शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘राजाराम’च्या निवडणुकीत विरोधी गट ताकद लावणार

By admin | Updated: February 19, 2015 23:39 IST

महाडिक गट सक्रिय : पॅनेलमध्ये बावडा केंद्रस्थानी

रमेश पाटील - कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या प्राथमिक मतदार यादीवर दाखल झालेल्या सर्व १६ हरकती नुकत्याच फेटाळण्यात आल्या होत्या. याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात आल्याने ‘राजाराम’च्या निवडणुकीत विरोधी गट पूर्ण ताकदिनिशी रिंगणात उतरणार हे आता स्पष्ट झाले आहे.राजारामची एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी प्राथमिक मतदार यादी जाहीर झाली. या यादीवर १६ हरकती दाखल झाल्या. या सर्व हरकती सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) वाय. व्ही. सुर्वे यांनी फेटाळून लावल्या. हरकती फेटाळल्यानंतर विरोधी माजी मंत्री सतेज पाटील गटाने उच्च न्यायालयात दाद मागण्याचा आणि निवडणूक ताकदिनिशी लढविण्याचा निर्णय घेतला. त्याचाच एक भाग म्हणून उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली.प्राथमिक मतदार यादीवर हरकती घेणारे सर्व शेतकरी कसबा बावड्यातील आहेत. ४२४१ सभासदांच्या सभासदत्वावर या हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दिलेल्या निकालाबाबत पाच वेगवेगळ्या याचिकांद्वारे आर. के. पाटील, विश्वास नेजदार, बाळासाहेब पाटील, अनंत पाटील, नितीन पारखे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.दरम्यान, या निवडणुकीत आपण पूर्ण ताकदिनीशी रिंगणात उतरणार असल्याचे कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्वास नेजदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, सध्या पॅनेल तयार करण्याचे काम सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक ही लढविली जाणार आहे, सध्या त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.मतदार यादीची प्रक्रिया सुरूच राहणारआपण दिलेल्या निर्णयावर उच्च न्यायालयात हरकतदारांनी दाद मागितली आहे. मात्र, जोपर्यंत उच्च न्यायालयाकडून कोणताही आदेश येत नाही तोपर्यंत आपण मतदार यादीची प्रक्रिया तशीच सुरूच ठेवणार आहे.- वाय. व्ही. सुर्वे, प्रादेशिक सहसंचालक (साखर)‘राजाराम’कडे जिल्ह्याचे लक्षराजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा एकदा आमदार महादेवराव महाडिक व माजी मंत्री सतेज पाटील आमने-सामने येणार असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. सतेज पाटील गट या निवडणुकीबाबत आक्रमक झाला आहे. आमदार महाडिक गटानेही निवडणुकीची तयारी जोरात सुरू ठेवली आहे.दोन्ही पॅनेलमध्ये बावड्याला स्थानराजारामच्या निवडणुकीत सत्तारूढ आणि विरोधी अशा दोन्ही पॅनेलमध्ये प्रत्येकी दोन ते तीन उमेदवारांना हमखास स्थान मिळणार आहे. कारण ‘राजाराम’च्या निवडणुकीत बावडा केंद्रस्थानी असणार आहे.