शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
5
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
6
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
7
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
8
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
9
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
10
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
11
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
12
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
13
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
14
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
15
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
16
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
17
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
18
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
19
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
20
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

जुन्या चेहऱ्यांना दिलेली संधी महाडिकांच्या पथ्यावर

By admin | Updated: April 22, 2015 00:28 IST

राजाराम कारखाना विजय : कोरेंची साथ असूनही सतेज पाटलांनी लढविला एकतर्फी किल्ला

रमेश पाटील - कसबा बावडाजुन्या सहकाऱ्यांना दिलेली संधी, हातकणंगले तालुक्यासह करवीरमध्ये मारलेली मुसंडी यामुळे राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक यांनी सलग पाचव्यांदा एकतर्फी विजय मिळाला. महाडिक यांची सत्ता हटविण्यासाठी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी जोरदार फिल्डिंग लावली. परंतु, त्यांना महाडिक यांचा बालेकिल्ला असणाऱ्या हातकणंगले तालुक्याने हात दिला नाही.विधानसभेच्या निवडणुकीनंतर काहीकाळ राजकीय विजनवासात गेलेल्या माजी मंत्री सतेज पाटील यांनी निवडणूक जाहीर होताच कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कारखाना कार्यक्षेत्रातील गावोगावी भेटी देऊन सभासदांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न घेत निवडणुकीची तयारी सुरू केली. प्रचार सभांमध्ये सभासदांना ‘हीच वेळ आहे परिवर्तनाची.... आता नाही तर कधीच नाही...’, अशी ‘भावनिक’ साद घातली. या निवडणुकीत माजी मंत्री विनय कोरे यांचा सतेज पाटील पॅनेलला जरी पाठिंबा असला, तरी ते प्रचारात प्रत्यक्षात कोठेही दिसलेच नाहीत. त्यामुळे हातकणंगले तालुक्यात सतेज पाटील गटाला मुसंडी मारता आली नाही. त्यामुळे पाटील हे एकटेच मैदानात लढत राहिले. त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनीही गावागावांत सभा घेऊन ‘परिवर्तन’ करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांचा प्रभाव म्हणावा तसा पडला नाही. मागील निवडणुकीत सतेज पाटील यांना विनय कोरे, हसन मुश्रीफ, निवेदिता माने यांची मदत झाली होती. या निवडणुकीत तसे चित्र दिसले नाही.आमदार महाडिक यांनी सुरुवातीला ही निवडणूक अगदी सहजपणे घेतली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते नेहमी ‘राजाराम’ची निवडणूक ही एकतर्फी होणार असे म्हणत असतं. परंतु, जसजशी निवडणूक जवळ येईल, तसे महाडिक अधिक सावध झाले. पॅनेलची आखणी करताना बऱ्यापैकी ‘रोटेशन’ पद्धत अवलंबत संधी मिळालेल्या विद्यमानांपैकी काहींना थांबवत जुन्या सहकाऱ्यांना परत घेत पॅनेलपासून कोणी दुरावणार नाही, याची दक्षता घेतली. काहींना भविष्यात तुमच्याकडे पाहिले जाईल, असे आश्वासन देत विरोधी आघाडीस कोणी मिळणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली.जे येतील त्यांना बरोबर घेत सतेज पाटील यांनी आपली लढाई सुरूच ठेवली. त्यांना करवीर, गगनबावडा, राधानगरी तालुक्यांत चांगली साथ मिळाली. दक्षिण मतदारसंघातील काही गावांतही त्यांना चांगली मते मिळाली. पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा बावड्यानेही त्यांना चांगली साथ दिली. याउलट महाडिकांनी करवीरमधील अनेक मोठ्या गावात मुसंडी मारत चांगले मताधिक्य घेत सत्ता ताब्यात ठेवली. प्रचाराच्या होत असलेल्या आरोपाने ते कधीही विचलित झाले नाहीत. उलट ‘राजाराम’वर आपलीच सत्ता येणार, असे ते नेहमीच ठणकावून सांगायचे आणि घडलेही अगदी तसेच.या निवडणुकीतील दोन्ही पॅनेलला मिळालेल्या मतांचे आकडे पाहिले, तर १०० ते ३०० मतांच्या फरकाने महाडिक यांच्या पॅनेलने जागा जिंकल्या आहेत. जर निवडणूक एकतर्फी होती, असे महाडिक नेहमी म्हणत असले, तरी त्यांचे उमेदवार इतक्या कमी मताने कसे विजयी झाले? याचे आत्मचिंतन महाडिक यांना आता करावेच लागणार आहे. विजयानंतर आता त्यांच्यासमोर आव्हान आहे ते निवडणूक प्रचारात सभासदांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे. वेळेत उसाची तोड व्हावी आणि सरासरी इतर पाच कारखान्यांपेक्षा जादा दर मिळावा, एवढीच सभासदांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. वर्षभरात महाडिकांना सलग चौथ्यांदा यश मिळाले आहे.