शहरं
Join us  
Trending Stories
1
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
2
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
3
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
4
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
5
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
6
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
7
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
8
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
9
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
10
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
11
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
12
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
13
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
14
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
15
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
16
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
17
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
18
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
19
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
20
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना

सत्तारूढ-विरोधकांत आरोप-प्रत्यारोप

By admin | Updated: January 15, 2015 23:21 IST

‘पंचगंगा’ निवडणूक : शिरोळ-हातकणंगले तालुक्यांत हालचालींना वेग

इचलकरंजी : येथील पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमुळे शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्तारूढ पाटील गटाच्या विरोधात मगदूम गटाने सहा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले असले तरी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.पंचगंगा साखर कारखान्याचे सभासद महाराष्ट्रातील तीन व कर्नाटकातील दोन तालुक्यांत असल्याने ही निवडणूक बहुराज्य सहकारी संस्था अधिनियमान्वये होत आहे. पाच तालुक्यांत १७,७१८ उत्पादक सभासद असले तरी हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील सभासदांची संख्या सुमारे ७० टक्के आहे. उर्वरित सभासद चिकोडी, अथणी व करवीर तालुक्यांत आहेत. संचालकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर उत्पादक गटातील १२ जागेसाठी १७ उमेदवार, अनुत्पादक व्यक्ती गटातील एका जागेसाठी २ उमेदवार व संस्था गटाच्या एका जागेसाठी एक उमेदवार शिल्लक राहिले. परिणामी, उत्पादक गटाच्या १२ जागा व अनुत्पादक व्यक्ती गटाची एक जागा यासाठी २४ जानेवारीला मतदान घेण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेश कदम यांनी सर्वसाधारण सभेत दिली.कारखान्याचे सभासद पाच तालुक्यांतील १२१ गावांत असल्याने अवघ्या दहा दिवसांत या गावातील सभासदांपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यमान अध्यक्ष पी. एम. पाटील यांच्या पॅनेलमधील उमेदवारांनी १२ जानेवारीपासूनच संपर्क दौरा सुरू केला आहे; तर मगदूम गटानेही चिकोडी तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन सभासदांना आपली भूमिका सांगण्यास सुरुवात केली आहे.महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय संदर्भ बदलले आहेत. या बदललेल्या राजकीय परिस्थितीत कारखाना कार्यक्षेत्रातील गावोगावच्या नेत्यांना भेटताना दोन बाजूच्या नेतृत्वाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. (प्रतिनिधी)निवडणूक लादल्याची परस्परांवर टीकापंचगंगा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अनेक मान्यवरांची इच्छा असताना सुद्धा विरोधकांना एकही जागा देणार नाही, असा हेका सत्ताधाऱ्यांचा आहे. पैसा आणि सत्तेच्या जोरावर सभासदांवर सत्ताधाऱ्यांनी निवडणूक लादली, अशी टीका निवृत्त कामगार संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब शहापुरे यांनी केली.कारखान्याची निवडणूक लागू नये, यासाठी विरोधकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच म्हणणे कळविले होते; पण त्याला प्रतिसादच दिला नाही. उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशीसुद्धा आम्हाला झुलवत ठेवले आणि फसविले. त्यामुळे निवडणूक लागल्याचा आरोप सत्तारूढ गटाच्या प्रवक्त्याने दिला.