शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

भाजपकडून सक्षम उमेदवारच वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 01:30 IST

समरजित त्यांच्या विश्वासावर कागलात प्रचार सभा घेत राहिले व तिकडे शिवसेनेने जे त्यांना हवे तेच केले. या सर्व घडामोडीत भाजपपेक्षा शिवसेनेचेच नेते दिलेला ‘शब्द’ जास्त पाळतात, असे चित्र पुढे आले.

ठळक मुद्दे युतीचे राजकारण : पवारांना जे जमले ते भाजपला मात्र नाही जमले

विश्वास पाटील ।कोल्हापूर : एका रात्रीत उमेदवार बदलून त्याला निवडून आणण्याची किमया यापूर्वी कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सन २००४ च्या विधानसभा निवडणुकीत करून दाखवली होती; परंतु अशी किमया या निवडणुकीत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना करून दाखविता आली नाही. त्यामुळे तीन वर्षे भाजपचे कमळ हातात घेऊन गावोगावी फिरलेल्या समरजित घाटगे यांना ‘अपक्ष’ म्हणून निवडणूक लढविण्याची वेळ आली. चंदगड विधानसभा मतदारसंघातून डॉ. नंदिनी बाभूळकर यांचाही भाजपची संगत केल्यामुळेच राजकीय बळी गेला.

समरजित घाटगे असतील किंवा डॉ. बाभूळकर असतील हे दोघेही उच्चशिक्षित, उत्तम प्रतिमा, दोघेही तरुण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार होते. त्यातील समरजित यांनी विधानसभा डोळ््यांसमोर ठेवूनच भाजपमध्ये प्रवेश केला.त्यानंतर जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणूक भाजपचे कमळ चिन्ह घेऊन लढविल्या. मुख्यमंत्र्यांनी एकदा सोडून चारवेळा कागलमध्ये येऊन समरजित हेच आमचे उमेदवार असल्याचे हात उंचावून जाहीर केले आणि तरीही त्यांना शिवसेनेकडून ही जागा सोडवून घेता आली नाही.

विधानसभेच्या सन २००४च्या निवडणुकीत मालोजीराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोल्हापूर मतदारसंघातून सक्रिय होते. विधानसभेचे उमेदवार म्हणूनच त्यांना प्रोजेक्ट केले होते; परंतु ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली. विधानसभेच्या सन १९८० च्या निवडणुकीत लालासाहेब यादव या मतदारसंघातून ७ हजारांच्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. त्यामुळे काँग्रेसचा या मतदारसंघावर पारंपरिक हक्क होता. यातून मार्ग काढताना पवार यांंनी काँग्रेसला ही जागा तुम्हाला सोडतो परंतु उमेदवार आमचा असेल, असे सुचविले व तसे करून घेतले. त्यामुळे रात्रीत मालोजीराजे मुंबईत जाऊन त्यांचा काँग्रेस प्रवेश झाला व त्यांना ही उमेदवारी मिळाली. उमेदवाराकडे निवडून येण्याची क्षमता असेल तर अशा गोष्टी युती, आघाडी करताना कराव्या लागतात. कागलमध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय घाटगे यांनी युतीची उमेदवारी मिळाली तरच लढणार, असे अगोदर जाहीर केले होते. त्यामुळे ते उमेदवारी न मिळाल्यास लढणार नाहीत; हे स्पष्ट होते. त्यांच्या गटाची ताकद नक्कीच आहे; परंतु या निवडणुकीत त्यांची उमेदवारीच्या टप्प्यावर लढण्याची मानसिकता नव्हती. कारण ही जागा भाजपला जाणार, असे त्यांनाही वाटत होते; परंतु तसे घडले नाही आणि कागलच्या राजकारणात जे अपेक्षित होते तेच घडले.

चंदगडमध्येही डॉ.बाभूळकर यांना भाजपने बळ दिले. या मतदारसंघात दिवंगत नेते बाबासाहेब कुपेकर यांनी राष्ट्रवादीची चांगली बांधणी केली असल्याने बाभूळकर या राष्ट्रवादीकडून लढल्या असत्या तरी त्या सक्षम उमेदवार ठरू शकल्या असत्या; परंतु त्यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेतली आणि भाजपच्या वाट्याला हा मतदारसंघच आला नाही. त्यामुळे मूळच्या कुपेकर घराण्याच्या राजकारणाला या निवडणुकीत पूर्णविराम मिळाला. युती होणार नाही म्हणून भाजपने म्हणजेच मुख्यत: पालकमंत्री पाटील यांनी नेतृत्वाची पर्यायी फळी उभी केली तीच आता युतीच्या मार्गातील अडसर ठरू लागली आहे.

शिवसेनेने हवे तेच केलेसमरजित घाटगे यांना शिवसेनेकडून लढावे लागणार, हे मुख्यमंत्र्यांना व प्रदेशाध्यक्षांना अगोदर पाच-सहा दिवस माहीत होते तर त्यांनी समरजित यांचा शिवसेना प्रवेश करून त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यासाठी जे काही आवश्यक होते ते करायला हवे होते. समरजित त्यांच्या विश्वासावर कागलात प्रचार सभा घेत राहिले व तिकडे शिवसेनेने जे त्यांना हवे तेच केले. या सर्व घडामोडीत भाजपपेक्षा शिवसेनेचेच नेते दिलेला ‘शब्द’ जास्त पाळतात, असे चित्र पुढे आले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक