शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

कामकाज सुधारण्याची संधी अन् आव्हानही

By admin | Updated: March 4, 2015 23:55 IST

जिल्हा बँक राजकारण : कारभाऱ्यांनी मानसिकता बदलण्याची गरज

राजाराम लोंढे - कोल्हापूर -सहकार विभागाच्या कारवाईला न्यायालयाने स्थगिती देऊन माजी संचालकांना दिलासा दिला खरा; पण आगामी काळात नियमानुसार कामकाज करण्याचे आव्हान मात्र त्यांच्यासमोर कायम राहणार आहे. संचालक मंडळांची बरखास्ती, संचालकांची चौकशी व त्यानंतर १४७ कोटींची जबाबदारी निश्चिती या प्रकरणामुळे माजी संचालकांची पुरती नाचक्की झालेली आहे. आगामी निवडणुकीत मागील काळात सत्तेत असणारी अथवा विरोधात असणारी मंडळीच पुन्हा सत्तेत जाणार, हे निश्चित असले तरी कारभार सुधारला तरच ग्रामीण अर्थवाहिनी जिवंत राहणार आहे. याचे भान कारभाऱ्यांनी ठेवणे गरजेचे आहे. जिल्हा बॅँकेतील माजी संचालकांच्या कारभाराची गेली पाच वर्षे राज्यभर चर्चा सुरू आहे. विनातारण व अपुरा कर्जपुरवठा त्यातून बॅँक सेक्शन ११ (१) मध्ये गेली. त्यानंतर संचालक मंडळ बरखास्ती अशा कारवाया सुरूच आहेत. त्यात ११२ कोटींच्या अपात्र कर्जमाफीचे प्रकरण तीन वर्षे राज्यभर गाजले. संचालकांनी केलेल्या कारभाराचा साऱ्या राज्यभर पंचनामा झाला. यामुळे संचालकांची बदनामी झालीच; पण ग्रामीण जीवनाची अर्थवाहिनीअसलेल्या जिल्हा बॅँकेच्या अब्रूची लक्तरे राज्यभर टांगली गेली. पाच वर्षांच्या प्रशासकीय कालावधीत धनंजय डोईफोडे, उत्तम इंदलकर व प्रतापसिंह चव्हाण यांनी बॅँकेला आर्थिक अरिष्टातून बाहेर काढले. संचालक मंडळांनी केलेल्या चुका सुधारत बॅँकेला अतिदक्षता विभागातून बाहेर काढले; पण बॅँकेची स्थिती अजूनही नाजूकच आहे. कारवाईला स्थगिती मिळाल्याने संचालकांना दिलासा मिळाला आहे. बॅँकेच्या आगामी निवडणुकीत यातील बहुतांश चेहरे पुन्हा बॅँकेत येणार आहेत. दोन्ही कॉँग्रेसपैकी एका कॉँग्रेसच्या हातात बॅँकेची सूत्रे जाणार हे निश्चित आहे. पुन्हा तेच कारभारी बॅँकेत जाणार आहेत. पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशा पद्धतीने कामकाज केले तर बॅँकेला दुसऱ्यांदा अतिदक्षता विभागात जाण्यास वेळ लागणार नाही. हात झटकले तर तुम्हाला झटकतीलकारवाईच्या काळात राष्ट्रवादी सत्तेत, तर कॉँग्रेस विरोधात होती. कारभाराला राष्ट्रवादीच जबाबदार आहे, आमचा काहीच संबंध नसल्याचे कॉँग्रेसचे नेते सांगतात; पण प्रशासक नियुक्तीची कारवाई होईपर्यंत विरोधक म्हणून कॉँग्रेसने काय भूमिका घेतली? अशी विचारणाहोते. आता सत्तेत जावा अथवा विरोधात बसा; एकमेकांच्या कारभाराबाबत अंग झटकले तर तुम्हाला झटकल्याशिवाय राहणार नाही, अशी मानसिकता शेतकऱ्यांची झाली आहे. ठेवीदारांच्या विश्वासाला सलाम !एखाद्या बॅँकेवर प्रशासक नियुक्तीची कारवाई होणार हे समजले तरी दुसऱ्या दिवसापासून ठेवी काढण्यासाठी ठेवीदारांच्या बॅँकेत रांगा लागतात. जिल्हा बॅँकेवर प्रशासक आले. अपात्र कर्जमाफीमुळे बॅँकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. वर्तमानपत्रांतून बॅँकेच्या कारभाराचे रोज वाभाडे काढले जात असतानाही ठेवीदार मात्र बॅँकेच्या पाठीशी ठाम उभा राहिला.