शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक मंदीतही अर्थव्यवस्थेला सुधारण्याची संधी --वसंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 11:58 IST

कोल्हापूर : आर्थिक मंदी असली, तरी देखील आगामी वर्षामध्ये अर्थव्यवस्था सुधारण्याची नक्की संधी आहे. उद्योजकांना केंद्रीय अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा ...

कोल्हापूर : आर्थिक मंदी असली, तरी देखील आगामी वर्षामध्ये अर्थव्यवस्था सुधारण्याची नक्की संधी आहे. उद्योजकांना केंद्रीय अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा आहेत, असे प्रतिपादन रिलायन्स इंडस्ट्रीजमधील पॉलिस्टर म्यॅन्युफॅक्चर विभागाचे प्रमुख वसंत पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. शिवाजी उद्यमनगर येथील माधवराव बुधले सभागृहातील त्यांच्या व्याख्यानाचा विषय ‘उद्योगांसमोरील आव्हाने’ असा होता. वसंत पाटील म्हणाले, सरकारने गेल्या नऊ महिन्यांमध्ये ६४ बिलियन डॉलर इतकी परकीय गुंतवणूक केली असून, त्याद्वारे आर्थिक मंदीमधून सावरण्यासाठी मदत होईल. या मंदीच्या स्थितीतही भारतातील शेअर बाजार स्थिर असल्याने अर्थव्यवस्था नवी भरारी घेईल, असे वाटते. त्यामुळे फारसे घाबरण्याची गरज नाही.

या कार्यक्रमास उद्योजक रामप्रताप झंवर, बाबाभाई वसा, व्ही. एन. देशपांडे, सचिन मेनन, ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील, इंजिनिअरिंग असोसिएशनचे हर्षद दलाल, कमलाकांत कुलकर्णी, नरेंद्र माटे, दिनेश बुधले, डॉ. व्ही. व्ही. कार्जिनी, प्रदीपभाई कापडिया, मोहन पंडितराव, शिवाजीराव पोवार, संजय पेंडसे, आदी उपस्थित होते. इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष अतुल आरवाडे यांनी स्वागत केले. नितीन वाडीकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रदीप व्हरांबळे यांनी सूत्रसंचालन केले. तर इंजिनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष रणजित शहा यांनी आभार मानले. दरम्यान, वसंत पाटील हे कोल्हापूरचे आहेत. गेल्या २८ वर्षांपासून ते रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये कार्यरत आहेत.अर्थसंकल्पाबाबत पाटील यांचे अंदाज* कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात होईल.* उद्योगांवरील करांमध्ये आणि वैयक्तिक प्राप्तिकरात दिलासा मिळू शकतो.* लाभांशांवरील (डिव्हिडंड) करामध्ये सुधारणा होईल.* उद्योगांना चालना देण्यासाठी विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद.

 

  • संशोधन, नवतंत्रज्ञानावर खर्च करा. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे रोजगार कमी होतील हा समज चुकीचा आहे. कारण रोबोट तयार करण्यासाठी सुद्धा नवीन उद्योग उभारणी करावी लागते. त्यासाठी मनुष्यबळाची खूप आवश्यकता असते. संशोधन आणि नवतंत्रज्ञानावर जास्तीत जास्त खर्च करून उद्योजकांनी परकीय बाजारपेठ काबीज करावी, असे आवाहन पाटील यांनी केले.

  

 

टॅग्स :Budgetअर्थसंकल्पkolhapurकोल्हापूर