शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

हातातील आठ नोकऱ्या सोडून सेंद्रिय शेती

By admin | Updated: January 18, 2016 00:37 IST

जितेंद्र कदमांची यशोगाथा--ही रानवाट वेगळी...

या शेताने लळा लावला असा कीसुख-दु:खांना परस्परांशी हसलो, रडलो,आता हा तर जीवच अवघा असा जखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो....सुप्रसिद्ध कवी ना. धो. महानोरांच्या शेती संदर्भातील या ओळी एका अवलीयाला तंतोतंत लागू पडतात. त्याचं नाव आहे जितेंद्र मारुती कदम. जावळी तालुक्यातीलच रायगाव येथील या शेतकऱ्याचा प्रवास थक्क करायला लावणारा आहे. दहावीला ७२ टक्के गुण मिळवूनही घराची परिस्थती बेताची असल्याने पुढे शिक्षण घेता आले नाही. तब्बल आठ कॉल हातात असताना मूळचा रानवेडा स्वभाव स्वस्थ बसू देत नव्हता. शेती की नोकरी, या दोलायमान अवस्थेत मनानं कौल दिला शेतीचा सुरुवातीला प्रचंड अडचणी आल्या. पाणी पैसा या अडचणींवर इच्छाशक्तीनं मात केली. आणि स्वत:च्या मातीत विक्रमी आल्याचं उत्पादन घेतलं. केवळ २५ गुंठ्यांत १३७ क्विंटल आल्याचे उत्पन्न मिळाले. जोडीला कलिंगडची शेती केली. १९९६ रोजी शेतीची सुरुवात झाली. हळूहळू जोडधंदे सुरू झाले. २००४ रोजी यशस्वी रेशीम उद्योग केला. अवतीभोवती काहीही पिकत नसताना या शेतकऱ्याने घामाचे सोने केले. स्ट्रॉबेरीचं दीडशे ते पावनेदोनशे ग्राम वजन असलेलं पीक घेण्याची किमया केली. कालांतराने त्यांना सेंद्रिय शेतीची गरज भासू लागली. दोन वर्षांपासून संपूर्णपणे सेंद्रिय शेती सुरू आहे. त्यासाठी गांडूळखत, मृदापरीक्षण, जीवामृत या अभिनव गोष्टींचा अवलंब केला जातो. हे सर्व करत असताना स्पिरुलीना या जैविक शैवाल शेतीचा यशस्वी प्रयोग या शेतकऱ्याने केला आहे. रोज दहा किलो ओले शैवाल उत्पादीत करून एक किलो पावडरचे उत्पन्न घेतले जात आहे. दोन यांत्रिक युनिटमधून ही शेती सुरू आहे. जितेंद्र कदमांच्या या आधुनिक उपक्रमास जिल्हाभरातून भेट देण्यासाठी लोक येत आहेत. नुकतेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन त्यांच्या कामाची प्रशंसा केली. तुम्ही मातीसाठी जगला तर ती तुम्हाला उपाशी मरू देणार नाही, असं साधं तत्त्वज्ञानावर त्यांची अव्याहत वाटचाल सुरू आहे व राहील.आजवर मिळालेले पुरस्कारआ. शशिकांत शिंदे कृषी उद्योग प्रदर्शन - आदर्श शेतकरी २०१०/२०१३सेवागिरी शेतीनिष्ठ पुरस्कार - २०१२ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्ट बेस्ट रिजल्ट २०१३प्रयोगशील युवा शेतकरी २०१३ नाशिककृषीरत्न पुरस्कार (स्वामी विवेकानंद सामाजिक संस्था) २०१४