शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

हातातील आठ नोकऱ्या सोडून सेंद्रिय शेती

By admin | Updated: January 18, 2016 00:37 IST

जितेंद्र कदमांची यशोगाथा--ही रानवाट वेगळी...

या शेताने लळा लावला असा कीसुख-दु:खांना परस्परांशी हसलो, रडलो,आता हा तर जीवच अवघा असा जखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो....सुप्रसिद्ध कवी ना. धो. महानोरांच्या शेती संदर्भातील या ओळी एका अवलीयाला तंतोतंत लागू पडतात. त्याचं नाव आहे जितेंद्र मारुती कदम. जावळी तालुक्यातीलच रायगाव येथील या शेतकऱ्याचा प्रवास थक्क करायला लावणारा आहे. दहावीला ७२ टक्के गुण मिळवूनही घराची परिस्थती बेताची असल्याने पुढे शिक्षण घेता आले नाही. तब्बल आठ कॉल हातात असताना मूळचा रानवेडा स्वभाव स्वस्थ बसू देत नव्हता. शेती की नोकरी, या दोलायमान अवस्थेत मनानं कौल दिला शेतीचा सुरुवातीला प्रचंड अडचणी आल्या. पाणी पैसा या अडचणींवर इच्छाशक्तीनं मात केली. आणि स्वत:च्या मातीत विक्रमी आल्याचं उत्पादन घेतलं. केवळ २५ गुंठ्यांत १३७ क्विंटल आल्याचे उत्पन्न मिळाले. जोडीला कलिंगडची शेती केली. १९९६ रोजी शेतीची सुरुवात झाली. हळूहळू जोडधंदे सुरू झाले. २००४ रोजी यशस्वी रेशीम उद्योग केला. अवतीभोवती काहीही पिकत नसताना या शेतकऱ्याने घामाचे सोने केले. स्ट्रॉबेरीचं दीडशे ते पावनेदोनशे ग्राम वजन असलेलं पीक घेण्याची किमया केली. कालांतराने त्यांना सेंद्रिय शेतीची गरज भासू लागली. दोन वर्षांपासून संपूर्णपणे सेंद्रिय शेती सुरू आहे. त्यासाठी गांडूळखत, मृदापरीक्षण, जीवामृत या अभिनव गोष्टींचा अवलंब केला जातो. हे सर्व करत असताना स्पिरुलीना या जैविक शैवाल शेतीचा यशस्वी प्रयोग या शेतकऱ्याने केला आहे. रोज दहा किलो ओले शैवाल उत्पादीत करून एक किलो पावडरचे उत्पन्न घेतले जात आहे. दोन यांत्रिक युनिटमधून ही शेती सुरू आहे. जितेंद्र कदमांच्या या आधुनिक उपक्रमास जिल्हाभरातून भेट देण्यासाठी लोक येत आहेत. नुकतेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन त्यांच्या कामाची प्रशंसा केली. तुम्ही मातीसाठी जगला तर ती तुम्हाला उपाशी मरू देणार नाही, असं साधं तत्त्वज्ञानावर त्यांची अव्याहत वाटचाल सुरू आहे व राहील.आजवर मिळालेले पुरस्कारआ. शशिकांत शिंदे कृषी उद्योग प्रदर्शन - आदर्श शेतकरी २०१०/२०१३सेवागिरी शेतीनिष्ठ पुरस्कार - २०१२ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्ट बेस्ट रिजल्ट २०१३प्रयोगशील युवा शेतकरी २०१३ नाशिककृषीरत्न पुरस्कार (स्वामी विवेकानंद सामाजिक संस्था) २०१४