शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

सत्तारूढ-विरोधकांत आरोप-प्रत्यारोप

By admin | Updated: January 15, 2015 23:21 IST

‘पंचगंगा’ निवडणूक : शिरोळ-हातकणंगले तालुक्यांत हालचालींना वेग

इचलकरंजी : येथील पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमुळे शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्तारूढ पाटील गटाच्या विरोधात मगदूम गटाने सहा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले असले तरी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.पंचगंगा साखर कारखान्याचे सभासद महाराष्ट्रातील तीन व कर्नाटकातील दोन तालुक्यांत असल्याने ही निवडणूक बहुराज्य सहकारी संस्था अधिनियमान्वये होत आहे. पाच तालुक्यांत १७,७१८ उत्पादक सभासद असले तरी हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील सभासदांची संख्या सुमारे ७० टक्के आहे. उर्वरित सभासद चिकोडी, अथणी व करवीर तालुक्यांत आहेत. संचालकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर उत्पादक गटातील १२ जागेसाठी १७ उमेदवार, अनुत्पादक व्यक्ती गटातील एका जागेसाठी २ उमेदवार व संस्था गटाच्या एका जागेसाठी एक उमेदवार शिल्लक राहिले. परिणामी, उत्पादक गटाच्या १२ जागा व अनुत्पादक व्यक्ती गटाची एक जागा यासाठी २४ जानेवारीला मतदान घेण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेश कदम यांनी सर्वसाधारण सभेत दिली.कारखान्याचे सभासद पाच तालुक्यांतील १२१ गावांत असल्याने अवघ्या दहा दिवसांत या गावातील सभासदांपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यमान अध्यक्ष पी. एम. पाटील यांच्या पॅनेलमधील उमेदवारांनी १२ जानेवारीपासूनच संपर्क दौरा सुरू केला आहे; तर मगदूम गटानेही चिकोडी तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन सभासदांना आपली भूमिका सांगण्यास सुरुवात केली आहे.महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय संदर्भ बदलले आहेत. या बदललेल्या राजकीय परिस्थितीत कारखाना कार्यक्षेत्रातील गावोगावच्या नेत्यांना भेटताना दोन बाजूच्या नेतृत्वाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. (प्रतिनिधी)निवडणूक लादल्याची परस्परांवर टीकापंचगंगा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अनेक मान्यवरांची इच्छा असताना सुद्धा विरोधकांना एकही जागा देणार नाही, असा हेका सत्ताधाऱ्यांचा आहे. पैसा आणि सत्तेच्या जोरावर सभासदांवर सत्ताधाऱ्यांनी निवडणूक लादली, अशी टीका निवृत्त कामगार संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब शहापुरे यांनी केली.कारखान्याची निवडणूक लागू नये, यासाठी विरोधकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच म्हणणे कळविले होते; पण त्याला प्रतिसादच दिला नाही. उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशीसुद्धा आम्हाला झुलवत ठेवले आणि फसविले. त्यामुळे निवडणूक लागल्याचा आरोप सत्तारूढ गटाच्या प्रवक्त्याने दिला.