शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

केंद्रीय किचन पद्धतीला पोषण आहार कर्मचाऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 19:02 IST

राज्य शासनाने केंद्रीय किचन पद्धतीची अंमलबजावणी सुरू केल्याने राज्यातील शालेय पोषण आहार कामगार बचत गटांच्या महिलांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे; त्यामुळे ही पद्धती मागे घ्यावी, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेतर्फे सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय किचन पद्धतीला पोषण आहार कर्मचाऱ्यांचा विरोधजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू

कोल्हापूर : राज्य शासनाने केंद्रीय किचन पद्धतीची अंमलबजावणी सुरू केल्याने राज्यातील शालेय पोषण आहार कामगार बचत गटांच्या महिलांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे; त्यामुळे ही पद्धती मागे घ्यावी, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेतर्फे सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शासनाने याबाबत तत्काळ निर्णय न घेतल्यास धरणे आंदोलनाचे रूपांतर बेमुदत उपोषणामध्ये होईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.‘माकप’चे नेते चंद्रकांत यादव व संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य ए. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील महिलांनी हे आंदोलन सुरू केले आहे. ‘सेंट्रल किचन हाय हाय...महिला बचत गटांच्या पोटावर पाय...’, ‘केंद्रीय किचन पद्धतीचा आदेश काढणाºया सरकारचा निषेध असो’, ‘महिलांचा रोजगार हिसकावून घेणाºया केंद्रीय पद्धती रद्द करा’ अशा आंदोलकांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. दरम्यान, याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, २००३ पासून शालेय पोषण आहार योजना चालू असून, केंद्र व राज्य सरकारतर्फे कार्य चालत आहे. यामध्ये महाराष्ट्रात एक लाख ६० हजार महिला काम करत आहेत. शासनाच्या धोरणानुसार बचत गट व व्यक्तिगत स्वरूपात काम करून घेतले जाते. जिल्ह्यात सात हजारपर्यंत महिला यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून काम करत आहेत.

१६ मार्च २०१९ ला राज्य शासनाने शिक्षण संचालकांतर्फे शालेय पोषण आहारासंदर्भात आदेश काढला. यामध्ये शालेय पोषण आहार योजनेंतर्गत नागरी भागातील शाळांमध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीकरिता स्वारस्याची अधिव्यक्ती मागविण्याबाबत आदेश काढला आहे.यामुळे यापूर्वीच्या शासनाच्या उद्देशामध्ये धोरणात्मक बदल केले आहेत. त्याचे परिणाम महिला व विद्यार्थ्यांवर होणार आहेत; त्यामुळे शासनाने लवकरात लवकर हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा बेमुदत धरणे आंदोलनाचे रूपांतर बेमुदत उपोषणामध्ये केले जाईल.आंदोलनात संघटनेच्या उपाध्यक्षा वर्षा कुलकर्णी, सचिव अमोल नाईक, सहसचिव अश्विनी साळोखे, साधना पाटील, शशिकला रायकर, कल्पना खोराटे, सुनीता मोहिते, संगीता घोरपडे, ललीता सावंत, आदी सहभागी झाल्या आहेत.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर