शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

सेहगल यांना रोखणाऱ्या साहित्य संमेलन आयोजकांचा कोल्हापुरात निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 11:07 IST

यवतमाळ येथे ११ जानेवारीपासून होणारे ९२ वे तीन दिवसीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वादात अडकले आहे. साहित्य महामंडळ आणि आयोजकांच्या भूमिकेमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, महामंडळाने स्वत:च संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सेहगल यांना संमेलनाला येऊ नका, असा संदेश पाठविल्याच्या घटनेचा साहित्य वर्तुळात तीव्र शब्दांत निषेध व्यक्त होत आहे. या संमेलनाचे निमंत्रण असलेल्या कोल्हापूर आणि सातारा येथील साहित्यिकांनी तर या संमेलनातील सहभागच नाकारला आहे.

ठळक मुद्देसेहगल यांना रोखणाऱ्या साहित्य संमेलन आयोजकांचा कोल्हापुरात निषेधकोल्हापूर, साताऱ्याचे साहित्यिक संमेलनस्थळी निषेध करणार

संदीप आडनाईककोल्हापूर : यवतमाळ येथे ११ जानेवारीपासून होणारे ९२ वे तीन दिवसीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वादात अडकले आहे. साहित्य महामंडळ आणि आयोजकांच्या भूमिकेमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, महामंडळाने स्वत:च संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सेहगल यांना संमेलनाला येऊ नका, असा संदेश पाठविल्याच्या घटनेचा साहित्य वर्तुळात तीव्र शब्दांत निषेध व्यक्त होत आहे. या संमेलनाचे निमंत्रण असलेल्या कोल्हापूर आणि सातारा येथील साहित्यिकांनी तर या संमेलनातील सहभागच नाकारला आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी येथील साहित्यिकांनी केली आहे. नयनतारा सेहगल यांना रोखून महामंडळाने गुन्हा केला आहे, यामुळे महाराष्ट्राचाच अपमान झाल्याची तीव्र प्रतिक्रिया साहित्य वर्तुळात व्यक्त होत आहेत.साहित्य संमेलनाचे विद्ममान अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, त्यांनी या संमेलनात जाऊन मावळता अध्यक्ष म्हणून मी या सर्व प्रकाराबद्दल माझे परखड भाष्य करणारे समारोपाचे भाषण करणार असल्याची प्रतिक्रिया दिली.सातारा येथील साहित्यिक डॉ. महेश गायकवाड यांनाही साहित्य संमेलनात होणाऱ्या परिसंवादासाठी निमंत्रित कले होते. त्यांनीही विचार स्वातंत्र्य नसणाऱ्या या संमेलनात आपण सहभागी होणार नाही, अशी भूमिका घेतली असून, समविचारी मित्रांना सोबत घेऊन संमेलनस्थळी प्रवेशद्वारासमोर बसून निषेध करणार असल्याचे आयोजकांना लेखी कळविले आहे. साहित्याचा एक अभ्यासक म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहणे आजच्या क्षणी मला योग्य वाटते. नयनतारा सेहगल यांना पुन्हा सन्मानाने बोलावले तरच मी संमेलनाच्या मंचावर येईन, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.कोल्हापुरातील कवी आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांना यवतमाळ येथे होणाऱ्या या मराठी साहित्य संमेलनात ११ जानेवारीला होणाऱ्या निमंत्रितांच्या कविसंमेलनासाठी निमंत्रित केले होते. मात्र, नयनतारा सेहगल यांच्यासारख्या भारतीय पातळीवरील लेखिकेला संमेलनाचे उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण महामंडळाने मागे घेतल्यामुळे त्यांनी या कृतीचा जाहीर निषेध व्यक्त करून या संमेलनात सहभागी होण्यास नकार दिला आहे.

यासंदर्भातील लेखी पत्र त्यांनी महामंडळाच्या आयोजकांना पाठविले आहे. भारतीय संविधानाने दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्कच आपण नाकारत असाल, तर व्यक्तीश: मला या संमेलनात सहभागी व्हायची अजिबात इच्छा नाही. नयनतारा सेहगल यांच्याशिवाय या संमेलनात मी सहभागी होणार नाही, अशा शब्दांत त्यांनी निषेध केला आहे.

पाठविलेला लेख घेतला मागेशिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे प्राध्यापक नंदकुमार मोरे यांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे. ‘अक्षरयात्रा’चे संपादक विलास चिंतामण देशपांडे यांनी स्मरणिकेसाठी मोरे यांच्याकडून ‘समाजभाषा विज्ञान आणि मराठी’ या विषयावर लेख मागविला होता, तो त्यांनी मागे घेत असल्याचे पत्र संपादकांना पाठविले आहे.

शब्दाला घाबरणाऱ्या सरकारचा निषेधआमदार सतेज पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी तीव्र शब्दांत या प्रकाराचा निषेध केला आहे. नयनतारा सेहगल यांच्या बाबतीत जे काही सुरू आहे, ते मराठी माणसाला मान खाली घालायला लावणारे आहे. त्यांचे विचार सोयीस्कर नाहीत म्हणून येऊ नका म्हणून सांगणे म्हणजे त्यांचाच नव्हे, तर अतिथ्यशील मराठी जनतेचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनkolhapurकोल्हापूरliteratureसाहित्य