शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

‘गोकुळ’ निवडणुकीसाठी विरोधक न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:14 IST

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या संचालकांची मुदत संपून वर्ष झाले असताना राज्य शासन संबंधित संस्थेच्या निवडणुकीला वारंवार मुदतवाढ देत ...

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या संचालकांची मुदत संपून वर्ष झाले असताना राज्य शासन संबंधित संस्थेच्या निवडणुकीला वारंवार मुदतवाढ देत आहे. हा सभासदांवर अन्याय असून, दूध संघाची निवडणूक तातडीने घ्यावी, अशी याचिका विरोधी गटाच्या वतीने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. यावर १० फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

‘गोकुळ’च्या संचालक मंडळाची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपलेली आहे. त्यामुळे निवडणूक प्राधिकरणाने जानेवारी २०२० पासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली होती. तोपर्यंत कोरोनाचे संकट आल्याने प्रक्रिया थांबवावी लागली. राज्य शासनाने डिसेंबर २०२० अखेर मुदतवाढ दिली. मात्र, या दरम्यान, बिहार विधानसभा, पदवीधर व शिक्षक मतदारसंघ व त्यानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेतल्या. तरीही सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा मार्च २०२१ पर्यंत लांबणीवर टाकल्याने सभासदांमध्ये अस्वस्थता आहे. हाच मुद्दा घेऊन केर्ली (ता. करवीर) येथील ज्योतिर्लिंग दूध संस्थेने गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर १० फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. यापूर्वी न्यायालयात गेलेल्या ३८ सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

कोट-

शासनाला सार्वत्रिक निवडणुका चालतात, मग सहकारी संस्थांच्या निवडणुकीची भीती का वाटते? हा सभासदांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार आहे. सभासदांच्या हक्कासाठी न्यायालयात गेलो/.

- बाबासाहेब चौगले (अध्यक्ष, ज्योतिर्लिंग दूध संस्था)