शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा चांदोलीचे फाटक अडवू

By admin | Updated: March 24, 2015 00:15 IST

अभयारण्यग्रस्तांचा वन कार्यालयावर मोर्चा : मंत्रालयात गुरुवारपर्यंत बैठक बोलविण्याची मागणी

कोल्हापूर : चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या मागण्यांबाबत वनविभागाने मंत्रालयात गुरुवार (दि. २६)पर्यंत बैठक बोलवावी, अन्यथा शुक्रवार (दि.२७) पासून अभयारण्याकडे जाणाऱ्या आंबाईवाडी व खानेलपूर या दोन्ही फाटकांवरून एकाही पर्यटकाला आत जाऊ दिले जाणार नाही, असा इशारा सोमवारी श्रमिक मुक्ती दलातर्फे ताराबाई पार्क येथील वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून देण्यात आला. व्याघ्र प्रकल्पामुळे बाधित झालेल्या सात गावांतील कुटुंबांना पर्यायी जमिनी मिळाव्यात, शाहूवाडी तालुक्यातील उखळूपैकी आंबाईवाडीचे ठरल्याप्रमाणे खास पुनर्वसन व्हावे, या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूआहे. आंदोलनस्थळापासून सकाळी मोर्चा सुरु झाला. जिल्हा परिषद, वारणाभवन, आटीओ, सार्वजनिक बांधकाम कार्यालयामार्गे हा मोर्चा ताराबाई पार्क येथील वन विभागावर नेण्यात आला. या ठिकाणी कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक जी. साईप्रसाद यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली. यावेळी जमिनीच्या निर्वणीकरणाचा प्रस्ताव फक्त मंजुरीसाठी व वारणेच्या लाभक्षेत्रातील जमिनी संपादनासाठी लागणारे पैसे व नागरी सुविधांसाठी लागणारे पैसे, बुडीत झालेल्या गावांच्या ताळीचे व घरांचे, जमिनींचे पैसे मिळण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी तातडीने मंत्रालयात जाऊन स्वत: गुरुवार (दि. २६)पर्यंत बैठकीचे आयोजन करावे, अन्यथा शुक्रवारी (दि. २७) चांदोली अभयारण्याकडे जाणाऱ्या आंबाईवाडी व शिराळा तालुक्यातील खानेलपूर या दोन्ही फाटकांवरून एकाही पर्यटकाला आत न सोडण्याचा इशारा दिला.यावर साईप्रसाद यांनी वनविभागाच्या सचिवांशी संपर्क साधून आंदोलकांच्या मागणीनुसार बैठक घेण्यासंदर्भात कळविले, परंतु तारीख अथवा वेळ आंदोलकांना समजू शकली नाही. त्यामुळे बैठकीसंदर्भात इथे येऊन दररोज विचारणा केली जाईल, असे आंदोलकांनी सांगितले.साईप्रसाद म्हणाले, लाभक्षेत्रातील जमिनी संपादन, नागरी सुविधा यासाठी ३४ कोटी ३२ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी चार कोटी ७६ लाख रुपये जमीन संपादनासाठी लवकरच वर्ग करण्याचा प्रयत्न करू. आज, मंगळवारी पाटबंधारे विभागाची बैठक घेऊन वारणा लाभक्षेत्रातील भूसंपादनासाठी, मुलकी पड व गायरान जमिनीसाठी किती निधी लागतो, त्याचबरोबर बुडीत गावे तनाळी, निवळे, ढाकाळे, चांदेल, कुल्याची वाडी व गोठणे यांच्या नागरी सुविधांसाठी किती निधी लागेल, यावर चर्चा होईल.आंदोलनात जिल्हाध्यक्ष मारुती पाटील, डी. के. बोडके, नजीर चौगुले, पांडुरंग कोठारी, शंकर पाटील यांच्यासह अभयारण्यग्रस्त सहभागी झाले होते.(प्रतिनिधी) +आठ दिवसांपासून ठिय्या आंदोलनव्याघ्र प्रकल्पामुळे बाधित झालेल्या सात गावांतील कुटुंबांना पर्यायी जमिनी मिळाव्यात, शाहूवाडी तालुक्यातील उखळूपैकी आंबाईवाडीचे ठरल्याप्रमाणे खास पुनर्वसन व्हावे, आदी मागण्यांसाठी आंदोलनअभयारण्याकडे जाणाऱ्या आंबाईवाडी व खानेलपूर या दोन्ही फाटकांवरून एकाही पर्यटकाला आत जाऊ न देण्याचा इशारापाटबंधारे विभागाची आज, मंगळवारी बैठक घेऊन अभयारण्यग्रस्तांसाठी वारणा लाभक्षेत्रातील जमीन संपादन करण्यासाठी, मुलकी पड व गायरान जमिनीसाठी किती निधी लागतो, बुडीत गावे तनाळी, निवळे, ढाकाळे, चांदेल, कुल्याची वाडी व गोठणे यांच्या नागरी सुविधांसाठी किती निधी लागेल, यावर चर्चा होणार आहे.