शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

...तरच ‘अंबाबाई’च्या दर्शनाला जाईन-

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:37 IST

सतीश माने-शिंदे : श्रीपूजक हटाओ दिवाणी दावा प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांना हटविण्यासाठी मी अशिलांतर्फे वकीलपत्र घेतले आहे. ही संधी म्हणजे माझ्यासाठी देवीचे बोलावणेच आहे. माझ्या अशिलाच्या बाजूने जर निकाल लागला, तरच ‘अंबाबाई’च्या दर्शनाला जाईन, असे ज्येष्ठ विधिज्ज्ञ अ‍ॅड. सतीश माने-शिंदे यांनी सोमवारी येथे सांगितले. करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील ‘पुजारी हटाओ’प्रश्नी दिलीप पाटील व दिलीप देसाई यांच्यातर्फे अ‍ॅड. सूर्यकांत चौगुले, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी वकीलपत्र घेतले आहे. त्यात ज्येष्ठ विधिज्ज्ञ म्हणून अ‍ॅड. सतीश माने-शिंदे हे काम पाहणार आहेत. या पार्श्वभूमीवर ते कोल्हापुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अ‍ॅड. माने-शिंदे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी ज्याप्रमाणे हुकूमनामा केला होता. त्याप्रमाणे अंबाबाई मंदिरात श्रीपूजकांनी कार्य केले नाही. त्यात देवीला टाकलेल्या पैशांमध्ये जर कोणी शंभर रुपये टाकत असेल तर त्यातील केवळ दहा रुपये आपल्यासाठी घेऊन उर्वरित पैसे विश्वस्त किंवा सरकारजमा होणे अपेक्षित होते. तसे न होता आतापर्यंत श्रीपूजकांनी पैसे हडप केले आहेत. आतापर्यंत दुरूपयोग करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी स्वत:हून कृती करायला हवी होती. मात्र, तसे घडलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी कारवाई न करण्यामागे राजकीय दबाव आहे का? त्यात कोण हस्तक्षेप करत आहे हेही पाहिले पाहिजे. सन १९४४ च्या देवस्थान कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे अधिकार कायद्याने दिले आहेत. मंदिरात लोकांकडून टाकलेल्या दानाचे पैसे कुठे जातात, याची चौकशी करण्याचा अधिकारही जिल्हाधिकाऱ्यांच्या आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया केली ती योग्यच होती. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक नागरिक जाऊ शकतो. त्यामुळे चौकशीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना नाहीत, असे म्हणता येणार नाही. श्रीपूजकांची नेमणूक ही विश्वस्तांनी केलेली असते. त्यामुळे ही बाब श्रीपूजकांनी विसरून चालणार नाही. या मंदिरातील आतील सर्व देणग्या व दान हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखेखाली येणे गरजेचे आहे. त्यातून पारदर्शकता निर्माण होईल. शेवटी हा पैसा जनतेतून देवीला दान केलेला असतो. त्याचा विनियोग करण्याचे काम शासनाचे आहे. त्यात अन्य लोकांनी हस्तक्षेप करता कामा नये. या प्रकरणात यापूर्वी कोल्हापुरातील ज्येष्ठ विधिज्ज्ञांनी सहभाग घ्यायला हवा होता, असे मतही त्यांनी व्यक्त केले.+पाटील, देसाई प्रतिवादीसाठी न्यायालयाला विनंती करणारगजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना प्रतिवादी केले आहे. मात्र, यात ‘श्रीपूजक हटाओ’ची मागणी करणाऱ्या संघर्ष समितीमधील पदाधिकाऱ्यांना त्यात प्रतिवादी केलेले नाही. त्यामुळे या दाव्यात दिलीप पाटील, दिलीप देसाई हे स्वत:हून प्रतिवादी होण्यासाठी न्यायालयाला विनंती करणार आहेत. त्यात पाटील व देसाई यांच्यातर्फे अ‍ॅड. सूर्यकांत चौगुले, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी वकीलपत्र घेतले असून ज्येष्ठ विधिज्ज्ञ म्हणून सतीश माने-शिंदे या याचिकेसंबंधी भक्तांच्यावतीने काम पाहणार आहेत. ‘व्हीआयपी कल्चर’ इथेही बंद करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील उच्चाधिकारी व मंत्रिमहोदयांचे ‘व्हीआयपी कल्चर’ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातून देशातील अनेक मुख्यमंत्री, मंत्री, अनेक उच्च अधिकाऱ्यांनी स्वत:हून आपल्या गाड्यांवरील लाल दिवे लावण्याचे बंद केले आहे. त्याप्रमाणे देव-देवतांच्या दारामध्ये दर्शनासाठी आल्यानंतर देवीला अथवा देवाला भक्त सारखेच असतात. त्यात गरीब-श्रीमंत हा भेदभाव नसतो. त्यामुळे अंबाबाई मंदिरातील ‘व्हीआयपी दर्शन’ही कुठल्याही परिस्थितीत प्रशासनाने बंद करावे, असे मतही ज्येष्ठ विधिज्ञ सतीश माने-शिंदे यांनी व्यक्त केले.