शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक मंदीतही अर्थव्यवस्थेला सुधारण्याची संधी --वसंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 11:58 IST

कोल्हापूर : आर्थिक मंदी असली, तरी देखील आगामी वर्षामध्ये अर्थव्यवस्था सुधारण्याची नक्की संधी आहे. उद्योजकांना केंद्रीय अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा ...

कोल्हापूर : आर्थिक मंदी असली, तरी देखील आगामी वर्षामध्ये अर्थव्यवस्था सुधारण्याची नक्की संधी आहे. उद्योजकांना केंद्रीय अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा आहेत, असे प्रतिपादन रिलायन्स इंडस्ट्रीजमधील पॉलिस्टर म्यॅन्युफॅक्चर विभागाचे प्रमुख वसंत पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. शिवाजी उद्यमनगर येथील माधवराव बुधले सभागृहातील त्यांच्या व्याख्यानाचा विषय ‘उद्योगांसमोरील आव्हाने’ असा होता. वसंत पाटील म्हणाले, सरकारने गेल्या नऊ महिन्यांमध्ये ६४ बिलियन डॉलर इतकी परकीय गुंतवणूक केली असून, त्याद्वारे आर्थिक मंदीमधून सावरण्यासाठी मदत होईल. या मंदीच्या स्थितीतही भारतातील शेअर बाजार स्थिर असल्याने अर्थव्यवस्था नवी भरारी घेईल, असे वाटते. त्यामुळे फारसे घाबरण्याची गरज नाही.

या कार्यक्रमास उद्योजक रामप्रताप झंवर, बाबाभाई वसा, व्ही. एन. देशपांडे, सचिन मेनन, ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील, इंजिनिअरिंग असोसिएशनचे हर्षद दलाल, कमलाकांत कुलकर्णी, नरेंद्र माटे, दिनेश बुधले, डॉ. व्ही. व्ही. कार्जिनी, प्रदीपभाई कापडिया, मोहन पंडितराव, शिवाजीराव पोवार, संजय पेंडसे, आदी उपस्थित होते. इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष अतुल आरवाडे यांनी स्वागत केले. नितीन वाडीकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रदीप व्हरांबळे यांनी सूत्रसंचालन केले. तर इंजिनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष रणजित शहा यांनी आभार मानले. दरम्यान, वसंत पाटील हे कोल्हापूरचे आहेत. गेल्या २८ वर्षांपासून ते रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये कार्यरत आहेत.अर्थसंकल्पाबाबत पाटील यांचे अंदाज* कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात होईल.* उद्योगांवरील करांमध्ये आणि वैयक्तिक प्राप्तिकरात दिलासा मिळू शकतो.* लाभांशांवरील (डिव्हिडंड) करामध्ये सुधारणा होईल.* उद्योगांना चालना देण्यासाठी विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद.

 

  • संशोधन, नवतंत्रज्ञानावर खर्च करा. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे रोजगार कमी होतील हा समज चुकीचा आहे. कारण रोबोट तयार करण्यासाठी सुद्धा नवीन उद्योग उभारणी करावी लागते. त्यासाठी मनुष्यबळाची खूप आवश्यकता असते. संशोधन आणि नवतंत्रज्ञानावर जास्तीत जास्त खर्च करून उद्योजकांनी परकीय बाजारपेठ काबीज करावी, असे आवाहन पाटील यांनी केले.

  

 

टॅग्स :Budgetअर्थसंकल्पkolhapurकोल्हापूर