभयारण्यग्रस्तांचा वन कार्यालयावर मोर्चा : मंत्रालयात गुरुवारपर्यंत बैठक बोलविण्याची मागणी

कोल्हापूर : चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या मागण्यांबाबत वनविभागाने मंत्रालयात गुरुवार (दि. २६)पर्यंत बैठक बोलवावी, अन्यथा शुक्रवार (दि.२७) पासून अभयारण्याकडे जाणाऱ्या आंबाईवाडी व खानेलपूर या दोन्ही फाटकांवरून एकाही पर्यटकाला आत जाऊ दिले जाणार नाही, असा इशारा सोमवारी श्रमिक मुक्ती दलातर्फे ताराबाई पार्क येथील वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून देण्यात आला. व्याघ्र प्रकल्पामुळे बाधित झालेल्या सात गावांतील कुटुंबांना पर्यायी जमिनी मिळाव्यात, शाहूवाडी तालुक्यातील उखळूपैकी आंबाईवाडीचे ठरल्याप्रमाणे खास पुनर्वसन व्हावे, या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूआहे. आंदोलनस्थळापासून सकाळी मोर्चा सुरु झाला. जिल्हा परिषद, वारणाभवन, आटीओ, सार्वजनिक बांधकाम कार्यालयामार्गे हा मोर्चा ताराबाई पार्क येथील वन विभागावर नेण्यात आला. या ठिकाणी कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक जी. साईप्रसाद यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली. यावेळी जमिनीच्या निर्वणीकरणाचा प्रस्ताव फक्त मंजुरीसाठी व वारणेच्या लाभक्षेत्रातील जमिनी संपादनासाठी लागणारे पैसे व नागरी सुविधांसाठी लागणारे पैसे, बुडीत झालेल्या गावांच्या ताळीचे व घरांचे, जमिनींचे पैसे मिळण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी तातडीने मंत्रालयात जाऊन स्वत: गुरुवार (दि. २६)पर्यंत बैठकीचे आयोजन करावे, अन्यथा शुक्रवारी (दि. २७) चांदोली अभयारण्याकडे जाणाऱ्या आंबाईवाडी व शिराळा तालुक्यातील खानेलपूर या दोन्ही फाटकांवरून एकाही पर्यटकाला आत न सोडण्याचा इशारा दिला.यावर साईप्रसाद यांनी वनविभागाच्या सचिवांशी संपर्क साधून आंदोलकांच्या मागणीनुसार बैठक घेण्यासंदर्भात कळविले, परंतु तारीख अथवा वेळ आंदोलकांना समजू शकली नाही. त्यामुळे बैठकीसंदर्भात इथे येऊन दररोज विचारणा केली जाईल, असे आंदोलकांनी सांगितले.साईप्रसाद म्हणाले, लाभक्षेत्रातील जमिनी संपादन, नागरी सुविधा यासाठी ३४ कोटी ३२ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी चार कोटी ७६ लाख रुपये जमीन संपादनासाठी लवकरच वर्ग करण्याचा प्रयत्न करू. आज, मंगळवारी पाटबंधारे विभागाची बैठक घेऊन वारणा लाभक्षेत्रातील भूसंपादनासाठी, मुलकी पड व गायरान जमिनीसाठी किती निधी लागतो, त्याचबरोबर बुडीत गावे तनाळी, निवळे, ढाकाळे, चांदेल, कुल्याची वाडी व गोठणे यांच्या नागरी सुविधांसाठी किती निधी लागेल, यावर चर्चा होईल.आंदोलनात जिल्हाध्यक्ष मारुती पाटील, डी. के. बोडके, नजीर चौगुले, पांडुरंग कोठारी, शंकर पाटील यांच्यासह अभयारण्यग्रस्त सहभागी झाले होते.(प्रतिनिधी) +आठ दिवसांपासून ठिय्या आंदोलनव्याघ्र प्रकल्पामुळे बाधित झालेल्या सात गावांतील कुटुंबांना पर्यायी जमिनी मिळाव्यात, शाहूवाडी तालुक्यातील उखळूपैकी आंबाईवाडीचे ठरल्याप्रमाणे खास पुनर्वसन व्हावे, आदी मागण्यांसाठी आंदोलनअभयारण्याकडे जाणाऱ्या आंबाईवाडी व खानेलपूर या दोन्ही फाटकांवरून एकाही पर्यटकाला आत जाऊ न देण्याचा इशारापाटबंधारे विभागाची आज, मंगळवारी बैठक घेऊन अभयारण्यग्रस्तांसाठी वारणा लाभक्षेत्रातील जमीन संपादन करण्यासाठी, मुलकी पड व गायरान जमिनीसाठी किती निधी लागतो, बुडीत गावे तनाळी, निवळे, ढाकाळे, चांदेल, कुल्याची वाडी व गोठणे यांच्या नागरी सुविधांसाठी किती निधी लागेल, यावर चर्चा होणार आहे.