शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

सेहगल यांना रोखणाऱ्या साहित्य संमेलन आयोजकांचा कोल्हापुरात निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 11:07 IST

यवतमाळ येथे ११ जानेवारीपासून होणारे ९२ वे तीन दिवसीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वादात अडकले आहे. साहित्य महामंडळ आणि आयोजकांच्या भूमिकेमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, महामंडळाने स्वत:च संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सेहगल यांना संमेलनाला येऊ नका, असा संदेश पाठविल्याच्या घटनेचा साहित्य वर्तुळात तीव्र शब्दांत निषेध व्यक्त होत आहे. या संमेलनाचे निमंत्रण असलेल्या कोल्हापूर आणि सातारा येथील साहित्यिकांनी तर या संमेलनातील सहभागच नाकारला आहे.

ठळक मुद्देसेहगल यांना रोखणाऱ्या साहित्य संमेलन आयोजकांचा कोल्हापुरात निषेधकोल्हापूर, साताऱ्याचे साहित्यिक संमेलनस्थळी निषेध करणार

संदीप आडनाईककोल्हापूर : यवतमाळ येथे ११ जानेवारीपासून होणारे ९२ वे तीन दिवसीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वादात अडकले आहे. साहित्य महामंडळ आणि आयोजकांच्या भूमिकेमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, महामंडळाने स्वत:च संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सेहगल यांना संमेलनाला येऊ नका, असा संदेश पाठविल्याच्या घटनेचा साहित्य वर्तुळात तीव्र शब्दांत निषेध व्यक्त होत आहे. या संमेलनाचे निमंत्रण असलेल्या कोल्हापूर आणि सातारा येथील साहित्यिकांनी तर या संमेलनातील सहभागच नाकारला आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी येथील साहित्यिकांनी केली आहे. नयनतारा सेहगल यांना रोखून महामंडळाने गुन्हा केला आहे, यामुळे महाराष्ट्राचाच अपमान झाल्याची तीव्र प्रतिक्रिया साहित्य वर्तुळात व्यक्त होत आहेत.साहित्य संमेलनाचे विद्ममान अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, त्यांनी या संमेलनात जाऊन मावळता अध्यक्ष म्हणून मी या सर्व प्रकाराबद्दल माझे परखड भाष्य करणारे समारोपाचे भाषण करणार असल्याची प्रतिक्रिया दिली.सातारा येथील साहित्यिक डॉ. महेश गायकवाड यांनाही साहित्य संमेलनात होणाऱ्या परिसंवादासाठी निमंत्रित कले होते. त्यांनीही विचार स्वातंत्र्य नसणाऱ्या या संमेलनात आपण सहभागी होणार नाही, अशी भूमिका घेतली असून, समविचारी मित्रांना सोबत घेऊन संमेलनस्थळी प्रवेशद्वारासमोर बसून निषेध करणार असल्याचे आयोजकांना लेखी कळविले आहे. साहित्याचा एक अभ्यासक म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहणे आजच्या क्षणी मला योग्य वाटते. नयनतारा सेहगल यांना पुन्हा सन्मानाने बोलावले तरच मी संमेलनाच्या मंचावर येईन, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.कोल्हापुरातील कवी आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांना यवतमाळ येथे होणाऱ्या या मराठी साहित्य संमेलनात ११ जानेवारीला होणाऱ्या निमंत्रितांच्या कविसंमेलनासाठी निमंत्रित केले होते. मात्र, नयनतारा सेहगल यांच्यासारख्या भारतीय पातळीवरील लेखिकेला संमेलनाचे उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण महामंडळाने मागे घेतल्यामुळे त्यांनी या कृतीचा जाहीर निषेध व्यक्त करून या संमेलनात सहभागी होण्यास नकार दिला आहे.

यासंदर्भातील लेखी पत्र त्यांनी महामंडळाच्या आयोजकांना पाठविले आहे. भारतीय संविधानाने दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्कच आपण नाकारत असाल, तर व्यक्तीश: मला या संमेलनात सहभागी व्हायची अजिबात इच्छा नाही. नयनतारा सेहगल यांच्याशिवाय या संमेलनात मी सहभागी होणार नाही, अशा शब्दांत त्यांनी निषेध केला आहे.

पाठविलेला लेख घेतला मागेशिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे प्राध्यापक नंदकुमार मोरे यांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे. ‘अक्षरयात्रा’चे संपादक विलास चिंतामण देशपांडे यांनी स्मरणिकेसाठी मोरे यांच्याकडून ‘समाजभाषा विज्ञान आणि मराठी’ या विषयावर लेख मागविला होता, तो त्यांनी मागे घेत असल्याचे पत्र संपादकांना पाठविले आहे.

शब्दाला घाबरणाऱ्या सरकारचा निषेधआमदार सतेज पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी तीव्र शब्दांत या प्रकाराचा निषेध केला आहे. नयनतारा सेहगल यांच्या बाबतीत जे काही सुरू आहे, ते मराठी माणसाला मान खाली घालायला लावणारे आहे. त्यांचे विचार सोयीस्कर नाहीत म्हणून येऊ नका म्हणून सांगणे म्हणजे त्यांचाच नव्हे, तर अतिथ्यशील मराठी जनतेचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनkolhapurकोल्हापूरliteratureसाहित्य