शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गरज असेल तरच अटक- नोटीस आवश्यक : फौजदारीतील दुरुस्तीच्या अंमलबजावणीचे आदेश

By admin | Updated: August 7, 2014 00:23 IST

अटकेचे कारण व उद्देश न्यायालयाला सांगावा लागणार

सदानंद औंधे - मिरज .. फौजदारी प्रक्रिया संहितेतील सुधारणेनुसार आता सात वर्षापर्यंत शिक्षा असलेल्या गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यापूर्वी नोटीस द्यावी लागणार आहे. गरज असेल तरच आरोपीला अटक करून अटकेचे कारण व उद्देश न्यायालयाला सांगावा लागणार आहे. विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या परिपत्रकानुसार, कोणत्याही गुन्ह्यात आरोपीला तात्काळ अटक करण्यास पोलिसांना प्रतिबंध करण्यात आला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फौजदारी प्रक्रिया संहितेत दुरुस्तीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यापुढे सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असलेल्या कोणत्याही गुन्ह्यातील आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांना न्यायालयास कारणे द्यावी लागणार आहेत. कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महासंचालक देवेन भारती यांनी परिपत्रक काढून, राज्यातील पोलिसांसाठी आरोपीच्या अटकेबाबत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.एखाद्या व्यक्तीला अटक करण्याची कृती अत्यंत महत्त्वाची आहे. अटकेमुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा येत असल्याने काळजीपूर्वक अटक करणे आवश्यक असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. खून, बलात्कार, दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न यासह गंभीर गुन्हे वगळता, सात वर्षांपर्यंत शिक्षा असलेल्या गुन्ह्यात आवश्यकता नसेल तर आरोपीला अटक करण्यात येऊ नये. आरोपीने गुन्हा केला आहे अशी खात्री झाल्यासच अटक करावी. आरोपीस नोटीस देऊन वेळ व ठिकाण नमूद असलेली नोटीस देऊन त्यास चौकशीसाठी हजर राहण्यास कळवावे. नोटिसीप्रमाणे आरोपी हजर झाल्यास तपास अधिकाऱ्याने अटक का, कशासाठी व अटक करून काय साध्य होणार, याचे समाधानकारक उत्तर दिले असेल तरच अटक करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला दिलेल्या नोटिसीप्रमाणे त्याने पोलीस अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. मात्र आरोपी हजर राहिला नाही, तर या कारणावरून त्यास अटक करता येईल. गुन्ह्यात आरोपीला अटक करावयाची गरज नाही असे तपास अधिकाऱ्याला वाटल्यास, न्यायालयासमोर त्याचे कारण सांगून आरोपीला अटक न करताही त्याचे न्यायालयात दोषारोपपत्र पाठविता येईल. नवीन परिपत्रकाप्रमाणे सात वर्षापर्यंत शिक्षा असलेल्या आरोपीला अटक करता येईल, मात्र आरोपीच्या अटकेचे कारण न्यायालयाला सांगावे लागणार आहे. न्यायालयानेही पोलिसांनी दिलेल्या अटकेच्या कारणांची खात्री करावयाची आहे. अटकेचे कारण योग्य वाटले नाही, तर न्यायालय संबंधित आरोपीची जामिनावर मुक्तता करेल किंंवा कारण योग्य असल्यास पोलीस कोठडी देईल.नवीन आदेशाचे पालन न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी व न्यायालयाच्या अवमानाचा खटला दाखल करण्यात येणार आहे. कोठडी देताना अटकेच्या कारणांची खात्री न करणाऱ्या न्यायाधीशांची उच्च न्यायालयाकडून चौकशी होणार आहे. गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीला तात्काळ अटक करण्यात येते. त्याऐवजी यापुढे आरोपीला हजर राहण्यासाठी दोन आठवड्यांची नोटीस द्यावी लागणार आहे. त्यानंतर सबळ कारण असल्यास अटक करता येईल किंवा गुन्ह्याचा तपास करून अटकेशिवाय थेट न्यायालयात दोषारोपपत्र पाठविण्याची तरतूद करण्यात आली आहे. अटकेबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे यापुढे पोलिसांना कोणत्याही आरोपीला अटक करताना दक्षता घ्यावी लागणार आहे. आरोपीच्या अटकेची कारणे न्यायालयाने ग्राह्य ठरविल्यासच आरोपी पोलीस कोठडीत जाणार आहे. नवीन परिपत्रकाप्रमाणे आरोपीला अटक करण्याबाबत पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना सूचना देण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांनी सांगितले. न्यायाधीशांचीही चौकशीकोठडी देताना अटकेच्या कारणांची खात्री न करणाऱ्या न्यायाधीशांचीही चौकशी होईल. नवीन आदेशाचे पालन न केल्यास पोलीस अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी व न्यायालयाच्या अवमानाचा खटला दाखल करण्यात येईल. ४विवाहितेच्या छळाबाबत तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण मोठे आहे. यात निरपराधांना त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी आरोपीला अटक करु नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. अटक करण्याची कारणे नवीन मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे पुढील कारणांवरून आरोपीस अटक करता येईल-आरोपीस दुसरा गुन्हा करण्यास प्रतिबंध - पुरावा संपविणे किंवा साक्षीदारास धमकावण्यास, भीती दाखविण्यास आरोपीस प्रतिबंध करणे-आमिष किंवा वचन देऊन खोटी साक्ष देण्यासाठी साक्षीदाराचे मन वळविण्यास प्रतिबंध-आरोपी बाहेर असल्यास योग्य वेळेत कोर्टासमोर हजर करणे शक्य नसेल तर४गुन्ह्याचा योग्य तपास व सत्य शोधून काढण्यासाठी