शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
4
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
5
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
6
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
7
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
8
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
9
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
10
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
11
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
12
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
13
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
14
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
15
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
16
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
17
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
18
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
19
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
20
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...

दिव्यांगांच्या दाखल्यांचा आॅनलाईन गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:13 IST

नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्राच्या नव्या कायद्यानुसार देशभरातील सर्व दिव्यांगांना एकच ओळखपत्र मिळणार आहे. सर्व ...

नसिम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्राच्या नव्या कायद्यानुसार देशभरातील सर्व दिव्यांगांना एकच ओळखपत्र मिळणार आहे. सर्व प्रकारच्या योजनांचे लाभ या एकाच ओळखपत्राच्या माध्यमातून देण्याचे सरकारचे धोरण आहे. ते काढण्याची प्रक्रिया पाहिली तर ‘भीक नको पण कुत्रे आवर’ म्हणण्याची वेळ दिव्यांगांवर आली आहे.पूर्वीप्रमाणे दिव्यांग दाखले देण्याची प्रक्रिया शासनाने २ आॅक्टोबरपासून बंद केली आहे. आता नव्या कायद्यानुसार दिव्यांगांना वैश्विक ओळख दर्शविणारे ‘यूडीआयडी’ हे ओळखपत्र दिले जाणार आहे. दिव्यांगांना हे फारच सोईचे असले तरी हे ओळखपत्र काढण्यासाठी यंत्रणा राबविण्यात मात्र शासनाची उदासीनता दिसत आहे. सर्व भार ‘सीपीआर’ रुग्णालयावर टाकला आहे. यावरून तक्रारी झाल्यानंतर जिल्ह्यात सहा केंद्रांना नव्याने मंजुरी मिळाली आहे; तथापि त्यांची अद्याप अधिसूचना निघालेली नाही. त्यामुळे आतापर्यंत एकही ओळखपत्र तयार होऊ शकलेले नाही.हे ओळखपत्र काढण्यासाठी आधी तहसीलदारांमार्फत उत्पन्नाचा दाखला काढून घ्यावा लागतो. हा दाखला मिळाल्यानंतर दिव्यांगत्वाच्या दाखल्यासाठी आॅनलाईन अर्ज केला जातो. त्यासाठी संबंधित दिव्यांगाला ई-सेवा केंद्रात अथवा जवळच्याच नेट कॅफेमध्ये जावे लागते. तेथे सर्व माहितीसह फॉर्म भरल्यानंतर पावती घेऊन ती सीपीआर रुग्णालयामध्ये येऊन सादर करावी लागते. ही पावती सादर झाल्यानंतर ‘सीपीआर’मध्ये संबंधित दिव्यांगाची शारीरिक व कागदपत्रांची तपासणी होऊन डॉक्टरांमार्फत दाखला तयार केला जातो. तपासणी व प्रत्यक्षात सही करण्यापर्यंत फॉर्म भरण्यासाठी एका रुग्णामागे २० मिनिटांचा अवधी लागतो. दिव्यांगांची संख्या, डॉक्टरांची अपुरी संख्या पाहिल्यावर ही प्रक्रिया वेग घेईनाशी झाली आहे.नवीन वर्षातच ओळखपत्रदाखल्यानंतर ओळखपत्र तयार करण्यासाठी दिव्यांगाची डिजिटल स्वाक्षरी आवश्यक असते. त्यासाठीही दिव्यांगांना संंबंधित केंद्रावर बऱ्याच येरझाºया माराव्या लागत असून, सर्व्हर डाऊन होण्याच्याही त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही ओळखपत्रे नवीन वर्षात मिळतील असे सांगण्यात येत आहे.डाटा एंट्रीआॅपरेटर नाहीतरुग्णांनी भरलेली माहिती, तिची पडताळणी व प्रत्यक्षात डॉक्टरांची सही होईपर्यंतही सर्व माहिती एकत्रित संकलित करण्यासाठी डाटा एंट्री आॅपरेटर भरण्याची गरज होती. पण शासनाने ही पदेच भरलेली नसल्यामुळे तपासणीबरोबरच संबंधित दिव्यांगाची माहितीही सॉफ्टवेअरमध्ये भरण्याचे काम डॉक्टरांनाच करावे लागत आहे.महानगरपालिकेला माहितीच नाहीमहानगरपालिका कार्यक्षेत्रात दिव्यांगांना दाखले देण्यासाठी सावित्रीबाई फुले हॉस्पिटल व पंचगंगा हॉस्पिटल या महानगरपालिकेच्या रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. तथापि या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे कोणतीही माहिती नाही. जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिव्यांगांचे सर्वेक्षण होउन दाखला देण्याची प्रक्रिया सुरू झाली तरी महापालिका प्रशासन अजूनही अनभिज्ञच आहे.दाखले मिळण्याची ठिकाणेआजरा, चंदगड व गडहिंग्लजसाठी : ग्रामीण रुग्णालय, कागल. करवीरसाठी : सेवा रुग्णालय, कसबा बावडा. शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावड्यासाठी : वारणा-कोडोली. राधानगरी, भुदरगडसाठी : गारगोटी उपरुग्णालय, शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजीसाठी : आयजीएम रुग्णालय.