शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

शासनाचे उत्तम काम खुपत असल्याने विरोधकांचा बदनामीचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:25 IST

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शासनाचे उत्तम काम सुरू आहे, ते खुपत असल्याने प्रसिद्धीसाठी विरोधी पक्षाकडून शासनाच्या ...

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शासनाचे उत्तम काम सुरू आहे, ते खुपत असल्याने प्रसिद्धीसाठी विरोधी पक्षाकडून शासनाच्या बदनामीचा डाव आखला जात आहे, असा आरोप राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केला. जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकासकामांचा योग्य पाठपुरावा व्हावा याकरिता त्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी चर्चा केली.

महानगरपालिकेस नगरोत्थानमधून मंजूर होणाऱ्या १७८ कोटींच्या निधीचा आराखडा तयार करावा. यंदाच्या महापुरात बाधित अपार्टमेंटमधील वरच्या मजल्यावरील रहिवासी नागरिकांनाही शासनाने मदत जाहीर केली असून, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवावी. शहराच्या हद्दवाढीच्या दृष्टीने पाठपुरावा करावा. आयटी क्षेत्रात कोल्हापूरला नवी संधी असून, जिल्ह्यात आयटी पार्कसारखी संकल्पना राबविण्याचा आराखडा तयार करावा. श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा शासनाकडून मंजूर झाला असून, त्याच्या निधीकरिता पाठपुरावा करावा, आदी विषयांच्या बाबतीतही चर्चा केली.

क्षीरसागर म्हणाले, सत्तेत असताना ज्यांना डॉक्टर, नर्सेस, व्यापाऱ्यांचे प्रश्न कळले नाहीत, राज्यातील दोन नंबरचे प्रमुख मंत्री कोल्हापुरात असतानाही कोल्हापूरचा विकास खुंटला, कोणतीही योजना आखता आली नाही, असे असताना आरोग्य परिचारिकांच्या बदल्यांसंदर्भात आंदोलनाचा फायदा घेऊन विरोधी पक्षाकडून शासनाच्या बदनामीचा कुटिल डाव आखला आहे. आरोग्य परिचारिकांच्यातील नाराजी दूर करण्यास शासन सक्षम आहे, प्रसिद्धी माध्यमांकरवी माहिती नागरिकांना मिळत असल्याने त्यांचा सन्मान ठेवावा, प्रसिद्धी माध्यमे आणि अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय साधावा, असे आवाहन कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी केले.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले उपस्थित होते.

फोटो नं. १४०८२०२१-कोल-कलेक्टर मीटिंग

ओळ : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांच्या पाठपुराव्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी चर्चा केली.

140821\14kol_1_14082021_5.jpg

ओळ : कोल्हापुर जिल्ह्यातील प्रलंबीत विकास कामांच्या पाठपुराव्यासाठी व्हावा याकरिता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखवार यांच्याशी चर्चा केली.