शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

रौप्यनगरी हुपरीस सरकारकडून ‘अच्छे दिन’चा आशावाद

By admin | Updated: November 5, 2014 23:39 IST

कामगारवर्गातून मागणी : शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ द्यावा

तानाजी घोरपडे - हुपरी --रौप्यनगरी हुपरी व वस्त्रोद्योगनगरी इचलकरंजीच्या चांदी व यंत्रमाग कामगारांना शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रत्यक्षात लाभ मिळवून देऊन हजारो कामगारांच्या आयुष्यात व त्यांच्या संसारात आनंद निर्माण करण्यासाठी नवनियुक्त सत्तारूढ भाजप सरकार तरी प्रयत्नशील राहणार काय? अशा चर्चा चांदी व यंत्रमाग कामगारांमधून केल्या जात आहेत. सर्वसामान्य गोरगरीब कामगारांच्या जीवनामध्ये सुखा-समाधानाचे व आनंदाचे क्षण निर्माण करण्याची जबाबदारी आता सहकार व वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांतदादा पाटील व आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर आली आहे. या दोघांनी प्रयत्न करून शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रत्यक्षात लाभ मिळवून द्यावा, असा आशावाद कामगारवर्गातून व्यक्त केला जात आहे.हुपरी, रेंदाळ व इचलकरंजी परिसरामध्ये चांदीचे दागिने तयार करण्याबरोबरच यंत्रमाग व्यवसायही मोठ्या प्रमाणात चालतो. या दोन्ही व्यवसायामध्ये लाखाहून अधिक कामगार कार्यरत आहेत. यामध्ये पुरुषांबरोबरच महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. प्रतिदिन मिळणाऱ्या अत्यल्प मजुरीमुळे पती-पत्नी दोघांना राबून संसाराचा गाडा चालवावा लागतो. दिवसाकाठी मिळणारी अत्यल्प मजुरी व दसरा-दीपावली सण साजरे करण्यासाठी अंगावर मिळणारी बाकी (उचल) यापेक्षा त्यांना जास्त काही दिले जात नाही. दिवसभर बसून, वाकून काम केल्यामुळे चांदी कामगारांना व यंत्रमागावर दिवस-रात्र उभे राहून काम केल्यामुळे यंत्रमाग कामगारांना मानेचा, कंबरेचा, पाठदुखीचा, डोळ्यांचा आजार पाचविलाच पूजलेला आहे. या कामगारांना कशाचेही संरक्षण नाही की म्हातारपणीची तजविज म्हणून भविष्यनिर्वाह निधीबरोबरच विमा योजनेचे संरक्षण नाही. दुर्दैवाने एखादा अपघात झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्याच्यावर अवलंबून असणारे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडते. चांदी व यंत्रमाग व्यवसायातील कामगार आपले संपूर्ण आयुष्य ‘वेठबिगारीचे’ जिणे जगत असतो. अशा पद्धतीने हलाखीचे जीवन जगणाऱ्या या कामगारांना शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, हे काम कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मध्यंतरी तत्कालीन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी या दोन्ही व्यवसायांतील कामगारांना लोककल्याणकारी महामंडळामध्ये समावेश करून त्यांना बांधकाम व घरेलू मोलकरीण वर्गाला मिळणाऱ्या सोयी-सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवस प्रयत्नही झाले. मात्र, पुढे आतापर्यंत काहीच झालेले नाही. नेहमीप्रमाणे शासनाच्या अनेक लोकहितकारक योजनांप्रमाणे ही योजनाही ‘लालफितीत’ अडकल्याचे चित्र आहे.याबाबत वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते कॅबिनेट बैठकीमध्ये व्यस्त असल्याचे त्यांच्या सहायकांनी सांगितले. तसेच आमदार सुरेश हाळवणकर यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते भेटू शकले नाहीत.