शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूरच्या भुयारी गटार योजनेला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 23:06 IST

उदगावला सभेत निर्णय : उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाडसह नऊ गावे एकत्र

लोकमत न्यूज नेटवर्क -उदगाव : ग्रामीण भागात शुद्ध पाणी नसल्याने सध्या अनेक गावांत दूषित पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत जयसिंगपूर शहराला भुयारी गटार योजना मंजूर झाली आहे. मात्र, भुयारी गटार योजनेचे सांडपाणी कृष्णा नदीपात्रात सोडू देणार नाही, यासाठी कृष्णाकाठावरील सर्व गावांनी ग्रामसभेत भुयारी गटार योजनेच्या विरोधात ठराव केला आहे. तो जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदनद्वारे देणार आहे. उदगाव येथे जिल्हा परिषद मतदार संघातील प्रभाग सभा उदगाव ग्रामपंचायत कार्यालयात झाली. अध्यक्षस्थानी जि. प.च्या सदस्या स्वाती सासने होत्या. यावेळी कृष्णाकाठावरील उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड, कनवाड, कुटवाड, घालवाड, हसूर या गावांतील सरपंच व पदाधिकाऱ्यांनी जयसिंगपूर भुयारी गटार योजनेला विरोध दर्शविला. उदगावच्या सरपंच स्वाती पाटील म्हणाल्या, उदगावचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. जयसिंगपूर भुयारी गटार योजनेला विरोध असून, ओढा स्वच्छ करावा. घालवाडच्या सरपंच प्रतीक्षा परीट यांनी मराठी शाळेला शिक्षक देण्याची मागणी केली, तर कुटवाडच्या सरपंच सुकन्या पाटील यांनी स्वच्छ पाणी, स्मशानभूमी, वीज, औषधे यांची मागणी केली.उपसभापती कविता चौगुले, पं. स.चे सदस्य मन्सूर मुल्लाणी यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामविकास अधिकारी भाग्यश्री केदार यांनी स्वागत, विस्तार अधिकारी अनिल ओमासे यांनी प्रास्ताविक केले. शाखा अभियंता एस. एस. देशमुख, बी. आर. चव्हाण, अनंत माने, फारुख नालबंद, पंकज मगदूम, शिवाजी कोळी, गटविकास अधिकारी काळगे, सविता ठोमके, प्रमोद चौगुले, सुनील चौगुले, अनिल सुतार, प्रकाश बंडगर, सुरेखा गडदू, प्रज्ञा मगदूम, लता वरेकर, पूजा कोळी, माधुरी आंबी उपस्थित होते. योजना आताच बंद पाडूयाजयसिंगपूर शहराने ग्रामीण व कृष्णाकाठावरील जनतेचा विचार न करता फक्त राजकारणाचा वापर करून योजनेला मंजुरी आणली आहे. कृष्णा नदीतील पाणी पिणाऱ्या जनतेला दूषित पाणी प्यावे लागणार आहे. त्यामुळे ही योजना आताच बंद पाडूया, अशी भूमिका कुटवाडचे नवजित पाटील यांनी मांडली.