शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पर्यायी पूल १५ दिवसांत मागी

By admin | Updated: August 5, 2016 02:00 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन : शिवाजी पुलाबाबत सर्वपक्षीय कृती समिती आक्रमर्क

कोल्हापूर : महाड येथील पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेनंतर कोल्हापुरातीलही ब्रिटिशकालीन शिवाजी पुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. ‘हेरिटेज’च्या नावाखाली पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत थांबविल्याचा आरोप सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने केला. या पर्यायी पुलाच्या कामांबाबत संपूर्ण माहिती घेऊन काम पुढे सुरू होण्याबाबत येत्या १५ दिवसांत मार्ग काढू, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी शिष्टमंडळास दिले.कोल्हापुरातून रत्नागिरीकडे जाणाऱ्या मार्गावरील शिवाजी पूल कालबाह्य झाल्याने त्याशेजारी अर्धवट अवस्थेत असलेल्या पर्यायी पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत महापौर अश्विनी रामाणे व माजी महापौर आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.गेली वर्षभर आंदोलने करून पर्यायी शिवाजी पुलाच्या अपुऱ्या बांधकामांबाबत मार्ग निघाला नाही. जुन्या पुलाची कालमर्यादा संपल्याने महाडसारखी दुर्घटना घडण्यास वेळ लागणार नाही. हेरिटेजच्या नावाखाली पुरातत्त्व विभागाने पुलाचे काम थांबविले आहे. त्यामुळे दुर्घटनेत माणसे मेल्यानंतर पुलाचे काम सुरू होणार का? असा प्रश्न करीत उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा आर. के. पोवार यांनी दिला. यावेळी सर्वपक्षीय आणि महापालिका यांच्यावतीने स्वतंत्रपणे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांना दिले.महापौर रामाणे म्हणाल्या, पर्यायी पुलाबाबत महापालिकेने कागदोपत्री सर्व परवाने दिले आहेत; पण पुरातत्त्व विभागाने काम थांबविले. जुन्या पुलामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे; त्यामुळे पर्यायी पुलाचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करावे, अशी त्यांनी मागणी केली. ‘हेरिटेज’चा बाऊ करू नये. पूल हा रस्त्याला समांतर आहे; त्यामुळे हेरिटेजचा काहीही संबंध नसल्याचे भाजप गटनेते विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनीही, प्रसंगी पुलाबाबत कायदा बदलून, पाठपुरावा करून पर्यायी पुलाचे काम पूर्ण करावे असे सुचविले. शिवाजी पुलाच्या खांबांचे काही दगड निसटल्याने तो धोकादायक स्थितीत असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी निदर्शनास आणले.पर्यायी पुलाचे काम थांबविण्यासाठी अधिकाऱ्यांसह आमच्यातील काही सहकारीही जबाबदार आहेत. त्यांनीच प्रशासनाला निवेदन देऊन काम थांबविले. प्रथम त्यांचा समाचार घ्यावा, असे बाबा पार्टे म्हणाले.जिल्हाधिकारी डॉ. सैनी म्हणाले, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची बैठक घेतली. जुन्या शिवाजी पुलाची तपासणी केली असता प्राथमिक स्थितीत तो भक्कम आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर पुन्हा एकदा पुलाची तपासणी करू. पर्यायी पुलाच्या अपुऱ्या कामांबाबत कागदपत्रे तपासून येत्या पंधरा दिवसांत काम सुरू होण्याबाबत सकारात्मक मार्ग काढू, असे आश्वासन दिले.यावेळी स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव, सभागृहाचे नेते प्रवीण केसरकर, विरोधी पक्षनेते संभाजी जाधव, नामदेवराव गावडे, संपत पाटील, किशोर घाटगे, भाजपचे माजी अध्यक्ष महेश जाधव, सतीशचंद्र कांबळे, सुभाष जाधव यांनीही आपल्या भूमिका मांडल्या. यावेळी उपमहापौर शमा मुल्ला, परिवहन समितीचे सभापती लाला भोसले, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वृषाली कदम, नगरसेवक राजसिंह शेळके, शोभा कवाळे, दीपा मगदूम, माजी नगरसेवक विक्रम जरग, अशोक पोवार, बी. एल. बर्गे, वसंतराव मुळीक, निरंजन कदम, आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.‘हेरिटेज’ पुलासाठी, मग ब्रह्मपुरीसाठी का नाही?पर्यायी पुलाच्या कामात ब्रह्मपुरी टेकडीच्या हेरिटेजचा मुद्दा पुढे करून काम थांबविले असेल तर त्याच ब्रह्मपुरी टेकडीवर बांधकामे होताना अधिकारी झोपले होते का? ती बांधकामे त्यांना दिसत नाहीत का? हेरिटेजच्या नावाखाली हे विकासात्मक काम थांबविण्याचा डाव आहे. लोकभावना लक्षात घेऊन पर्यायी पुलाचे थांबविलेले काम पूर्ववत सुरू करावे, अशीही मागणी यावेळी केली. सर्वपक्षीय बैठकीत निषेधसकाळी महाराणा प्रताप चौकात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक झाली. पर्यायी पुलाविरोधातील काहींनी अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याने त्यांचा निषेध नोंदविण्यात आला.