शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

जुन्या चेहऱ्यांना दिलेली संधी महाडिकांच्या पथ्यावर

By admin | Updated: April 22, 2015 00:28 IST

राजाराम कारखाना विजय : कोरेंची साथ असूनही सतेज पाटलांनी लढविला एकतर्फी किल्ला

रमेश पाटील - कसबा बावडाजुन्या सहकाऱ्यांना दिलेली संधी, हातकणंगले तालुक्यासह करवीरमध्ये मारलेली मुसंडी यामुळे राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक यांनी सलग पाचव्यांदा एकतर्फी विजय मिळाला. महाडिक यांची सत्ता हटविण्यासाठी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी जोरदार फिल्डिंग लावली. परंतु, त्यांना महाडिक यांचा बालेकिल्ला असणाऱ्या हातकणंगले तालुक्याने हात दिला नाही.विधानसभेच्या निवडणुकीनंतर काहीकाळ राजकीय विजनवासात गेलेल्या माजी मंत्री सतेज पाटील यांनी निवडणूक जाहीर होताच कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कारखाना कार्यक्षेत्रातील गावोगावी भेटी देऊन सभासदांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न घेत निवडणुकीची तयारी सुरू केली. प्रचार सभांमध्ये सभासदांना ‘हीच वेळ आहे परिवर्तनाची.... आता नाही तर कधीच नाही...’, अशी ‘भावनिक’ साद घातली. या निवडणुकीत माजी मंत्री विनय कोरे यांचा सतेज पाटील पॅनेलला जरी पाठिंबा असला, तरी ते प्रचारात प्रत्यक्षात कोठेही दिसलेच नाहीत. त्यामुळे हातकणंगले तालुक्यात सतेज पाटील गटाला मुसंडी मारता आली नाही. त्यामुळे पाटील हे एकटेच मैदानात लढत राहिले. त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनीही गावागावांत सभा घेऊन ‘परिवर्तन’ करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांचा प्रभाव म्हणावा तसा पडला नाही. मागील निवडणुकीत सतेज पाटील यांना विनय कोरे, हसन मुश्रीफ, निवेदिता माने यांची मदत झाली होती. या निवडणुकीत तसे चित्र दिसले नाही.आमदार महाडिक यांनी सुरुवातीला ही निवडणूक अगदी सहजपणे घेतली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते नेहमी ‘राजाराम’ची निवडणूक ही एकतर्फी होणार असे म्हणत असतं. परंतु, जसजशी निवडणूक जवळ येईल, तसे महाडिक अधिक सावध झाले. पॅनेलची आखणी करताना बऱ्यापैकी ‘रोटेशन’ पद्धत अवलंबत संधी मिळालेल्या विद्यमानांपैकी काहींना थांबवत जुन्या सहकाऱ्यांना परत घेत पॅनेलपासून कोणी दुरावणार नाही, याची दक्षता घेतली. काहींना भविष्यात तुमच्याकडे पाहिले जाईल, असे आश्वासन देत विरोधी आघाडीस कोणी मिळणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली.जे येतील त्यांना बरोबर घेत सतेज पाटील यांनी आपली लढाई सुरूच ठेवली. त्यांना करवीर, गगनबावडा, राधानगरी तालुक्यांत चांगली साथ मिळाली. दक्षिण मतदारसंघातील काही गावांतही त्यांना चांगली मते मिळाली. पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा बावड्यानेही त्यांना चांगली साथ दिली. याउलट महाडिकांनी करवीरमधील अनेक मोठ्या गावात मुसंडी मारत चांगले मताधिक्य घेत सत्ता ताब्यात ठेवली. प्रचाराच्या होत असलेल्या आरोपाने ते कधीही विचलित झाले नाहीत. उलट ‘राजाराम’वर आपलीच सत्ता येणार, असे ते नेहमीच ठणकावून सांगायचे आणि घडलेही अगदी तसेच.या निवडणुकीतील दोन्ही पॅनेलला मिळालेल्या मतांचे आकडे पाहिले, तर १०० ते ३०० मतांच्या फरकाने महाडिक यांच्या पॅनेलने जागा जिंकल्या आहेत. जर निवडणूक एकतर्फी होती, असे महाडिक नेहमी म्हणत असले, तरी त्यांचे उमेदवार इतक्या कमी मताने कसे विजयी झाले? याचे आत्मचिंतन महाडिक यांना आता करावेच लागणार आहे. विजयानंतर आता त्यांच्यासमोर आव्हान आहे ते निवडणूक प्रचारात सभासदांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे. वेळेत उसाची तोड व्हावी आणि सरासरी इतर पाच कारखान्यांपेक्षा जादा दर मिळावा, एवढीच सभासदांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. वर्षभरात महाडिकांना सलग चौथ्यांदा यश मिळाले आहे.