शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

जयसिंगपूरच्या भुयारी गटार योजनेला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 23:06 IST

उदगावला सभेत निर्णय : उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाडसह नऊ गावे एकत्र

लोकमत न्यूज नेटवर्क -उदगाव : ग्रामीण भागात शुद्ध पाणी नसल्याने सध्या अनेक गावांत दूषित पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत जयसिंगपूर शहराला भुयारी गटार योजना मंजूर झाली आहे. मात्र, भुयारी गटार योजनेचे सांडपाणी कृष्णा नदीपात्रात सोडू देणार नाही, यासाठी कृष्णाकाठावरील सर्व गावांनी ग्रामसभेत भुयारी गटार योजनेच्या विरोधात ठराव केला आहे. तो जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदनद्वारे देणार आहे. उदगाव येथे जिल्हा परिषद मतदार संघातील प्रभाग सभा उदगाव ग्रामपंचायत कार्यालयात झाली. अध्यक्षस्थानी जि. प.च्या सदस्या स्वाती सासने होत्या. यावेळी कृष्णाकाठावरील उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड, कनवाड, कुटवाड, घालवाड, हसूर या गावांतील सरपंच व पदाधिकाऱ्यांनी जयसिंगपूर भुयारी गटार योजनेला विरोध दर्शविला. उदगावच्या सरपंच स्वाती पाटील म्हणाल्या, उदगावचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. जयसिंगपूर भुयारी गटार योजनेला विरोध असून, ओढा स्वच्छ करावा. घालवाडच्या सरपंच प्रतीक्षा परीट यांनी मराठी शाळेला शिक्षक देण्याची मागणी केली, तर कुटवाडच्या सरपंच सुकन्या पाटील यांनी स्वच्छ पाणी, स्मशानभूमी, वीज, औषधे यांची मागणी केली.उपसभापती कविता चौगुले, पं. स.चे सदस्य मन्सूर मुल्लाणी यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामविकास अधिकारी भाग्यश्री केदार यांनी स्वागत, विस्तार अधिकारी अनिल ओमासे यांनी प्रास्ताविक केले. शाखा अभियंता एस. एस. देशमुख, बी. आर. चव्हाण, अनंत माने, फारुख नालबंद, पंकज मगदूम, शिवाजी कोळी, गटविकास अधिकारी काळगे, सविता ठोमके, प्रमोद चौगुले, सुनील चौगुले, अनिल सुतार, प्रकाश बंडगर, सुरेखा गडदू, प्रज्ञा मगदूम, लता वरेकर, पूजा कोळी, माधुरी आंबी उपस्थित होते. योजना आताच बंद पाडूयाजयसिंगपूर शहराने ग्रामीण व कृष्णाकाठावरील जनतेचा विचार न करता फक्त राजकारणाचा वापर करून योजनेला मंजुरी आणली आहे. कृष्णा नदीतील पाणी पिणाऱ्या जनतेला दूषित पाणी प्यावे लागणार आहे. त्यामुळे ही योजना आताच बंद पाडूया, अशी भूमिका कुटवाडचे नवजित पाटील यांनी मांडली.