शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नवीन संकल्पनेचा वापर केला तरच ‘आत्मनिर्भर भारत’ उभारेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : भारतात चांगल्या प्रकारचे प्रतिभा व संसाधन आहे. स्थानिक गरजा आणि बाजारपेठेतील संधी लक्षात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : भारतात चांगल्या प्रकारचे प्रतिभा व संसाधन आहे. स्थानिक गरजा आणि बाजारपेठेतील संधी लक्षात घेऊन उद्योजकांनी नवीन संकल्पना मांडून त्यानुसार वाटचाल केली, तरच आपण खऱ्याअर्थाने ‘आत्मनिर्भर भारत‘ उभारू शकू, असे प्रतिपादन भारताचे माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले. गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्यावतीने रविवारी कोल्हापुरात आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत हाेते.

डॉ. ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, उद्योग आणि भाषा याचे वेगळे नाते आहे. जपान, जर्मनी, फ्रान्स देशांच्या प्रगतीचे रहस्य त्यांची भाषा आहे. भाषा एक साधन असून ते संस्कृतीचे वाहन आहे. रशिया, चीनने इंग्रजी भाषा स्वीकारली नाही. भारतात मात्र याबाबत विचार होणे अपेक्षित आहे. प्रगत देशांनी फेकून दिलेल्या गोष्टी आपण कवटाळून बसल्याने प्रदूषणासह इतर समस्यांना आपणाला सामोरे जावे लागते.

कोविडच्या काळात उद्योगाची चाके थांबली, हे सगळ्या जगात झाले. मात्र त्यातून बाहेर पडून पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, काेविडच्या काळात उद्योगांचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. कर्जाचे हप्ते थकल्याने बँकांचा वसुलीचा तगादा आहे. केंद्र सरकारने २० लाख कोटीच्या पॅकेजची घोेषणा केली, त्याचा एकाही घटकाला लाभ झाला नाही. अडचणीतील उद्योगाला चालना देण्यासाठी बँकांसोबत बसून तडजोड करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे.

‘गोशिमा’चे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुनील शेळके यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. निखिल चोरगे व नेहा चोरगे यांना पीएच.डी. मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार डॉ. मुळे यांच्याहस्ते करण्यात आला.

यावेळी आमदार राजेश पाटील, ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन, सचिन शिरगावकर, पल्लवी कोरगावकर आदी उपस्थित होते.

मोदींच्या घोषणांची अंमलबजावणी किती?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या योजनांच्या नावांची यादी वाचायची म्हटली, तर ती संपत नाही. मात्र कल्पना आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी यामध्ये खूप फरक असल्याने योजनांचा फायदा सामान्यांना किती झाला, हे पाहणे गरजेचे असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.

‘संशोधन केंद्रा’साठी १०० काेटीचा निधी मिळावा

‘गोशिमा’ संशोधन आणि विकास केंद्र विकसित करत असून त्यासाठी १०० कोटीची गरज आहे. सरकारकडून हा निधी मिळण्यासाठी आपल्या स्तरावर प्रयत्न व्हावा, अशी मागणी आमदार जाधव यांनी केली.

फोटो ओळी :

‘गोशिमा’च्यावतीने रविवारी कोल्हापुरात आयोजित केलेल्या चर्चासत्रात डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उद्योजक उपस्थित होते.

(फाेटो-२६०९२०२१-कोल-ज्ञानेश्वर मुळे०१व ज्ञानेश्वर मुळे०२) (छाया- आदित्य वेल्हाळ)