शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

मराठा आर्थिक सबळ झाल्यावरच मोर्चे सार्थकी : राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:37 IST

कोल्हापूर : आरक्षण मिळाले म्हणजे सर्व काही झाले नाही, सर्वोच्च न्यायालयातील लढाई सरकार लढेलच; पण मिळालेल्या आरक्षणाचा फायदा घेऊन ...

कोल्हापूर : आरक्षण मिळाले म्हणजे सर्व काही झाले नाही, सर्वोच्च न्यायालयातील लढाई सरकार लढेलच; पण मिळालेल्या आरक्षणाचा फायदा घेऊन मराठा समाज आर्थिक सक्षम झाला पाहिजे. ज्यावेळी समाज आर्थिकदृष्ट्या सबळ होईल, त्यावेळी मोर्चे सार्थकी ठरतील आणि आपणास खरा आनंद होईल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी केले.तसेच मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही टिकेल; त्यासाठी राज्य सरकारने ख्यातनाम महाभियोक्ता (अ‍ॅटर्नी जनरल) तुषार मेहता यांची नियुक्ती केल्याची घोषणा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.कोल्हापूर सकल मराठा समाजातर्फे रविवारी कृतज्ञता सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी शाहू छत्रपती, चंद्रकांत पाटील, नारायण राणे, ‘पुढारी’चे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांच्यासह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.यावेळी नारायण राणे म्हणाले, ‘राणे समितीने आरक्षणाबाबतचा केलेला अहवाल न्यायालयात टिकेल, असा परिपूर्णच होता. आघाडी सरकारने आपल्या अहवालाधारे १६ टक्के आरक्षण दिले; पण सरकार बदलल्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे थांबले. आरक्षणासाठी मोर्चे निघाले, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपणास शब्द दिला होता. त्याप्रमाणे पाळल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. गेल्या ४० वर्षांच्या मेहनतीला फळ मिळाले; पण पुढे काय? हा खरा प्रश्न असून, आरक्षणाच्या सवलतीचे प्रबोधन गावागावांत झाले पाहिजे. लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व चळवळीतील कार्यकर्त्यांनी यासाठी नैतिक जबाबदारी घेऊन पुढे आले पाहिजे. आयएएस अधिकाऱ्यांचे प्रमाण मराठा समाजाचे कमी आहे, त्याचा विचारही केला पाहिजे. ज्यावेळी मराठा समाज आर्थिक सबळ होईल, त्यावेळीच राज्यात निघालेले ५८ मोर्चे सार्थकी ठरतील.यावेळी खा. धैर्यशील माने, आ. हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. सुरेश हाळवणकर, आ. चंद्रदीप नरके, आ. उल्हास पाटील, आ. प्रकाश आबिटकर, आ. अमल महाडिक, आ. सुजित मिणचेकर, माजी खासदार धनंजय महाडिक, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, उर्वरित महाराष्टÑ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, मराठा महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष शशिकांत पवार, राष्टÑीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, सकल मराठा समाजाचे निमंत्रक जयेश कदम, समन्वयक दिलीप पाटील आदी, प्रमुख उपस्थित होते.आरक्षणाच्या लढ्यात ‘लोकमत’चे बळमराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यात अभूतपूर्व मोर्चे निघाले. यामध्ये ‘लोकमत’ने सातत्याने बळ देण्याचे काम केले. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले व मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचा आवर्जून उल्लेखप्रा. जयंत पाटील यांनी केला.हुतात्म्यांच्या वारसांना नोकरीमराठा आरक्षण लढ्यात ४२ जणांना हौतात्म्य आले. त्यांच्या वारसांना एस. टी. महामंडळात नोकरी दिलेली आहे. काही तांत्रिक गोष्टींमुळे राहिलेल्यांना लवकरच सेवेत समाविष्ट करून घेतले जाईल, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.राणे यांचे योगदान मान्यचमराठा आरक्षणामध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे योगदान मी मान्यच करीत असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. राणे समितीने तयार केलेला डाटा, लॉजिक हे आरक्षण देताना अतिशय उपयुक्त ठरल्याचे मंत्री पाटील यांनी आवर्जून सांगितले.गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरूमराठा आरक्षण लढ्यात पोलिसांकडून दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील समिती आठवड्याला बैठक घेऊन खटले निकाली काढत आहे. आतापर्यंत पाच लाखांपर्यंत नुकसानीचे ४० गुन्हे निकाली काढले आहेत. उर्वरित गुन्ह्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.